अ‍ॅपशहर

'फडणवीसांचा नेम नाही, तुम्ही कर्डिलेंना भेटा', सुजय विखेंचा सत्यजीत तांबेंना सल्ला

Ahmednagar News : विधान परिषद निवडणुकांवरून राज्यातलं राजकारण तापलं आहे. खास करून नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. कारण सत्यजीत तांबे आणि भाजपच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष आहे. भाजप सत्यजीत तांबेंना पाठिंबा देणार का? हे या निवडणुकीत महत्त्वाचं ठरणार आहे. असं असताना सुजय विखे पाटील यांनी सत्यजीत तांबे यांना एक मिश्किल सल्ला दिला आहे.

Authored byटीम मटा ऑनलाइन | Edited byसचिन फुलपगारे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Jan 2023, 9:59 pm
मोबीन खान, नेवासा, अहमदनगर : विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर निवडणुकीवरून फक्त मतदारसंघातलंच नाही तर संपूर्ण राज्यातलं राजकारण तापलं आहे. काँग्रेसच्या सुधीर तांबे यांनी ऐनवेळी उमेदवारी अर्ज दाखल न करता त्यांचे पुत्र सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. सत्यजीत तांबे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे आहेत. यामुळेच या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसंच सत्यजीत तांबे यांना भाजप पाठिंबा देणार का? हेही अद्याप स्पष्ट झालेलं नाही. अशातच नगरमधील भाजप खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी सत्यजीत तांबे यांना एक सल्ला दिला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sujay vikhe patil on satyajeet tambe
'फडणवीसांचा नेम नाही, तुम्ही कर्डिलेंना भेटा', सुजय विखेंचा सत्यजीत तांबेंना सल्ला


सत्यजीतला सल्ला आहे की शिवाजीराव कर्डिले साहेबांना येऊन भेट. सगळं होऊन जाईल, असा मिश्किल सल्ला भाजप खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी सत्यजीत तांबे यांना दिला आहे. अहमदनगर जिल्ह्याच्या सोनई येथे माजी आमदार चंद्रशेखर घुले यांची कन्या आणि माजी मंत्री शंकरराव गडाख यांचे पुत्र यांचा विवाह सोहळा आज पार पाडला. यावेळी सोनाईत आल्यानंतर सुजय विखे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांचं वैशिष्ट्य आहे, नेमकं काय होतंय आणि कधी काय करतील हे कोणीही सांगू शकत नाही. अपेक्षित वेगळं आणि घडतं अनपेक्षित. हा पण त्यांचा मास्टर स्ट्रोक आहे. याच्या मागे काय राजकारण आहे ते लवकरच तुम्हाला कळेल, असे पदवीधर निवडणुकी संदर्भात बोलताना डॉ. सुजय विखे म्हणाले.

Video: मनात राग आणि डोळ्यात आग, कट्टर विरोधक सत्यजीत तांबे-शुभांगी पाटील

मला काँग्रेसचे आभार मानायचे आहे की मला त्यांनी तिकीट दिले नाही. म्हणून मी बुडत्या जाहजात गेलो नाही. काँग्रेस हे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारणारा व्यक्ती झाला आहे. राहुल गांधींची भारत जोडो यात्रा जशी पुढे जाईल तसे कार्यकर्ते काँग्रेस छोडो करतील, अशा शब्दांत सुजय विखे पाटील यांनी काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर टीका केली आहे.

सत्यजीत तांबे यांना प्रकाश आंबेडकरांचा अप्रत्यक्ष टोला; म्हणाले, ती पिढी वेगळी, ही पिढी

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज