म.टा.प्रतिनिधी,नगर
‘सत्ताधारी पक्षांनी निवडणुकीपूर्वी सर्व शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचा शब्द दिला होता. परंतु आज जी कर्जमाफी जाहीर करण्यात आली त्यातून हा शब्द पाळला गेला नसल्याचे दिसून येते. सरकारने सर्व शेतकऱ्यांचे सर्व कर्ज माफ केले पाहिजे,’ अशी प्रतिक्रिया विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली. प्रसारमाध्यमांशी बोलताना विखे म्हणाले, ‘हा निर्णय दोन वर्षांपूर्वी झाला असता तर हजारो शेतकऱ्यांचे प्राण वाचले असते. आपले हे पाप लपविण्यासाठीच या योजनेला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात आले. शिवसेनाही सर्वच शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करण्याची मागणी करीत होती. त्यासाठी त्यांनी सरकारबाहेर पडण्याचीही वल्गना केली होती. तीच शिवसेना आता सरसकटऐवजी दीड लाखांच्या मर्यादेवर राजी कशी झाली? सरकारला हे शहाणपण येण्यामागे विरोधी पक्षांच्या संघर्ष यात्रेचे मोठे योगदान आहे. संघर्ष यात्रेनंतर राज्यभरात पेटलेल्या शेतकऱ्यांच्या स्वयंस्फुर्त आंदोलनाचा दबाव निर्माण झाल्याने सरकारला हा निर्णय घेणे भाग पडले.’
‘सत्ताधारी पक्षांनी निवडणुकीपूर्वी सर्व शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचा शब्द दिला होता. परंतु आज जी कर्जमाफी जाहीर करण्यात आली त्यातून हा शब्द पाळला गेला नसल्याचे दिसून येते. सरकारने सर्व शेतकऱ्यांचे सर्व कर्ज माफ केले पाहिजे,’ अशी प्रतिक्रिया विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली. प्रसारमाध्यमांशी बोलताना विखे म्हणाले, ‘हा निर्णय दोन वर्षांपूर्वी झाला असता तर हजारो शेतकऱ्यांचे प्राण वाचले असते. आपले हे पाप लपविण्यासाठीच या योजनेला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात आले. शिवसेनाही सर्वच शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करण्याची मागणी करीत होती. त्यासाठी त्यांनी सरकारबाहेर पडण्याचीही वल्गना केली होती. तीच शिवसेना आता सरसकटऐवजी दीड लाखांच्या मर्यादेवर राजी कशी झाली? सरकारला हे शहाणपण येण्यामागे विरोधी पक्षांच्या संघर्ष यात्रेचे मोठे योगदान आहे. संघर्ष यात्रेनंतर राज्यभरात पेटलेल्या शेतकऱ्यांच्या स्वयंस्फुर्त आंदोलनाचा दबाव निर्माण झाल्याने सरकारला हा निर्णय घेणे भाग पडले.’