अहमदनगर: 'राज्याचं घटलेलं उत्पन्न वाढवण्यासाठी टॅक्स वाढवण्याचा सरकारचा कुठलाही विचार नाही. सध्या करोनापासून लोकांचा जीव वाचवणं हेच महत्त्वाचं आहे. करोनाशी लढण्यासाठी जो काही खर्च होईल तो केला जाईल,' असं राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज स्पष्ट केलं. (Balasaheb Thorat on Tax Revenue)
वाचा: मग 'तिथल्या' वॉचमनला कामावरून का काढलं?; राणेंचा BMC ला सवाल
नगरमध्ये ते पत्रकारांशी बोलत होते. करोनाच्या पार्श्वभूमीवर पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळं संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था ठप्प झाली आहे. औद्योगिकदृष्ट्या संपन्न राज्य असलेल्या महाराष्ट्राला लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका बसला आहे. महसुली उत्पन्न कमी झालं आहे. कर्मचाऱ्यांच्या पगार देण्यासाठीही राज्य सरकारला मोठी कसरत करावी लागत आहे. लॉकडाऊन आता हळूहळू शिथिल होत असले तरी ताबडतोब परिस्थिती बदलणार नाही. आणखी काही महिने आर्थिक मंदीचे आणि ओढग्रस्तीचे असणार आहेत. अशा परिस्थितीत राज्य सरकार वेगवेगळ्या प्रकारच्या करात वाढ करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, थोरात यांनी ही शक्यता फेटाळून लावली आहे. सध्या तरी राज्य सरकारचा कुठलाही टॅक्स वाढवण्याचा विचार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
'जनतेला करोनाच्या कचाट्यातून बाहेर काढण्यास आमचे प्राधान्य आहे. करोना रोखताना राज्याच्या अर्थव्यवस्थेला गती देण्याबाबत निर्णय सुद्धा घ्यावा लागणार आहे. त्या दृष्टीने मंत्रिमंडळामध्ये चर्चा सुरू आहे. खर्च कुठे कमी करता होईल. कुठून उत्पन्न वाढवता येईल, यावर चर्चा सुरू आहे,' असं ते म्हणाले. 'आता हळूहळू व्यापार, उद्योग सुरू होऊ लागले आहेत. मुद्रांक विक्री सुद्धा सुरू झाली आहे. त्यामुळं थोड्याफार प्रमाणात महसुली उत्पन्न सुरू झालं आहे, असंही ते म्हणाले.
वाचा: सोनू सूदनं राजकारण्यांचंही मन जिंकलं! पाहा काय झालं?
महाराष्ट्राची इतरांशी तुलना होऊ शकत नाही!
'करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनला काही कठीण निर्णय घ्यावे लागत असतात. पण नागरिकांनी सुद्धा आता स्वयंशिस्त पाळणे गरजेचे आहे. कारण प्रशासन कुठपर्यंत तुमची काळजी घेणार, हा सुद्धा प्रश्न आहे. देशात महाराष्ट्रमध्ये करोना रुग्ण जास्त आहेत. पण यासाठी महाराष्ट्रला कोणी दोष देईल वाटत नाही. कारण महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. येथे विदेशातून येणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे, हे देखील लक्षात घ्यावे लागेल. त्यामुळे देशातील इतर राज्य व महाराष्ट्र यांची तुलना होऊ शकत नाही. करोना आता वाढू लागला आहे. तो का वाढतोय, या कारणांचा अभ्यास करीत आहोत,' असंही त्यांनी सांगितलं.
Live: मुख्यमंत्री रायगडमध्ये; नुकसानीची पाहणी सुरू
वाचा: मग 'तिथल्या' वॉचमनला कामावरून का काढलं?; राणेंचा BMC ला सवाल
नगरमध्ये ते पत्रकारांशी बोलत होते. करोनाच्या पार्श्वभूमीवर पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळं संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था ठप्प झाली आहे. औद्योगिकदृष्ट्या संपन्न राज्य असलेल्या महाराष्ट्राला लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका बसला आहे. महसुली उत्पन्न कमी झालं आहे. कर्मचाऱ्यांच्या पगार देण्यासाठीही राज्य सरकारला मोठी कसरत करावी लागत आहे. लॉकडाऊन आता हळूहळू शिथिल होत असले तरी ताबडतोब परिस्थिती बदलणार नाही. आणखी काही महिने आर्थिक मंदीचे आणि ओढग्रस्तीचे असणार आहेत. अशा परिस्थितीत राज्य सरकार वेगवेगळ्या प्रकारच्या करात वाढ करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, थोरात यांनी ही शक्यता फेटाळून लावली आहे. सध्या तरी राज्य सरकारचा कुठलाही टॅक्स वाढवण्याचा विचार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
'जनतेला करोनाच्या कचाट्यातून बाहेर काढण्यास आमचे प्राधान्य आहे. करोना रोखताना राज्याच्या अर्थव्यवस्थेला गती देण्याबाबत निर्णय सुद्धा घ्यावा लागणार आहे. त्या दृष्टीने मंत्रिमंडळामध्ये चर्चा सुरू आहे. खर्च कुठे कमी करता होईल. कुठून उत्पन्न वाढवता येईल, यावर चर्चा सुरू आहे,' असं ते म्हणाले. 'आता हळूहळू व्यापार, उद्योग सुरू होऊ लागले आहेत. मुद्रांक विक्री सुद्धा सुरू झाली आहे. त्यामुळं थोड्याफार प्रमाणात महसुली उत्पन्न सुरू झालं आहे, असंही ते म्हणाले.
वाचा: सोनू सूदनं राजकारण्यांचंही मन जिंकलं! पाहा काय झालं?
महाराष्ट्राची इतरांशी तुलना होऊ शकत नाही!
'करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनला काही कठीण निर्णय घ्यावे लागत असतात. पण नागरिकांनी सुद्धा आता स्वयंशिस्त पाळणे गरजेचे आहे. कारण प्रशासन कुठपर्यंत तुमची काळजी घेणार, हा सुद्धा प्रश्न आहे. देशात महाराष्ट्रमध्ये करोना रुग्ण जास्त आहेत. पण यासाठी महाराष्ट्रला कोणी दोष देईल वाटत नाही. कारण महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. येथे विदेशातून येणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे, हे देखील लक्षात घ्यावे लागेल. त्यामुळे देशातील इतर राज्य व महाराष्ट्र यांची तुलना होऊ शकत नाही. करोना आता वाढू लागला आहे. तो का वाढतोय, या कारणांचा अभ्यास करीत आहोत,' असंही त्यांनी सांगितलं.
Live: मुख्यमंत्री रायगडमध्ये; नुकसानीची पाहणी सुरू