म. टा. वृत्तसेवा, कर्जत
येथे सोमवारी आठवडे बाजाराच्या दिवशी होणारी वाहतुकीची कोंडी सुरूच आहे; मात्र, ही कोंडी नागरिक व वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. पोलिस खात्याच्या निष्काळजीपणामुळे मात्र, ही कोंडी काही केल्या सुटत नसून या कोडींचे करावयाचे काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. सोमवारी शहरात वारंवार वाहतुकीची कोंडी झाली.
कर्जत येथे तालुक्याचा बाजार सोमवारी भरतो. नगर-कर्जत रस्त्यावर शहरात बसस्थानक व गोदडमहाराज गल्ली या दोन्ही ठिकाणी दिवसभर वाहतूक पोलिस ठेवण्याची गरज आहे. याबाबत पोलिस निरीक्षकांकडे विचारणा केली असता, आठवडे बाजाराच्या दिवशी वाहतूक पोलिस नगर-सोलापूर रस्त्यावर चापडगाव येथे जातात असे समजले. कर्जत येथे सोमवारी किमान दोन ते तीन पोलिस वाहतूक नियंत्रणासाठी ठेवण्याची गरज आहे तसेच एरवीदेखील एक वाहतूक पोलिस रस्त्यावर ठेवण्याची गरज आहे. कारण बाजारसाठी आलेले नागरिक शहरामध्ये रस्त्याच्या कडेला दुचाकी व चारचाकी वाहने उभी करून निघून जातात. यामुळे रस्ता अरुंद होऊन वाहतुकीची कोंडी होते. शहरात येणाऱ्या सर्व रस्त्यांवर सोमवारी कोंडी होते. यामध्ये मेन रोडसह गवंडेगल्लीमधील रस्ता, कुळधरण रस्ता, कापरेवाडी वेस रस्ता हे सर्व रस्ते आठवडे बाजाराच्या दिवशी कोंडीत अडकतात. या रस्त्याने वाहने नेताना मोठी कसरत करावी लागते. पायी जाणाऱ्यांनाही जीव मुठीत घेऊन जावे लागते. कर्जत बसस्थानक, शहाजीनगर, महात्मा गांधी विद्यालयाचे समारेचे पटांगण या ठिकाणी वाहनतळ करून येथे वाहने उभी करण्याची सक्ती करण्याची गरज आहे.
अवजड वाहनांना प्रवेश बंद
आठवडे बाजाराच्या दिवशी शहरामधून अवजड वाहनांना प्रवेश बंद करावा. या वाहनांना जाण्यासाठी पर्यायी मार्ग आहेत. त्यांना तेथूनच जा-ये करण्यास भाग पाडावे. यामुळेही कोंडी सुटण्यास मदत होईल, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.
येथे सोमवारी आठवडे बाजाराच्या दिवशी होणारी वाहतुकीची कोंडी सुरूच आहे; मात्र, ही कोंडी नागरिक व वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. पोलिस खात्याच्या निष्काळजीपणामुळे मात्र, ही कोंडी काही केल्या सुटत नसून या कोडींचे करावयाचे काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. सोमवारी शहरात वारंवार वाहतुकीची कोंडी झाली.
कर्जत येथे तालुक्याचा बाजार सोमवारी भरतो. नगर-कर्जत रस्त्यावर शहरात बसस्थानक व गोदडमहाराज गल्ली या दोन्ही ठिकाणी दिवसभर वाहतूक पोलिस ठेवण्याची गरज आहे. याबाबत पोलिस निरीक्षकांकडे विचारणा केली असता, आठवडे बाजाराच्या दिवशी वाहतूक पोलिस नगर-सोलापूर रस्त्यावर चापडगाव येथे जातात असे समजले. कर्जत येथे सोमवारी किमान दोन ते तीन पोलिस वाहतूक नियंत्रणासाठी ठेवण्याची गरज आहे तसेच एरवीदेखील एक वाहतूक पोलिस रस्त्यावर ठेवण्याची गरज आहे. कारण बाजारसाठी आलेले नागरिक शहरामध्ये रस्त्याच्या कडेला दुचाकी व चारचाकी वाहने उभी करून निघून जातात. यामुळे रस्ता अरुंद होऊन वाहतुकीची कोंडी होते. शहरात येणाऱ्या सर्व रस्त्यांवर सोमवारी कोंडी होते. यामध्ये मेन रोडसह गवंडेगल्लीमधील रस्ता, कुळधरण रस्ता, कापरेवाडी वेस रस्ता हे सर्व रस्ते आठवडे बाजाराच्या दिवशी कोंडीत अडकतात. या रस्त्याने वाहने नेताना मोठी कसरत करावी लागते. पायी जाणाऱ्यांनाही जीव मुठीत घेऊन जावे लागते. कर्जत बसस्थानक, शहाजीनगर, महात्मा गांधी विद्यालयाचे समारेचे पटांगण या ठिकाणी वाहनतळ करून येथे वाहने उभी करण्याची सक्ती करण्याची गरज आहे.
अवजड वाहनांना प्रवेश बंद
आठवडे बाजाराच्या दिवशी शहरामधून अवजड वाहनांना प्रवेश बंद करावा. या वाहनांना जाण्यासाठी पर्यायी मार्ग आहेत. त्यांना तेथूनच जा-ये करण्यास भाग पाडावे. यामुळेही कोंडी सुटण्यास मदत होईल, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.