बीव्हीजीचे अध्यक्ष हणमंतराव गायकवाड यांचे आवाहन
म. टा. वृत्तसेवा, नेवासे
'शेतीचा उत्पादन खर्च वाढला आणि उत्पन्न कमी झाले आहे. शेतीची उत्पादकता वाढवून विषमुक्त व रेस्युड्यु फ्री माल उत्पादित केला पाहिजे. शेतीकडे सुद्धा एक व्यवसाय म्हणूनच बघावे', असे आवाहन भारत विकास ग्रुपचे (बिव्हीजी) अध्यक्ष हणमंतराव गायकवाड यांनी केले.
नेवासे तालुक्यातील भेंडा येथील श्री ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना व उद्योग समूहाचे संस्थापक लोकनेते मारुतरावजी घुले पाटील यांच्या ८८ व्या जयंती निमित्त ज्ञानेश्वर कारखाना सांस्कृतिक मंडळाच्या वतीने देण्यात येणारा लोकनेते मारुतरावजी घुले पाटील स्मृती पुरस्कार हणमंतराव गायकवाड यांना माजी आमदार डॉ. नरेंद्र घुले यांचे हस्ते प्रदान करण्यात आला.
कारखान्याचे अध्यक्ष, माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील, उपाध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग, ज्येष्ठ संचालक अॅड. देसाई देशमुख, माजी खासदार तुकाराम गडाख, शेवगावचे सभापती डॉ. क्षितिज घुले, संचालक काकासाहेब नरवडे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे, काशिनाथ नवले, नागेबाबा मल्टिस्टेट पतसंस्थेचे अध्यक्ष कडूभाऊ काळे, संभाजीराव दहातोंडे, अशोक कारखान्याचे अध्यक्ष दिगंबर शिंदे, दिलीपराव लांडे, बानाभाऊ सुकाळकर, कार्यकारी संचालक अनिल शेवाळे व्यासपीठावर उपस्थित होते.
गायकवाड म्हणाले की, 'शेती करताना माती आणि पाणी परीक्षण या अत्यंत महत्वाच्या बाबी आहेत. जमिनीतील ऑरगॅनिक कार्बन आणि सिलिका हे घटक कमी होत असल्याने उत्पादकता कमी झाली आहे. सिलिका अन्न निर्मिती प्रक्रियेत उत्प्रेरकाचे काम करते. त्याच बरोबर जमिनीची सच्छिद्रता वाढवली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वामी विवेकानंद हे माझे दैवत आहेत. रोज नवीन काही तरी शिकण्याचा आणि त्याचा उपयोग विकास कामात वापर करण्याचा प्रयत्न करतो. आपण जे करू ते गुणवत्तापूर्णच असले पाहिजे. सातारा येथे शेतीमाल प्रक्रिया उद्योग व मेगा फूड पार्क सुरू झाला आहे. डाळिंबाला शास्वत दर मिळवून देण्यासाठी डाळिंबापासून वाईन तयार करण्याचा प्रकल्प लवकरच सुरू होईल. कमी खर्चात परिणामकारक औषधे, खते शेतकऱ्यांना पुरवून उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न वाढीसाठी बीव्हीजी ग्रुप सहकार्य करीत आहे. हुमणी नियंत्रणासाठी रामबाण औषध आम्ही तयार केले आहे. माती, पाणी परिक्षण शेतकऱ्यांना नाममात्र दरात करून देण्यात येत आहे. माती परिक्षणामध्ये आम्ही १८ प्रकारचे घटक तपासून देत आहोत. त्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाधारित प्रयोगशाळा सुरू केली आहे. सोलर, पवनचक्की विकसित करून शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. शेतीतील खर्च कमी करण्यासाठी शेतकऱ्यांसाठी आम्ही पँकेज तयार केली आहेत. सक्षम समाज आणि समर्थ भारत घडविण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. लोकनेते मारुतरावजी घुले पाटील यांच्या नावाच्या पूरस्काराने माझ्यावरील जबाबदारी अधिक वाढली आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र घुले म्हणाले, स्वर्गीय घुले यांनी अभिप्रेत असलेले समाजातील कष्टकरी घटकला प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम हणमंतराव गायकवाड करीत आहेत. सर्व क्षेत्रातील प्रज्ञावंत व्यक्तिमत्वाला हा पुरस्कार आहे. कर्तृत्ववान माणसाच्या कार्यकर्तुत्वाला सीमा असूच शकत नाही, ते त्यांनी दाखवून दिले. हुमणी नियंत्रणासाठी बीव्हीजीने पुढाकार घ्यावा. माजी आमदार पांडुरंग अभंग यांनीही मनोगत व्यक्त केले.
या वेळी राज्य साखर कामगार फेडरेशनचे अध्यक्ष अविनाश आदिक, डॉ. अशोक ढगे, कारखाना संचालक रावसाहेब निकम, मोहनराव भगत, प्रा. नारायण म्हस्के, शिवाजीराव गवळी, मोहनराव देशमुख, अनिल हापसे, शिवाजीराव मोरे, रामदास गोल्हार, विष्णू फटांगडे, जनार्दन पटारे, माणिकराव थोरात, जगन्नाथ कोरडे, सुधाकर लांडे, दादा गंडाळ, बबनराव भुसारी, तुकाराम मिसाळ, डॉ. रावसाहेब फुलारी, रामनाथ राजापूरे, निवृत्ती दातीर, अशोकराव मिसाळ, जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे, गणेश गव्हाणे, अशोक वायकर, बापूसाहेब नजन, संजय कोळगे, कामगार संचालक सुखदेव फुलारी, बापूसाहेब सुपारे, कामगार संघटनेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब चौधरी, संभाजी माळवदे, मछिंद्र साळुंके, भानुदास भोसले, मछिंद्र वेताळ, भानुदास कावरे, प्रकाश कुटे, गोरक्षनाथ कापसे, देविदास साळुंके, सांस्कृतिक मंडळाचे उपाध्यक्ष सीताराम चौधरी, सचिव कृष्णा उगले, सहसचिव दत्तात्रय चोपडे, खजिनदार कारभारी गरड, सहखजिनदार कृष्णा बारगुजे आदी उपस्थित होते. सरव्यवस्थापक काकासाहेब शिंदे यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. भाऊसाहेब सावंत, अशोक सागडे यांनी सूत्र संचालन केले. संचालक मोहनराव देशमुख यांनी आभार मानले.
---------------
कोट
भारत हा सर्वांत तरुण देश आहे. होतकरू तरुणांना आणि विद्यार्थ्यांनाही जगात अनेक संधी उपलब्ध आहेत. फक्त त्या संधी शोधा. घरापासून दूर जाण्याची तयारी ठेवा आणि जे कराल ते सर्वोत्तम आणि गुणवत्तापूर्णच असले पाहिजे.
हणमंतराव गायकवाड
अध्यक्ष, बीव्हीजी ग्रुप
-------------------------
फोटो ओळी
--------
हणमंतराव गायकवाड यांना 'मारुतरावजी घुले पाटील स्मृती पुरस्कार' प्रदान करताना ज्ञानेश्वर उद्योग समूहाचे प्रमुख मार्गदर्शक माजी आमदार डॉ. नरेंद्र घुले. या वेळी चंद्रशेखर घुले, पांडुरंग अभंग, देसाई देशमुख, डॉ. क्षितिज घुले, काकासाहेब नरवडे, विठ्ठलराव लंघे, काशिनाथ नवले, अनिल शेवाळे, सुखदेव फुलारी, कृष्णा उगले आदी.