अ‍ॅपशहर

‘स्वच्छ भारत’मध्ये जिल्ह्यातील ३६५ गावे

केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ भारत’ अभियानांतर्गत जिल्हा परिषदेने वार्षिक कृती आराखडा तयार केला आहे.

Maharashtra Times 29 Jun 2016, 12:56 am
म. टा. प्रतिनिधी, नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम swachh bharat campaign
‘स्वच्छ भारत’मध्ये जिल्ह्यातील ३६५ गावे


केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ भारत’ अभियानांतर्गत जिल्हा परिषदेने वार्षिक कृती आराखडा तयार केला आहे. या आराखड्यात जिल्ह्यातील ३६५ गावांचा समावेश करण्यात आला असून वर्षभरात या गावांमध्ये शंभर टक्के शौचालये बांधण्याचे निश्चित केले आहे. या कामासाठी शौचालय बांधणाऱ्या लाभार्थ्यास बारा हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आचहे.

केंद्र सरकारकडून स्वच्छ भारत अभियान राबविले जात आहे. या अभियानात गावे हागणदारीमुक्त करण्यावर भर देण्यात आला आहे. त्यानुसार शौचालय बांधकामासाठी गावांच्या निवडी केल्या जात आहेत. वार्षिक कृती आराखडा तयार करताना ज्या गावातील शौचालयाचे काम थोडेच बाकी आहे अशा गावांवर लक्ष केंद्रित केले आहे. या गावात उर्वरीत शौचालये या अभियानांतर्गत बांधली जाणार असल्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी उज्ज्वला बावके यांनी सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज