अ‍ॅपशहर

युद्ध स्मारक येथे श्रद्धांजली कार्यक्रम

भारताने १९७१ मध्ये पाकिस्तानवर मिळवलेल्या अविस्मरणीय विजयाची आठवण म्हणून साजऱ्या होणाऱ्या ‘विजय दिन’ कार्यक्रमात या लढाईत शहीद झालेल्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

Maharashtra Times 17 Dec 2017, 3:00 am
म. टा. प्रतिनिधी, नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम tribute program at war memorial
युद्ध स्मारक येथे श्रद्धांजली कार्यक्रम

भारताने १९७१ मध्ये पाकिस्तानवर मिळवलेल्या अविस्मरणीय विजयाची आठवण म्हणून साजऱ्या होणाऱ्या ‘विजय दिन’ कार्यक्रमात या लढाईत शहीद झालेल्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. यानिमित्त आर्मड कोअर सेंटर अॅड स्कूलमधील युद्ध स्मारकावर वरिष्ठ लष्करी अधिकारी मेजर जनरल नीरज कपूर यांनी पुष्पचक्र अर्पण करून १९७१च्या युद्धातील शहिदांना श्रद्धांजली वाहली.
भारत व पाकिस्तान यांच्यामध्ये १९७१ मध्ये झालेल्या युद्धात १६ डिसेंबरला पाकिस्तान भारतापुढे शरण आला आणि बांगलादेशाची निर्मिती झाली. त्यामुळे १६ डिसेंबर हा दिवस ‘विजय दिन’ म्हणून साजरा केला जातो. येथील आर्मड
कोअर सेंटर अॅड स्कूल (एसी सेंटर अॅड स्कुल) येथेही ‘विजय दिना’निमित्त १९७१च्या युद्धांत शहीद झालेले जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
पाकिस्तानविरुद्धच्या १९७१ च्या युद्धात नगरच्या आर्मड कोअरचे योगदान मोठे आहे. या युद्धामध्ये येथील रणगाड्यांनी सीमेच्या पश्चिम व पूर्व मैदानी भागामध्ये असणाऱ्या शत्रूंचा नायनाट केला होता. आर्मड कोअरमध्ये युद्ध स्मारक सुद्धा बनवण्यात आले आहे. या युद्ध स्मारकाला मेजर जनरल नीरज कपूर, सेवानिवृत्त अधिकारी लेफ्टनंट जनरल एन फोले, लेफ्टनंट जनरल वी के सेवल यांनी षुष्पचक्र अर्पण केले. यावेळी जवानांनी शहिदांना सलामी दिली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज