अ‍ॅपशहर

शहरात वाहनचोऱ्या वाढल्या

नगर शहरात वाहन चोरीच्या घटना सुरूच आहेत. तीन दिवसांपासून शहरातील पोलिस स्टेशनला वाहन चोरीचे गुन्हे वाढले आहेत. शहरातील तीन पोलिस स्टेशनच्या हद्दीत या वर्षात २२८ वाहने चोरीला गेली असून, त्यात दोनशेहून अधिक मोटारसायकली चोरीला गेल्या आहेत.

Maharashtra Times 16 Dec 2017, 3:00 am
म. टा. प्रतिनिधी, नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम vehicle lifting incidents increased in nagar city
शहरात वाहनचोऱ्या वाढल्या


नगर शहरात वाहन चोरीच्या घटना सुरूच आहेत. तीन दिवसांपासून शहरातील पोलिस स्टेशनला वाहन चोरीचे गुन्हे वाढले आहेत. शहरातील तीन पोलिस स्टेशनच्या हद्दीत या वर्षात २२८ वाहने चोरीला गेली असून, त्यात दोनशेहून अधिक मोटारसायकली चोरीला गेल्या आहेत. परंतु, गुन्हे मात्र कमीच उघडकीस आले आहेत. त्यामुळे वाहन चोरीच्या टोळ्या सक्रिय झालेल्या आहेत.

१४ डिसेंबर रोजी तीन वाहने चोरीला गेली. तर १३ डिसेंबरला चार वाहने चोरीला गेल्याचे गुन्हे दाखल झाले आहेत. मध्यंतरी कोतवाली पोलिसांनी एक टोळी पकडल्यानंतर हे गुन्हे थांबले होते. परंतु, आता वाहने चोरांच्या टोळ्या पुन्हा सक्रिय झाल्या आहेत. या वर्षात शहर हद्दीतील तोफखाना, कोतवाली, भिंगार कॅम्प या तीन पोलिस स्टेशनच्या हद्दीत चारचाकी व मोटारसायकली अशी २२८ वाहने चोरीला गेल्या आहेत. यात सर्वाधिक २०२ मोटारसायकली चोरीला गेल्या आहेत. तर ९ ट्रक चोरीला गेले असून, कार व रिक्षा अशी १६ वाहने चोरीला गेले आहेत. कोतवाली पोलिस स्टेशनच्या हद्दीत वाहन चोऱ्या जास्त होत असून, वर्षभरात या पोलिस स्टेशनच्या हद्दीतून तब्बल १२७ दुचाकी वाहने, पाच ट्रक चोरीला गेले आहेत. तर तोफखाना हद्दीतून ४९ मोटारसायकली चोरीला गेल्या आहेत. भिंगार पोलिस स्टेशनच्या हद्दीत मोटारसायकली चोरीच्या घटना वाढत असून, २६ दुचाकी वाहने चोरीला गेली आहेत. दुचाकीबरोबर आता चोरटे कार, जीप, रिक्षा, ट्रक असे वाहने चोरून नेत आहेत.

शहरात नागरिकांनी रस्त्यावर लावलेल्या मोटारसायकली, रुग्णालयाबाहेर, मंगल कार्यालयाबाहेर लावलेल्या मोटारसायकली चोरटे सहज चोरतात. या टोळ्या गजाआड करणे, वाहन चोऱ्या पोलिसांना रोखता आलेल्या नाहीत. नवीन जिल्हा न्यायालयाच्या आवारातील पार्किंगमधून वाहने चोरीला जात आहे. या ठिकाणी पार्किंगमध्ये पोलिसांची नेमणूक

असले तरी मोटारसायकली चोरी जात आहे. त्यामुळे वाहनधारक ही त्रस्त झालेले आहेत.

कौट ः

वाहन चोऱ्या रोखण्यासाठी वाहनधारकांनी उपाययोजना केल्या पाहिजे. स्वतःचे वाहन व्यवस्थित पार्क केल्यानंतर व्यवस्थित लॉक केले पाहिजे. नवीन जागेवर वाहन पार्क केल्यानंतर वाहनावर लक्ष ठेवले पाहिजे. हॅण्डल लॉकबरोबरच वाहनाच्या टायरला लावण्यासाठी येत असलेले लॉकचा वापर करावा.

- अक्षय शिंदे, सहायक पोलिस अधीक्षक, नगर शहर

चौकट ः

बनावट चाव्यांचा वापर

वाहने चोरणारी टोळी बनावट चाव्यांचा वापर करून वाहने चोरून नेत असल्याचे मागे पकडलेल्या एका टोळीकडून उघडकीस आले होते. वाहने चोरल्यानंतर ग्रामीण भागात कमी किमतीत ५ हजार, २ हजार अशा रकमेला ही वाहने चोरटे विकतात. परंतु, ही वाहने रितसरपणे नावावर करून दिली जात नाहीत. तर अनेक वेळा चोरीचा वाहने भंगारातही विकले जातात.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज