म. टा. प्रतिनिधी, नगर
मढीतील जात पंचायती बंद होऊन समाजप्रबोधन मेळावे सुरू झाल्यानंतर चांगले निर्णय घेण्यासह सुरुवात झाली आहे. कोल्हाटी समाजाच्या मुली यापुढे कलाकेंद्रात जाणार नाहीत, असा महत्त्वपूर्ण निर्णय जागतिक महिलादिनी मढीत झालेल्या समाजप्रबोधन मेळाव्यात झाला. राज्यभरातून आलेल्या कोल्हाटी समाजाचा पहिलाच प्रबोधन मेळावा तरुणांच्या पुढाकारातून मढीत झाला.
पूर्वी मढी यात्रेच्या निमित्ताने तेथे विविध समाजाच्या जात पंचायती भरत असत. त्यामध्ये अनेकदा अन्यायकारक निवाडे आणि शिक्षाही केल्या जात. वादग्रस्त ठरलेल्या या जातपंचायतींना आता कायद्याने बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे जातपंचायतीऐवजी काही समाजांनी समाजप्रबोधन मेळावे घेण्यास सुरुवात केली आहे. कोल्हाटी समाजाचा पहिला मेळावा ८ मार्चला मढी येथे झाला. त्याबद्दल समाजातील ज्येष्ठ नेते अरुण मुसळे यांनी सांगितले की, यापुढे समाजातील मुली कलाकेंद्रात जाणार नाहीत. कलाकेंद्रात जाऊन नाचगाणे सादर करण्याची या समाजाची जुनी परंपरा यामुळे मोडीत निघणार आहे. कोल्हाटी समाजाने अनिष्ट प्रथा, चुकीच्या रूढी परंपरा, चालीरीती सोडून देऊन समाजाच्या विकासाच्या प्रश्नावर एकत्र यावे, मुले आणि मुलींना शिक्षण द्यावे असे निर्णय घेण्यात आले; तसेच समाजाचा समावेश अनुसूचित जातीत करण्यात यावा, त्यांच्या शिक्षणाकडे, आरोग्याकडे लक्ष देण्यात यावे, अशा मागण्या करण्यात आल्या. त्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करण्याचे ठरले. अन्य समाजापासून होणाऱ्या त्रासापासून सुटका करून घेण्यासाठी कायदेशीर मार्गाचा अवलंब करण्याचा निर्णयही मेळाव्यात घेण्यात आला. कोल्हाटी समाजातील महिलांचा सन्मान झाला पाहिजे, असा महत्त्वपूर्ण निर्णय जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून घेण्यात आला.
मेळाव्याचे उद्घाटन धुळे नगरपालिकेच्या माजी नगरसेविका संजीवनी प्रकाश जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. य़ा वेळी राम अंधारे, बाळासाहेब काळे, अॅड. डॉ. अरुण जाधव, नगर महानगरपालिकेचे नगरसेवक सचिन जाधव, जामखेड नगरपरिषदेचे नगरसेवक अमित जाधव, फुलचंद अंधारे, रवी बागल, हंबीरराव काळे, रवी अंधारे, विशाल अंधारे, शरद काळे, विजय काळे, विशाल जाधव, अरुण अंधारे, अविनाश मुसळे, समाधान अंधारे, भागवत जाधव, अंकुश भोरजे आदी या वेळी उपस्थित होते. सोलापूर, उस्मानाबाद, पुणे, नगर, बीड, लातूर, परभणी, धुळे, जळगाव आदी जिल्ह्यांतून समाज बांधव मेळाल्याला आले होते.
मढीतील जात पंचायती बंद होऊन समाजप्रबोधन मेळावे सुरू झाल्यानंतर चांगले निर्णय घेण्यासह सुरुवात झाली आहे. कोल्हाटी समाजाच्या मुली यापुढे कलाकेंद्रात जाणार नाहीत, असा महत्त्वपूर्ण निर्णय जागतिक महिलादिनी मढीत झालेल्या समाजप्रबोधन मेळाव्यात झाला. राज्यभरातून आलेल्या कोल्हाटी समाजाचा पहिलाच प्रबोधन मेळावा तरुणांच्या पुढाकारातून मढीत झाला.
पूर्वी मढी यात्रेच्या निमित्ताने तेथे विविध समाजाच्या जात पंचायती भरत असत. त्यामध्ये अनेकदा अन्यायकारक निवाडे आणि शिक्षाही केल्या जात. वादग्रस्त ठरलेल्या या जातपंचायतींना आता कायद्याने बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे जातपंचायतीऐवजी काही समाजांनी समाजप्रबोधन मेळावे घेण्यास सुरुवात केली आहे. कोल्हाटी समाजाचा पहिला मेळावा ८ मार्चला मढी येथे झाला. त्याबद्दल समाजातील ज्येष्ठ नेते अरुण मुसळे यांनी सांगितले की, यापुढे समाजातील मुली कलाकेंद्रात जाणार नाहीत. कलाकेंद्रात जाऊन नाचगाणे सादर करण्याची या समाजाची जुनी परंपरा यामुळे मोडीत निघणार आहे. कोल्हाटी समाजाने अनिष्ट प्रथा, चुकीच्या रूढी परंपरा, चालीरीती सोडून देऊन समाजाच्या विकासाच्या प्रश्नावर एकत्र यावे, मुले आणि मुलींना शिक्षण द्यावे असे निर्णय घेण्यात आले; तसेच समाजाचा समावेश अनुसूचित जातीत करण्यात यावा, त्यांच्या शिक्षणाकडे, आरोग्याकडे लक्ष देण्यात यावे, अशा मागण्या करण्यात आल्या. त्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करण्याचे ठरले. अन्य समाजापासून होणाऱ्या त्रासापासून सुटका करून घेण्यासाठी कायदेशीर मार्गाचा अवलंब करण्याचा निर्णयही मेळाव्यात घेण्यात आला. कोल्हाटी समाजातील महिलांचा सन्मान झाला पाहिजे, असा महत्त्वपूर्ण निर्णय जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून घेण्यात आला.
मेळाव्याचे उद्घाटन धुळे नगरपालिकेच्या माजी नगरसेविका संजीवनी प्रकाश जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. य़ा वेळी राम अंधारे, बाळासाहेब काळे, अॅड. डॉ. अरुण जाधव, नगर महानगरपालिकेचे नगरसेवक सचिन जाधव, जामखेड नगरपरिषदेचे नगरसेवक अमित जाधव, फुलचंद अंधारे, रवी बागल, हंबीरराव काळे, रवी अंधारे, विशाल अंधारे, शरद काळे, विजय काळे, विशाल जाधव, अरुण अंधारे, अविनाश मुसळे, समाधान अंधारे, भागवत जाधव, अंकुश भोरजे आदी या वेळी उपस्थित होते. सोलापूर, उस्मानाबाद, पुणे, नगर, बीड, लातूर, परभणी, धुळे, जळगाव आदी जिल्ह्यांतून समाज बांधव मेळाल्याला आले होते.