अहमदनगर :
लहानपणी मुलांना शाळेत पाठविले जाते, पण ती शाळा असते चोर बनविणारी. ते शिक्षणही स्वस्त नाही. अट्टल चोराचे प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी तब्बल तीन लाखांपर्यंत खर्च येतो. पण तेथून पुढे सुरू होते खरी कमाई. अशा प्रशिक्षित चोरांना टोळ्यांमध्ये भाडोत्री तत्वावर काम मिळते. मध्यप्रदेशातील राजगड जिल्ह्यात अशा टोळ्या आणि भाडोत्री चोर आहेत. त्यातील एक टोळी नगर पोलिसांच्या हाती लागल्यावर त्यांचे हे कारनामे उघड झाले आहेत.
शिर्डीसह काही ठिकाणी लग्न समारंभात चोऱ्या झाल्या होत्या. त्याचा तपास नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस करीत होते. तेव्हा त्यांना एका परप्रांतीय टोळीची माहिती मिळाली. सापळा सापळा रचून सहा जणांना अटक केली. त्यांच्याकडे चौकशी केल्यावर एमपीती चोरांची ही शाळा उघडकीस आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती अशी – मध्यप्रदेशातील राजगड जिल्ह्यात कडीया सासी, गुलखेडी, पिपलिया या गावांमध्ये वेगवेगळ्या गुन्हेगारी टोळ्या आहेत. तेथे मुलांना चोरीचे प्रशिक्षण दिले जाते. त्यामध्ये चोरी कशी करायची, पकडल्यानंतर लोकांचा तसेच पोलीसांचा मार सहन करणे अशा प्रकारे प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षणासाठी प्रत्येक मुलामागे सुमारे ३ लाख रुपये खर्च येतो. अशी प्रशिक्षण देणारी केंद्रही तेथे आहेत. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या मुलांना टोळ्या त्यांच्या आईवडिलांकडून भाड्याने घेता. प्रत्येक मुलासाठी पाच ते दहा हजार रुपये भाडे दिले जाते. अर्थात ही किंमत त्या मुलाचे चोरीचे कौशल्य आणि अनुभवावर ठरते.
लग्न समारंभात या मुलांकडून चोऱ्या करवून घेतल्या जातात. लग्न समारंभात प्रथम टेहळणी केली जाते. तेथील लोकांसारखी दिसणारी मुले या कामावर नेमली जातात. त्यांना तसा पेहरावही केला जातो. लग्नातील मुख्य व्यक्ती, दागिने, पैसे कोणाच्या ताब्यात आहेत, याची शोध घेऊन पद्धतीशीरपणे चोरी केली जाते. जर कोण पकडला गेला तर त्याची सुटका करेपर्यंतची संपूर्ण जबाबदारी टोळी प्रमुखाची असते. पोलिसांना महिती मिळाली आणि एखाद्या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिस गावापर्यंत आले तर संपूर्ण गाव एकत्र येऊन पोलिसांवर हल्ला करते. मध्यप्रदेश नव्हे तर अन्य राज्यांत या टोळ्या गुन्हे करतात.
नगरचे पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्या पथकाने ही टोळी नगर जिल्ह्यात पकडली आहे. मात्र, आता तपासासाठी त्यांच्या मूळ गावापर्यंत जाण्याचे आव्हान नगर पोलिसांपुढे आहेच.
लहानपणी मुलांना शाळेत पाठविले जाते, पण ती शाळा असते चोर बनविणारी. ते शिक्षणही स्वस्त नाही. अट्टल चोराचे प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी तब्बल तीन लाखांपर्यंत खर्च येतो. पण तेथून पुढे सुरू होते खरी कमाई. अशा प्रशिक्षित चोरांना टोळ्यांमध्ये भाडोत्री तत्वावर काम मिळते. मध्यप्रदेशातील राजगड जिल्ह्यात अशा टोळ्या आणि भाडोत्री चोर आहेत. त्यातील एक टोळी नगर पोलिसांच्या हाती लागल्यावर त्यांचे हे कारनामे उघड झाले आहेत.
शिर्डीसह काही ठिकाणी लग्न समारंभात चोऱ्या झाल्या होत्या. त्याचा तपास नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस करीत होते. तेव्हा त्यांना एका परप्रांतीय टोळीची माहिती मिळाली. सापळा सापळा रचून सहा जणांना अटक केली. त्यांच्याकडे चौकशी केल्यावर एमपीती चोरांची ही शाळा उघडकीस आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती अशी – मध्यप्रदेशातील राजगड जिल्ह्यात कडीया सासी, गुलखेडी, पिपलिया या गावांमध्ये वेगवेगळ्या गुन्हेगारी टोळ्या आहेत. तेथे मुलांना चोरीचे प्रशिक्षण दिले जाते. त्यामध्ये चोरी कशी करायची, पकडल्यानंतर लोकांचा तसेच पोलीसांचा मार सहन करणे अशा प्रकारे प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षणासाठी प्रत्येक मुलामागे सुमारे ३ लाख रुपये खर्च येतो. अशी प्रशिक्षण देणारी केंद्रही तेथे आहेत. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या मुलांना टोळ्या त्यांच्या आईवडिलांकडून भाड्याने घेता. प्रत्येक मुलासाठी पाच ते दहा हजार रुपये भाडे दिले जाते. अर्थात ही किंमत त्या मुलाचे चोरीचे कौशल्य आणि अनुभवावर ठरते.
लग्न समारंभात या मुलांकडून चोऱ्या करवून घेतल्या जातात. लग्न समारंभात प्रथम टेहळणी केली जाते. तेथील लोकांसारखी दिसणारी मुले या कामावर नेमली जातात. त्यांना तसा पेहरावही केला जातो. लग्नातील मुख्य व्यक्ती, दागिने, पैसे कोणाच्या ताब्यात आहेत, याची शोध घेऊन पद्धतीशीरपणे चोरी केली जाते. जर कोण पकडला गेला तर त्याची सुटका करेपर्यंतची संपूर्ण जबाबदारी टोळी प्रमुखाची असते. पोलिसांना महिती मिळाली आणि एखाद्या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिस गावापर्यंत आले तर संपूर्ण गाव एकत्र येऊन पोलिसांवर हल्ला करते. मध्यप्रदेश नव्हे तर अन्य राज्यांत या टोळ्या गुन्हे करतात.
नगरचे पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्या पथकाने ही टोळी नगर जिल्ह्यात पकडली आहे. मात्र, आता तपासासाठी त्यांच्या मूळ गावापर्यंत जाण्याचे आव्हान नगर पोलिसांपुढे आहेच.