म. टा. प्रतिनिधी, नगर
नगर शहरातून जाणाऱ्या महामार्गांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे चित्रिकरण करून वाहतूक कोंडीची व पोलिसांच्या अनुपस्थितीबाबत मांडलेल्या वस्तुस्थितीची दखल जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी घेतली आहे. येथील जागरूक नागरिक मंचाचे प्रमुख सुहासभाई मुळे यांनी अशाप्रकारे चित्रिकरण करून ते थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठविले असल्याने स्थानिक स्तरावर जिल्हाधिकारी कवडे यांनीही या विषयासंदर्भात पोलिस अधीक्षक सौरभ त्रिपाठींसमवेत तातडीने बैठक घेण्याची ग्वाही मुळे यांना दिली आहे. दरम्यान, मुळे यांनी चित्रिकरणाची सीडी व पोलिसांबाबतच्या वस्तुस्थितीची माहिती असलेले पत्र मोदींसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अन्य विविध नेत्यांना पाठवले आहे.
नगर शहरातून सात ते आठ राज्य महामार्ग जात असल्याने तसेच शहरांतर्गत वाहतूकही मोठ्या प्रमाणावर असल्याने नेहमी या रस्त्यांवरील विविध चौकात वाहतूक ठप्प होण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे सुहासभाई मुळे यांनी सलग काही दिवस महामार्गावरील प्रत्येक चौकाचे चित्रिकरण करून तेथील वाहतुकीची स्थिती व पोलिसांची अनुपस्थिती टिपली आहे. या चित्रिकरणातून त्यांनी १५ मिनिटांची छोटेखानी सीडी केली असून, तिच्यासह नगरच्या वाहतूक समस्येवर भाष्य करणारे तसेच पोलिसांच्या अडचणींची मांडणी करणारे पत्र पंतप्रधानांना पाठवले आहे. या संदर्भात मागील शनिवारी (२ डिसेंबर) ‘मटा’ने ‘पोलिसनामा धडकणार दिल्लीत’ असे वृत्त प्रसिद्ध केले आहे.
कवडेंनी घेतले बोलावून शहरातीलव वाहतूक कोंडीचा विषय थेट पंतप्रधानांपर्यंत पोचणार असल्याचे ‘मटा’मधील वृत्तातून स्पष्ट झाल्याने जिल्हाधिकारी कवडे यांनी तातडीने त्याची दखल घेतली. जागरूक नागरिक मंचाचे प्रमुख सुहासभाई मुळे यांना तसेच माध्यमिक मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रा. सुनील पंडित यांना बोलावून घेऊन वाहतूक कोंडीबाबत त्यांच्याशी चर्चा केली. मुळे यांनी मांडलेले विविध मुद्दे त्यांनी समजून घेतले व तातडीने पोलिस अधीक्षक त्रिपाठी यांच्यासमवेत संयुक्त बैठक घेण्याची ग्वाही दिली. शहराची वाहतूक समस्या सोडविण्यासाठी नागरिकांचेही सहकार्य घेण्याची तयारी त्यांनी दाखवली.
शाळांच्या वेळांवर होणार चर्चा
नगर शहराच्या मध्यवस्तीत माळीवाडा ते चितळेरोड परिसरात तब्बल ११ शाळा असून, शाळा भरण्याच्यावेळी सकाळी साडेदहा ते साडेअकरा तसेच सुटण्याच्यावेळी सायंकाळी साडेपाच ते साडेसहा या दोन तासात तब्बल १० हजारावर विद्यार्थी तसेच अन्य शासकीय कर्मचारी, नागरिक, त्यांची वाहने, विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या रिक्षा व बस या परिसरात असतात. त्यामुळे शहरांतर्गतही वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. त्यामुळे सर्व शाळांचे वेळापत्रक १० ते १५ मिनिटे अलीकडे वा पलीकडे घेण्याची गरज असल्याचे मुळे यांनी सांगितल्याने त्याची दखल जिल्हाधिकारी कवडे यांनी घेतली व त्यांच्या सूचनेनुसार याबाबत मुख्याध्यापक संघाच्या पुढाकाराने सोमवारी (५ डिसेंबर) शहरातील मुख्याध्यापकांची प्राथमिक बैठक घेऊन चर्चा केली जाणार आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी व शिक्षणाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शाळांच्या वेळा बदलण्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगण्यात आले.
पोलिसांच्या मांडल्या व्यथा
जागरूक नागरिक मंचाचे सुहासभाई मुळे यांनी पंतप्रधानांना पाठवलेल्या पत्रात एकीकडे वाहतूक कोंडीसंदर्भात पोलिसांचे वाभाडे काढले असले तरी दुसरीकडे पोलिसांना होणाऱ्या त्रासाचीही माहिती दिली आहे. आऊटडेटेड झालेला पोलिसांचा छापील ड्युटी चार्ट, १२ तासांची त्यांना दिली जाणारी ड्युटी, वाहनांच्या प्रदूषणाचा होणारा त्रास, व्हीआयपींचे दौरे व त्यासाठीचा बंदोबस्त, कुटुंबाकडे होणारे दुर्लक्ष, यामुळे पोलिसांमध्ये वाढलेला चिडचिडेपणा व व्यसनाधीनता आदींसह अन्य मुद्यांचाही उहापोह करून लोकसंख्येनुसार आवश्यक पोलिसांची संख्येची गरजही मांडली आहे.
नगर शहरातून जाणाऱ्या महामार्गांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे चित्रिकरण करून वाहतूक कोंडीची व पोलिसांच्या अनुपस्थितीबाबत मांडलेल्या वस्तुस्थितीची दखल जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी घेतली आहे. येथील जागरूक नागरिक मंचाचे प्रमुख सुहासभाई मुळे यांनी अशाप्रकारे चित्रिकरण करून ते थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठविले असल्याने स्थानिक स्तरावर जिल्हाधिकारी कवडे यांनीही या विषयासंदर्भात पोलिस अधीक्षक सौरभ त्रिपाठींसमवेत तातडीने बैठक घेण्याची ग्वाही मुळे यांना दिली आहे. दरम्यान, मुळे यांनी चित्रिकरणाची सीडी व पोलिसांबाबतच्या वस्तुस्थितीची माहिती असलेले पत्र मोदींसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अन्य विविध नेत्यांना पाठवले आहे.
नगर शहरातून सात ते आठ राज्य महामार्ग जात असल्याने तसेच शहरांतर्गत वाहतूकही मोठ्या प्रमाणावर असल्याने नेहमी या रस्त्यांवरील विविध चौकात वाहतूक ठप्प होण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे सुहासभाई मुळे यांनी सलग काही दिवस महामार्गावरील प्रत्येक चौकाचे चित्रिकरण करून तेथील वाहतुकीची स्थिती व पोलिसांची अनुपस्थिती टिपली आहे. या चित्रिकरणातून त्यांनी १५ मिनिटांची छोटेखानी सीडी केली असून, तिच्यासह नगरच्या वाहतूक समस्येवर भाष्य करणारे तसेच पोलिसांच्या अडचणींची मांडणी करणारे पत्र पंतप्रधानांना पाठवले आहे. या संदर्भात मागील शनिवारी (२ डिसेंबर) ‘मटा’ने ‘पोलिसनामा धडकणार दिल्लीत’ असे वृत्त प्रसिद्ध केले आहे.
कवडेंनी घेतले बोलावून शहरातीलव वाहतूक कोंडीचा विषय थेट पंतप्रधानांपर्यंत पोचणार असल्याचे ‘मटा’मधील वृत्तातून स्पष्ट झाल्याने जिल्हाधिकारी कवडे यांनी तातडीने त्याची दखल घेतली. जागरूक नागरिक मंचाचे प्रमुख सुहासभाई मुळे यांना तसेच माध्यमिक मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रा. सुनील पंडित यांना बोलावून घेऊन वाहतूक कोंडीबाबत त्यांच्याशी चर्चा केली. मुळे यांनी मांडलेले विविध मुद्दे त्यांनी समजून घेतले व तातडीने पोलिस अधीक्षक त्रिपाठी यांच्यासमवेत संयुक्त बैठक घेण्याची ग्वाही दिली. शहराची वाहतूक समस्या सोडविण्यासाठी नागरिकांचेही सहकार्य घेण्याची तयारी त्यांनी दाखवली.
शाळांच्या वेळांवर होणार चर्चा
नगर शहराच्या मध्यवस्तीत माळीवाडा ते चितळेरोड परिसरात तब्बल ११ शाळा असून, शाळा भरण्याच्यावेळी सकाळी साडेदहा ते साडेअकरा तसेच सुटण्याच्यावेळी सायंकाळी साडेपाच ते साडेसहा या दोन तासात तब्बल १० हजारावर विद्यार्थी तसेच अन्य शासकीय कर्मचारी, नागरिक, त्यांची वाहने, विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या रिक्षा व बस या परिसरात असतात. त्यामुळे शहरांतर्गतही वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. त्यामुळे सर्व शाळांचे वेळापत्रक १० ते १५ मिनिटे अलीकडे वा पलीकडे घेण्याची गरज असल्याचे मुळे यांनी सांगितल्याने त्याची दखल जिल्हाधिकारी कवडे यांनी घेतली व त्यांच्या सूचनेनुसार याबाबत मुख्याध्यापक संघाच्या पुढाकाराने सोमवारी (५ डिसेंबर) शहरातील मुख्याध्यापकांची प्राथमिक बैठक घेऊन चर्चा केली जाणार आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी व शिक्षणाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शाळांच्या वेळा बदलण्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगण्यात आले.
पोलिसांच्या मांडल्या व्यथा
जागरूक नागरिक मंचाचे सुहासभाई मुळे यांनी पंतप्रधानांना पाठवलेल्या पत्रात एकीकडे वाहतूक कोंडीसंदर्भात पोलिसांचे वाभाडे काढले असले तरी दुसरीकडे पोलिसांना होणाऱ्या त्रासाचीही माहिती दिली आहे. आऊटडेटेड झालेला पोलिसांचा छापील ड्युटी चार्ट, १२ तासांची त्यांना दिली जाणारी ड्युटी, वाहनांच्या प्रदूषणाचा होणारा त्रास, व्हीआयपींचे दौरे व त्यासाठीचा बंदोबस्त, कुटुंबाकडे होणारे दुर्लक्ष, यामुळे पोलिसांमध्ये वाढलेला चिडचिडेपणा व व्यसनाधीनता आदींसह अन्य मुद्यांचाही उहापोह करून लोकसंख्येनुसार आवश्यक पोलिसांची संख्येची गरजही मांडली आहे.