म. टा. प्रतिनिधी, नगर
गेल्या वर्षी राबविण्यात आलेल्या जलयुक्त शिवार अभियानातील कामांचे फलित यंदा चांगला पाऊस झाल्याने दिसू लागले असून, जिल्ह्यातील २७९ गावांमधील तब्बल १ लाख १५ हजार १८० हेक्टर जमीन सिंचनाखाली आली आहे. तर, या गावांमध्ये जलयुक्त अभियानाच्या कामांमुळे ५७ हजार ५९० टीसीएम पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून दुष्काळ सोसत असलेल्या गावांतील शेतीला फायदा होणार आहे.
जलयुक्त शिवार अभियान हा सरकारचा पथदर्शी कार्यक्रम आहे. गेल्या वर्षी या अभियानात पाणीटंचाई, दुष्काळी परिस्थिती असलेली २७९ गावे निवडण्यात येऊन, १४ हजार ४७२ कामे सुरू करण्यात आली होती. त्यात १४ हजार ७४ गावांची कामे पूर्ण झाली असून, ३९८ कामे पूर्ण व्हायची आहे. यंदा जोरदार झालेल्या पावसामुळे पाणीटंचाईची परिस्थिती मिटली आहे. सलग समतल, खोल समतल, कपार्टमेंट बंडिंग, शेततळे, माती नाला बांध, साखळी सिमेंट बंधारा, नाली खोलीकरण, सरळीकरण, जलस्रोतांची दुरुस्ती, पाझर तलाव, केटीवेअर, तलावातून गाळ काढणे इत्यादी १४ हजार कामे जलयुक्त शिवार अभियानात करण्यात आली आहेत. ८४ हजार हेक्टरवर या पद्धतीच्या कामांसाठी १९७ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. या कामांमुळे ५७ हजार ५९० टीसीएम पाणीसाठा तयार झाला आहे. या कामांमुळे पाणी जमिनीत मुरल्यामुळे शेतकऱ्यांच्या विहिरी, बोअरवेल्स यांना जास्त पाणी येऊन याचा फायदा होणार आहे. या सर्व कामांमुळे १ लाख १५ हजार १८० हेक्टरवरील शेती सिंचनाखाली आली असल्याचा अहवाल कृषी विभागाने जिल्हा प्रशासनाला दिली आहे. यंदा पाथर्डी, जामखेड, कर्जत तालुक्यांतील गावांमध्ये अतिवृष्टी झाली असून, त्यामुळे अनेक ठिकाणी जलयुक्त शिवार योजनेतील बंधारे फुटून नुकसान झाले आहे. या फुटलेल्या बंधाऱ्यांची माहिती आता जमा केली जात असून, ते बंधारे दुरुस्त केले जात आहे. राज्यात जलयुक्ताच्या कामांमध्ये नगर जिल्हा आघाडीवर आहे. जास्तीत जास्त कामे होऊन शेतीला फायदा होण्यासाठी जिल्हाधिकारी अनिल कवडे हे बैठका घेऊन सर्व यंत्रणा सूचना देत आहे.
गेल्या वर्षी राबविण्यात आलेल्या जलयुक्त शिवार अभियानातील कामांचे फलित यंदा चांगला पाऊस झाल्याने दिसू लागले असून, जिल्ह्यातील २७९ गावांमधील तब्बल १ लाख १५ हजार १८० हेक्टर जमीन सिंचनाखाली आली आहे. तर, या गावांमध्ये जलयुक्त अभियानाच्या कामांमुळे ५७ हजार ५९० टीसीएम पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून दुष्काळ सोसत असलेल्या गावांतील शेतीला फायदा होणार आहे.
जलयुक्त शिवार अभियान हा सरकारचा पथदर्शी कार्यक्रम आहे. गेल्या वर्षी या अभियानात पाणीटंचाई, दुष्काळी परिस्थिती असलेली २७९ गावे निवडण्यात येऊन, १४ हजार ४७२ कामे सुरू करण्यात आली होती. त्यात १४ हजार ७४ गावांची कामे पूर्ण झाली असून, ३९८ कामे पूर्ण व्हायची आहे. यंदा जोरदार झालेल्या पावसामुळे पाणीटंचाईची परिस्थिती मिटली आहे. सलग समतल, खोल समतल, कपार्टमेंट बंडिंग, शेततळे, माती नाला बांध, साखळी सिमेंट बंधारा, नाली खोलीकरण, सरळीकरण, जलस्रोतांची दुरुस्ती, पाझर तलाव, केटीवेअर, तलावातून गाळ काढणे इत्यादी १४ हजार कामे जलयुक्त शिवार अभियानात करण्यात आली आहेत. ८४ हजार हेक्टरवर या पद्धतीच्या कामांसाठी १९७ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. या कामांमुळे ५७ हजार ५९० टीसीएम पाणीसाठा तयार झाला आहे. या कामांमुळे पाणी जमिनीत मुरल्यामुळे शेतकऱ्यांच्या विहिरी, बोअरवेल्स यांना जास्त पाणी येऊन याचा फायदा होणार आहे. या सर्व कामांमुळे १ लाख १५ हजार १८० हेक्टरवरील शेती सिंचनाखाली आली असल्याचा अहवाल कृषी विभागाने जिल्हा प्रशासनाला दिली आहे. यंदा पाथर्डी, जामखेड, कर्जत तालुक्यांतील गावांमध्ये अतिवृष्टी झाली असून, त्यामुळे अनेक ठिकाणी जलयुक्त शिवार योजनेतील बंधारे फुटून नुकसान झाले आहे. या फुटलेल्या बंधाऱ्यांची माहिती आता जमा केली जात असून, ते बंधारे दुरुस्त केले जात आहे. राज्यात जलयुक्ताच्या कामांमध्ये नगर जिल्हा आघाडीवर आहे. जास्तीत जास्त कामे होऊन शेतीला फायदा होण्यासाठी जिल्हाधिकारी अनिल कवडे हे बैठका घेऊन सर्व यंत्रणा सूचना देत आहे.