विद्यार्थिनिंना कागदी, कापडी
पिशव्या बनविण्याचे धडे
म. टा. वृत्तसेवा, कर्जत
राज्यसरकराने न्यायालयाच्या आदेशाचे पालन करताना राज्यामध्ये प्लास्टिकबंदी केली आहे. मात्र, यामुळे नागरिकांची चांगलीच गैरसोय होत आहे. यावर कागदी व कापडी पिशव्या वापरण्यास सांगितल्या जात आहेत. या मुळे पर्यावरण देखील वाचणार आहे, हे ओळखून कर्जत येथील रयत शिक्षण संस्थेच्या सोनमाळी कन्या विद्या मंदिरात पर्यावरण संवर्धन उपक्रमांतर्गत प्लास्टिक पिशव्यांना पर्याय म्हणून विद्यार्थिनींना कागदी व कापडी पिशव्या बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.
'क्राफ्ट'च्या माध्यमातून वारली चित्र कला व विविध वस्तूंच्या निर्मितीतून महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी शिक्षिका जयश्री घोडके यांनी या वेळी विद्यार्थिनिंना मार्गदर्शन केले. प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घालण्यात आली आहे. परंतू भाजी, किराणा किंवा इतर गोष्टी हाताळण्यासाठी कागदी व कापडी पिशवी हा उत्तम पर्याय आहे. ही कापडी पिशवी नेणे सोपे आहे. फक्त ही पिशवी नेण्याची सवय हाताला लावणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे पर्यवेक्षक वसंत चटाले यांनी केले. या कापडी व कागदी पिशव्यांचे महत्व विद्यार्थ्यांना मिळाल्याने ते आपल्या घरातील आई-वडिल, भाऊ, बहीण व इतर सर्व सदस्यांना सांगतील. केवळ सांगणारच नाहीत तर त्याचा वापर करण्यासाठी आग्रह धरतील विद्यार्थिनींमध्ये पर्यावरण सुरक्षिततेची जाणीव निर्माण होण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
फोटो ओळी
कर्जत येथील सोनमाळी कन्या विद्या मंदिरच्या विद्यार्थिनिंनी तयार केलेल्या कागदी व कापडी पिशव्या समवेत मार्गदर्शिका जयश्री घोडके.