अ‍ॅपशहर

जिल्ह्यात ३८ गावांसाठी टँकर पुन्हा सुरू

पावसाने दडी मारल्याने पाणी टंचाई असलेल्या गावांमध्ये पुन्हा टँकर सुरू करण्यात आले असून, आता ३८ गावे व १७४ वाड्यावस्त्यांवरील ७० हजार लोकसंख्येला टँकरने पाणीपुरवठा सुरू केला जात आहे. या गावांना ४६ टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला आहे. तर अकोले व शेवगाव गावांना नव्याने टँकर मंजूर करण्यात आले आहेत.

Maharashtra Times 11 Jul 2017, 3:00 am
नगर ः पावसाने दडी मारल्याने पाणी टंचाई असलेल्या गावांमध्ये पुन्हा टँकर सुरू करण्यात आले असून, आता ३८ गावे व १७४ वाड्यावस्त्यांवरील ७० हजार लोकसंख्येला टँकरने पाणीपुरवठा सुरू केला जात आहे. या गावांना ४६ टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला आहे. तर अकोले व शेवगाव गावांना नव्याने टँकर मंजूर करण्यात आले आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम tanker resumes for 38 villages in the district
जिल्ह्यात ३८ गावांसाठी टँकर पुन्हा सुरू

जूनअखेर पाणीटंचाईच्या आराखड्याची मुदत संपल्याने जिल्ह्यातील पाणीपुरवठा करणारे ८५ टँकर बंद करण्यात आले होते. आता नव्याने पाणी टँकरसाठी प्रस्ताव मागून ते मंजूर करण्यात येत आहेत. आतापर्यंत ५६ टँकर जिल्हाधिकाऱ्यांनी मंजूर केले असून, त्यातील ४६ टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला असून, ३८ गावे व १७४ वाड्यावस्त्यांवरील ७० हजार ४७२ लोकसंख्येची तहान भागविली जात आहे. संगमनेर तालुक्यातील १४ गावे व ५० वाड्यावस्त्यांवरील ३० हजार ९४७ लोकसंख्येला १७ टँकरने पाणी पुरविले जात आहे. तर पारनेरमधील आठ गावे व ४८ वाड्यास्त्यांवरील १४ हजार लोकसंख्येला टँकरने पाणी पुरवठा होत आहे. या ठिकाणी दहा टँकर सुरू आहेत.
पाथर्डी तालुक्यातून टँकरची मागणी वाढत असून, पाथर्डीतील १५ गावे व ६७ वाड्यावस्त्यांवरील २४ हजार लोकसंख्येला १८ टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला आहे. जामखेडला एक टँकर सुरू झाला आहे. अकोले तालुक्यात चार आणि शेवगाव तालुक्यातील ६ गावांसाठी सात टँकर मंजूर झाले आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज