म. टा. प्रतिनिधी, नगर
'मराठा समाजाला आरक्षण देण्याची सरकारने घोषणा केली होती. परंतु सरकारने घोषणा करण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती केली तर आज आंदोलनाची वेळ आली नसती. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज जो आंदोलनाचा वणवा पेटला आहे, त्याला सरकार कारणीभूत आहे,' अशी टीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. 'कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण द्यावे,' अशी भूमिकाही त्यांनी पत्रकारांशी बोलताना मांडली.
नगरमध्ये झालेल्या मराठा क्रांती जनआंदोलनामध्ये विखे सहभागी झाले होते. 'सरकार जे बोलते ते करीत नाही. उलट आंदोलनामध्ये फुट कशी पडेल, याचा प्रयत्न सातत्याने सरकारने केला. सरकार वेळकाढूपणा करीत असल्याने त्याचे तीव्र पडसाद राज्यात उमटत आहेत,' असे सांगून विखे पुढे म्हणाले, 'सध्या सुरू असलेले आंदोलन हे आरक्षणाचे आश्वासन देणाऱ्या सरकारला आश्वासन पूर्ण करण्याचा इशारा आहे. आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे सरसकट मागे घेण्याची सरकारने घोषणा केली असली तरी गुन्हे मागे घेण्याची प्रत्यक्ष कृती करण्याची गरज आहे. वेगवेगळ्या समाजात तेढ निर्माण करण्याचा सरकारचा पहिल्यापासून प्रयत्न आहे,' असे मतही त्यांनी मांडले. 'सरकारची धोरणे फसवणूक करणारी असून सरकार भरकटत चालले असल्याचा आरोपही त्यांनी केला.
'मराठा समाजाला आरक्षण देण्याची सरकारने घोषणा केली होती. परंतु सरकारने घोषणा करण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती केली तर आज आंदोलनाची वेळ आली नसती. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज जो आंदोलनाचा वणवा पेटला आहे, त्याला सरकार कारणीभूत आहे,' अशी टीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. 'कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण द्यावे,' अशी भूमिकाही त्यांनी पत्रकारांशी बोलताना मांडली.
नगरमध्ये झालेल्या मराठा क्रांती जनआंदोलनामध्ये विखे सहभागी झाले होते. 'सरकार जे बोलते ते करीत नाही. उलट आंदोलनामध्ये फुट कशी पडेल, याचा प्रयत्न सातत्याने सरकारने केला. सरकार वेळकाढूपणा करीत असल्याने त्याचे तीव्र पडसाद राज्यात उमटत आहेत,' असे सांगून विखे पुढे म्हणाले, 'सध्या सुरू असलेले आंदोलन हे आरक्षणाचे आश्वासन देणाऱ्या सरकारला आश्वासन पूर्ण करण्याचा इशारा आहे. आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे सरसकट मागे घेण्याची सरकारने घोषणा केली असली तरी गुन्हे मागे घेण्याची प्रत्यक्ष कृती करण्याची गरज आहे. वेगवेगळ्या समाजात तेढ निर्माण करण्याचा सरकारचा पहिल्यापासून प्रयत्न आहे,' असे मतही त्यांनी मांडले. 'सरकारची धोरणे फसवणूक करणारी असून सरकार भरकटत चालले असल्याचा आरोपही त्यांनी केला.