अ‍ॅपशहर

जे अभ्यास करतात त्यांच्या नोकरीचा प्रश्न आधी सोडवा, गोविंदांच्या आरक्षणाला विरोध

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी मोठी घोषणा केली. दहीहंडीत उत्सवात सहभागी गोविंदांना सरकारी नोकरी देण्याची घोषणा त्यांनी केली. यावरून आता वाद सुरू झाला आहे. विद्यार्थी संघटनांनी या निर्णयाला विरोध केला आहे.

Authored byविजयसिंह होलम | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Aug 2022, 3:51 pm
अहमदनगर : दहीहंडीमध्ये सहभागी होणाऱ्या गोविंदांना सरकारी नोकरीत ५ टक्के आरक्षणाचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला आहे. यासंबंधी फारशी कोणाचीही मागणी नसताना सरकारने हा निर्णय घेतला. आता या निर्णयाला विद्यार्थी संघटनांकडून विरोध होऊ लागला आहे. अकोले येथील विद्यार्थी प्रतिनिधी, युवा सेनेची सहसचिव शर्मिला येवले यांनी या निर्णयाला विरोध दर्शविला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम eknath shinde news
जे अभ्यास करतात त्यांच्या नोकरीचा प्रश्न आधी सोडवा, गोविंदांच्या आरक्षणाला विरोध


दहीहंडीच्या आदल्या दिवशी राज्य सरकारने या निर्णयाची घोषणा केली आहे. गोविंदा पथकांना अनेक सोयी सवलतीही जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यांना कोणाचा आक्षेप नाही. मात्र नोकरीत आरक्षण देण्याच्या निर्णयाला विरोध होत आहे. राज्य सरकारने गोविंदा पथकांना सरकारी नोकरी देण्याचा निर्णय घेतलेला आहे, त्याला विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून आमचा विरोध आहे. वर्षानुवर्षे अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असतात आणि कुठेतरी आपल्याला सरकारी नोकरी मिळेल, अशी आशा विद्यार्थ्यांना असते. या निर्णयामुळे अशा विद्यार्थ्यांवर अन्याय होताना दिसून येत आहे. त्यामुळे या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी शर्मिला येवले यांनी केली आहे.

कोण आहेत संदीप थोरात? विनोद कांबळीला फायनान्स कंपनीत दिली महिना १ लाख पगाराची ऑफर

जखमी गोविंदांवर शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत उपचार

आज दहीहंडी असून कार्यक्रमादरम्यान कोणत्याही गोविंदास दुखापत झाल्यास शासकीय रुग्णालयांमध्ये त्यांना मोफत उपचार देण्यात यावेत, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल विधानसभेत केली होती. त्यानुसार राज्यातील सर्व शासकीय दवाखाने, वैद्यकीय महाविद्यालये, महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हापरिषदेचे दवाखाने यांना नि:शुल्क वैद्यकिय उपचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासंदर्भात काढण्यात आलेला शासन निर्णय हा स्थायी असून यावर्षीपासून दर वर्षासाठी तो लागू राहील.

सैन्यातील जवान नातवाच्या मृत्यूची बातमी आली अन् घरी धक्क्याने आजीनेही सोडले प्राण

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज