म. टा. प्रतिनिधी, नगर
गरिबांना रेशनकार्डवर नियंत्रित किमतीत सरकारकडून तूरडाळ देण्यात येत असून, नगर जिल्ह्यातील सात तालुक्यांमध्येच ही डाळ उपलब्ध झाली आहे. तेथून काही रेशनदुकानांमध्ये डाळ उपलब्ध झाली आहे, तर काही ठिकाणी नाही. जिल्ह्यासाठी ४ हजार ८८ क्विंटल डाळ मंजूर झाली असली तरी आतापर्यंत १ हजार ९२८ क्विंटल डाळच उपलब्ध झाली आहे. मंजूर साठ्यापेक्षा कमी उपलब्ध साठा, रेशनदुकानदारांकडून लाभार्थ्यांना डाळीचे वाटप नाही, असा गोंधळ निर्माण झाला आहे.
तूरडाळीचा भाव भडक्याने रेशनदुकानांवर तूरडाळ १०३ रुपये किलोने सरकारने उपलब्ध करून दिली असून, त्यासाठी ठेकेदार नेमले आहेत. नगर जिल्ह्यासाठी नागपूर येथील मोहन इंडस्ट्रीज डाळ पुरवठा करत आहे. ऑगस्ट महिन्यासाठी ४ हजार ८८ क्विंटल साठा जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आला आहे. पंधरा दिवसांपूर्वीच सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. परंतु, जिल्ह्यांतील सर्व रेशनदुकानांमध्ये ही डाळ अद्याप उपलब्ध झालेली नाही. आतापर्यंत केवळ सात तालुक्यांत १ हजार ९२८ क्विंटल डाळ उपलब्ध झाली असून, त्या ठिकाणी रेशनदुकानदार डाळ उचलून लाभार्थ्यांना वाटप करणार आहेत. नगर शहरासह इतर सात तालुक्यांत अद्याप डाळ उपलब्ध झालेली नाही. ज्या तालुक्यांमध्ये डाळ उपलब्ध झाली आहे, त्या ठिकाणी रेशनदुकानदार चलन भरून डाळीची उचल करत नाहीत. संगमनेरला तालुक्यात २०९ क्विंटल डाळ उपलब्ध झाली असली, तरी एका दुकानदाराने चलन भरून ती उचलली नाही. राहुरी तालुक्यात २४१ क्विंटल डाळ उपलब्ध झाली असून, या तालुक्यातील ५० दुकानदारांनी डाळीची उचल करून लाभार्थ्यांना वाटप सुरू केले आहे.
काही तालुक्यांमध्ये डाळ पोहच झाली आहे, तर काही तालुक्यांमध्ये नाही. त्या ठिकाणहून रेशनदुकानदार लाभार्थ्यांना पोहच करत नाहीत. यावरून डाळ वाटपाबाबत गोंधळ दिसून येत आहे. प्रशासन व पुरवठदार यांच्यामध्ये झालेल्या करारानुसार, वीस दिवसांत सर्व तालुक्यांच्या ठिकाणी डाळपुरवठा करायचा असून, त्यासाठी आणखी सहा दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे ही डाळ दुकानांमध्ये पोहोच होऊन ती लाभार्थ्यांपर्यंत जाण्यासाठी आणखी वेळ जाणार असून, गरिबांना या डाळीची वाटच पहावी लागणार आहे.
गरिबांना रेशनकार्डवर नियंत्रित किमतीत सरकारकडून तूरडाळ देण्यात येत असून, नगर जिल्ह्यातील सात तालुक्यांमध्येच ही डाळ उपलब्ध झाली आहे. तेथून काही रेशनदुकानांमध्ये डाळ उपलब्ध झाली आहे, तर काही ठिकाणी नाही. जिल्ह्यासाठी ४ हजार ८८ क्विंटल डाळ मंजूर झाली असली तरी आतापर्यंत १ हजार ९२८ क्विंटल डाळच उपलब्ध झाली आहे. मंजूर साठ्यापेक्षा कमी उपलब्ध साठा, रेशनदुकानदारांकडून लाभार्थ्यांना डाळीचे वाटप नाही, असा गोंधळ निर्माण झाला आहे.
तूरडाळीचा भाव भडक्याने रेशनदुकानांवर तूरडाळ १०३ रुपये किलोने सरकारने उपलब्ध करून दिली असून, त्यासाठी ठेकेदार नेमले आहेत. नगर जिल्ह्यासाठी नागपूर येथील मोहन इंडस्ट्रीज डाळ पुरवठा करत आहे. ऑगस्ट महिन्यासाठी ४ हजार ८८ क्विंटल साठा जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आला आहे. पंधरा दिवसांपूर्वीच सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. परंतु, जिल्ह्यांतील सर्व रेशनदुकानांमध्ये ही डाळ अद्याप उपलब्ध झालेली नाही. आतापर्यंत केवळ सात तालुक्यांत १ हजार ९२८ क्विंटल डाळ उपलब्ध झाली असून, त्या ठिकाणी रेशनदुकानदार डाळ उचलून लाभार्थ्यांना वाटप करणार आहेत. नगर शहरासह इतर सात तालुक्यांत अद्याप डाळ उपलब्ध झालेली नाही. ज्या तालुक्यांमध्ये डाळ उपलब्ध झाली आहे, त्या ठिकाणी रेशनदुकानदार चलन भरून डाळीची उचल करत नाहीत. संगमनेरला तालुक्यात २०९ क्विंटल डाळ उपलब्ध झाली असली, तरी एका दुकानदाराने चलन भरून ती उचलली नाही. राहुरी तालुक्यात २४१ क्विंटल डाळ उपलब्ध झाली असून, या तालुक्यातील ५० दुकानदारांनी डाळीची उचल करून लाभार्थ्यांना वाटप सुरू केले आहे.
काही तालुक्यांमध्ये डाळ पोहच झाली आहे, तर काही तालुक्यांमध्ये नाही. त्या ठिकाणहून रेशनदुकानदार लाभार्थ्यांना पोहच करत नाहीत. यावरून डाळ वाटपाबाबत गोंधळ दिसून येत आहे. प्रशासन व पुरवठदार यांच्यामध्ये झालेल्या करारानुसार, वीस दिवसांत सर्व तालुक्यांच्या ठिकाणी डाळपुरवठा करायचा असून, त्यासाठी आणखी सहा दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे ही डाळ दुकानांमध्ये पोहोच होऊन ती लाभार्थ्यांपर्यंत जाण्यासाठी आणखी वेळ जाणार असून, गरिबांना या डाळीची वाटच पहावी लागणार आहे.