म. टा. प्रतिनिधी, नगर
आरोग्य विभागाकडून पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांतील पाण्याची तपासणी केली जाते. मागील फेब्रुवारी महिन्यात केलेल्या तपासणीचा अहवाल जिल्हा परिषदेस मिळाला असून जवळपास ७८ गावांतील १२७ पाणी नमुने दूषित आढळले आहेत. या स्रोतांतील पाणी शुद्धीकरण प्रक्रिया राबवण्याच्या सूचना संबंधित ग्रामपंचायतींना देण्यात आल्या आहेत.
आरोग्य विभाग व भूजल विभागाकडून पिण्याच्या पाण्याची जैविक तपासणी दर महिन्यातून एकदा केली जाते. फेब्रुवारी महिन्यात जिल्ह्यातील १ हजार ३५० पाणी नमुने तपासण्यात आले. यातील १२७ नमुने दूषित आढळले आहेत. यामध्ये राहुरी १४, संगमनेर ९, अकोले ११, पारनेर २, नेवासे ११, पाथर्डी ६, नगर २८, शेवगाव ६, कोपरगाव ८, राहाता २, श्रीरामपूर ८ आणि श्रीगोंदे तालुक्यातील २२ असे एकूण १२७ पाणी नमुने दूषित आढळले. या स्रोतातील पाणी शुद्ध करणे आवश्यक असल्याने ग्रामपंचायतींनी स्रोतांचा परिसर स्वच्छ करून पाणी शुद्धीकरणासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत. ग्रामपंचायतींनी काय कार्यवाही केली याचीही माहिती घेतली जाणार असल्याचे सांगण्यात आले.
आरोग्य विभागाकडून पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांतील पाण्याची तपासणी केली जाते. मागील फेब्रुवारी महिन्यात केलेल्या तपासणीचा अहवाल जिल्हा परिषदेस मिळाला असून जवळपास ७८ गावांतील १२७ पाणी नमुने दूषित आढळले आहेत. या स्रोतांतील पाणी शुद्धीकरण प्रक्रिया राबवण्याच्या सूचना संबंधित ग्रामपंचायतींना देण्यात आल्या आहेत.
आरोग्य विभाग व भूजल विभागाकडून पिण्याच्या पाण्याची जैविक तपासणी दर महिन्यातून एकदा केली जाते. फेब्रुवारी महिन्यात जिल्ह्यातील १ हजार ३५० पाणी नमुने तपासण्यात आले. यातील १२७ नमुने दूषित आढळले आहेत. यामध्ये राहुरी १४, संगमनेर ९, अकोले ११, पारनेर २, नेवासे ११, पाथर्डी ६, नगर २८, शेवगाव ६, कोपरगाव ८, राहाता २, श्रीरामपूर ८ आणि श्रीगोंदे तालुक्यातील २२ असे एकूण १२७ पाणी नमुने दूषित आढळले. या स्रोतातील पाणी शुद्ध करणे आवश्यक असल्याने ग्रामपंचायतींनी स्रोतांचा परिसर स्वच्छ करून पाणी शुद्धीकरणासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत. ग्रामपंचायतींनी काय कार्यवाही केली याचीही माहिती घेतली जाणार असल्याचे सांगण्यात आले.