म.टा.प्रतिनिधी,नगर
उच्च न्यायालयाच्या आदेशाने महापालिकेने सुरू केलेली धार्मिक स्थळे हटविण्याची कारवाई थांबवून धार्मिक स्थळांचे फेरसर्वेक्षण करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी (१७ नोव्हेंबर) ‘नगर बंद’ची हाक शहरातील हिंदुत्ववादी संघटनांनी दिली आहे. या मागणीसाठी आज गुरुवारी रस्ता रोको आंदोलन, कापड बाजार बंद आंदोलन, महाआरती, उपोषण आदी आंदोलने झाली आहेत. आता शुक्रवारीही ‘नगर बंद’चे आवाहन केले गेले आहे.
महापालिकेने शहरातील रस्त्यात अडथळा ठरणारी १०४ धार्मिक स्थळे काढण्याची कारवाई सुरू केली आहे. यात आतापर्यंत १७ मंदिरे हटवली गेली आहेत. गौरी घुमट येथील गौरी शंकर मित्रमंडळाच्या तुळजाभवानी मंदिराचाही या यादीत समावेश आहे. त्यामुळे पंडित दीनदयाळ नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष वसंत लोढा यांच्या नेतृत्वाखाली मंदिर बचाव कृती समितीने तीन दिवसांपासून या मंदिरासमोर उपोषण सुरू केले आहे. त्याची प्रशासनाने दाखल न घेतल्याने व धार्मिक स्थळे कारवाई न थांबवल्याच्या निषेधार्थ सर्व हिंदुत्ववादी संघटनांच्यावतीने शुक्रवारी (१७ नोव्हेंबर) ‘नगर बंद’चे आवाहन केले गेले आहे. शुक्रवारी सकाळी ११ वाजता ग्रामदैवत माळीवाड्यातील विशाल गणेश मंदिरात महाआरती केली जाणार असून, त्यानंतर कार्यकर्ते शहरभर फिरून ‘बंद’चे आवाहन करणार आहेत. दरम्यान, ‘जेसीबी’ मिळत नसल्याने महापालिकेची धार्मिक स्थळे हटविण्याची कारवाई बंद पडली आहे. तसेच राज्यस्तरीय समितीच्या निर्णयासाठी पाठवलेल्या १९६० पूर्वीच्या ३१ धार्मिक स्थळांबाबतचा अंतिम आदेशही अद्याप अमलात आलेला नाही.
उच्च न्यायालयाच्या आदेशाने महापालिकेने सुरू केलेली धार्मिक स्थळे हटविण्याची कारवाई थांबवून धार्मिक स्थळांचे फेरसर्वेक्षण करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी (१७ नोव्हेंबर) ‘नगर बंद’ची हाक शहरातील हिंदुत्ववादी संघटनांनी दिली आहे. या मागणीसाठी आज गुरुवारी रस्ता रोको आंदोलन, कापड बाजार बंद आंदोलन, महाआरती, उपोषण आदी आंदोलने झाली आहेत. आता शुक्रवारीही ‘नगर बंद’चे आवाहन केले गेले आहे.
महापालिकेने शहरातील रस्त्यात अडथळा ठरणारी १०४ धार्मिक स्थळे काढण्याची कारवाई सुरू केली आहे. यात आतापर्यंत १७ मंदिरे हटवली गेली आहेत. गौरी घुमट येथील गौरी शंकर मित्रमंडळाच्या तुळजाभवानी मंदिराचाही या यादीत समावेश आहे. त्यामुळे पंडित दीनदयाळ नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष वसंत लोढा यांच्या नेतृत्वाखाली मंदिर बचाव कृती समितीने तीन दिवसांपासून या मंदिरासमोर उपोषण सुरू केले आहे. त्याची प्रशासनाने दाखल न घेतल्याने व धार्मिक स्थळे कारवाई न थांबवल्याच्या निषेधार्थ सर्व हिंदुत्ववादी संघटनांच्यावतीने शुक्रवारी (१७ नोव्हेंबर) ‘नगर बंद’चे आवाहन केले गेले आहे. शुक्रवारी सकाळी ११ वाजता ग्रामदैवत माळीवाड्यातील विशाल गणेश मंदिरात महाआरती केली जाणार असून, त्यानंतर कार्यकर्ते शहरभर फिरून ‘बंद’चे आवाहन करणार आहेत. दरम्यान, ‘जेसीबी’ मिळत नसल्याने महापालिकेची धार्मिक स्थळे हटविण्याची कारवाई बंद पडली आहे. तसेच राज्यस्तरीय समितीच्या निर्णयासाठी पाठवलेल्या १९६० पूर्वीच्या ३१ धार्मिक स्थळांबाबतचा अंतिम आदेशही अद्याप अमलात आलेला नाही.