अ‍ॅपशहर

विश्वास मोदींवर की पवारांवर?; 'त्या' विधानावरून पडली वादाची ठिणगी

Prajakt Tanpure के के रेंज प्रश्नावरून भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यात वाद चिघळण्याची शक्यता आहे. याबाबत खासदार सुजय विखे पाटील यांनी केलेल्या विधानावर राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

Authored byसंदीप कुलकर्णी | Edited byगजानन सावंत | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 27 Oct 2020, 1:16 am
नगर: ‘के के रेंज प्रश्नासंदर्भात जी वस्तुस्थिती आहे ती मी तुम्हाला सांगितली आहे. आता त्याच्यापुढे अजून काय असेल तर ते भाजपचे खासदार आहेत, त्यांनी मंत्रालयात काय शिजतं हे विषद करावं,’ असे वक्तव्य राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले व एकप्रकारे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना आव्हानच दिले. ( Prajakt Tanpure Slams Sujay Vikhe Patil )
महाराष्ट्र टाइम्स.कॉम पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार


वाचा: CM ठाकरेंच्या बाणांनी भाजप घायाळ; राष्ट्रवादीने केली 'ही' खास कमेंट

‘के के रेंज प्रश्नासंदर्भात आम्ही जी भूमिका तत्कालीन दौऱ्यात मांडली त्यावर आजही ठाम आहोत. त्या भूमिकेत कोणताही बदल नाही. त्यामुळे आता शरद पवार यांच्यावर विश्वास ठेवायचा की नरेंद्र मोदी यांच्यावर हे जनतेनेच ठरवावे. भविष्यकाळात कोण खरे ठरते, हे निवडणुकीपूर्वी जनतेसमोर आल्याशिवाय राहणार नाही, असे वक्तव्य नुकतेच खासदार डॉ. सुजय विखे यांनी केले होते. याबाबत मंत्री तनपुरे यांना विचारले असता ते म्हणाले, ‘विखे यांच्या वक्तव्यावर मला फार भाष्य करायचे नाही. मला एवढेच माहिती आहे, शरद पवार हे राजनाथ सिंह यांच्याकडे गेले होते. आमदार निलेश लंके हे देखील त्यांच्यासोबत होते. मी त्यावेळी करोनामुळे आजारी असल्याकारणाने जाऊ शकलो नाही. मात्र, त्या बैठकीत पवार साहेबांनी वस्तुस्थिती मांडली. त्यानंतर वरती काय चक्र फिरले, मला माहिती नाही. परंतु काही दिवसांपूर्वीच जिल्हाधिकारी कार्यालयात संरक्षण विभागाच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी येऊन सांगितले की आम्ही जमीन अधिग्रहण करणार नाही. आता जिल्हाधिकाऱ्यांना लष्कराचे अधिकारी सांगत असतील, तर के के रेंज प्रश्नासंदर्भात संभ्रम निर्माण होण्याचा प्रश्नच येत नाही.’

वाचा: 'शरद पवारांवर विश्वास ठेवायचा की मोदींवर? हे जनतेनेच ठरवावे'

के के रेंज प्रश्नासंदर्भात भाजपचे स्थानिक नेत्यांनी राजकारण सुरू केलयं का, असे तनपुरे यांना विचारले असता ते म्हणाले, ‘मी आपले माझे बघत असतो. कोण काय बोलते, यामध्ये मला जास्त रस नाही. जी वस्तुस्थिती आहे, ती मी सांगितली आहे. आता याच्यापुढे अजून काय असेल तर ते भाजपचे खासदार आहेत. त्यांनी मंत्रालयात काय शिजतं, हे विषय करावे.’

वाचा: राष्ट्रवादीने सिंचन घोटाळ्याचा साक्षीदार फोडला!; 'हा' भाजप नेता म्हणाला...

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज