म. टा. प्रतिनिधी, नगर
'जायकवाडी धरणाच्या लाभक्षेत्रात सध्या पिण्याच्या पाण्याची गरज नाही. मात्र, समन्यायी पाणी वाटपाचा कायदा झाल्याने नगर-नाशिकला स्वतः दुष्काळ सहन करीत पाणी देणे भाग आहे. तत्कालीन सरकार आणि लोकप्रतिनिधींनी वेळीच लक्ष घातले असते, तर असा अन्यायकारक कायदा झाला नसता,' अशी टीका राज्याचे जलसंधारण मंत्री तथा नगरचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी केली. या कायद्याचा फेरआढावा घेण्याची वेळ आल्याचेही ते म्हणाले.
शिंदे सध्या जिल्ह्यातील दुष्काळी भागाची पाहणी करीत आहेत. शनिवारी त्यांनी संगमनेर आणि राहाता तालुक्यात ठिकठिकाणी भेटी दिल्या. संगमनेरमध्ये पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, 'नगर व नाशिक जिल्ह्यात सध्या दुष्काळी परिस्थिती आहे. येथील लोकांचे पाण्याचे हाल आहेत, तर दुसरीकडे जायकवाडीला पिण्याच्या पाण्याची गरज नाही. पिण्यासाठी पाणी देण्यास कोणाची हरकत नाही. मात्र, गरज नसताना एका भागावर अन्याय करून तेथील पाणी दुसऱ्या भागाला देणे योग्य नाही. आपल्याकडे दुष्काळ असताना डोळ्यादेखत खाली पाणी जाताना पाहणे येथील लोकांसाठी क्लेषदायक आहे. मात्र, समन्यायी पाणी वाटपाचा कायदा आणि त्यासंबंधी कोर्टाचा आदेश असल्याने सध्या सरकारला पाणी सोडणे क्रमप्राप्त आहे. पूर्वीचे सरकार आणि लोकप्रतिनिधींनी या प्रश्नात नीट लक्ष घातले असते, तर ही वेळ आली नसती. दर पाच वर्षांनी यांचा आढावा घेण्याची गरज आहे. त्यानुसार आता याचा पुन्हा एकदा आढावा घेऊन काही बदल करता येऊ शकतील. पाच वर्षांनंतर काय स्थिती आहे, या पडताळणीची आवश्यकता आहे. अन्याय होत राहिला, तर जवळच्या माणसाला पिण्यासाठी पाणी नाही आणि दूरच्या माणसांना ते दिले जाते, अशी स्थिती निर्माण होईल. पिण्यासाठी पाणी दिले पाहिजे, मात्र पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आता जायकवाडीत नाही. अशा स्थितीत पाणी जायकवाडीला जात असल्याने याचा विचार व्हायला हवा.'
'जायकवाडी धरणाच्या लाभक्षेत्रात सध्या पिण्याच्या पाण्याची गरज नाही. मात्र, समन्यायी पाणी वाटपाचा कायदा झाल्याने नगर-नाशिकला स्वतः दुष्काळ सहन करीत पाणी देणे भाग आहे. तत्कालीन सरकार आणि लोकप्रतिनिधींनी वेळीच लक्ष घातले असते, तर असा अन्यायकारक कायदा झाला नसता,' अशी टीका राज्याचे जलसंधारण मंत्री तथा नगरचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी केली. या कायद्याचा फेरआढावा घेण्याची वेळ आल्याचेही ते म्हणाले.
शिंदे सध्या जिल्ह्यातील दुष्काळी भागाची पाहणी करीत आहेत. शनिवारी त्यांनी संगमनेर आणि राहाता तालुक्यात ठिकठिकाणी भेटी दिल्या. संगमनेरमध्ये पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, 'नगर व नाशिक जिल्ह्यात सध्या दुष्काळी परिस्थिती आहे. येथील लोकांचे पाण्याचे हाल आहेत, तर दुसरीकडे जायकवाडीला पिण्याच्या पाण्याची गरज नाही. पिण्यासाठी पाणी देण्यास कोणाची हरकत नाही. मात्र, गरज नसताना एका भागावर अन्याय करून तेथील पाणी दुसऱ्या भागाला देणे योग्य नाही. आपल्याकडे दुष्काळ असताना डोळ्यादेखत खाली पाणी जाताना पाहणे येथील लोकांसाठी क्लेषदायक आहे. मात्र, समन्यायी पाणी वाटपाचा कायदा आणि त्यासंबंधी कोर्टाचा आदेश असल्याने सध्या सरकारला पाणी सोडणे क्रमप्राप्त आहे. पूर्वीचे सरकार आणि लोकप्रतिनिधींनी या प्रश्नात नीट लक्ष घातले असते, तर ही वेळ आली नसती. दर पाच वर्षांनी यांचा आढावा घेण्याची गरज आहे. त्यानुसार आता याचा पुन्हा एकदा आढावा घेऊन काही बदल करता येऊ शकतील. पाच वर्षांनंतर काय स्थिती आहे, या पडताळणीची आवश्यकता आहे. अन्याय होत राहिला, तर जवळच्या माणसाला पिण्यासाठी पाणी नाही आणि दूरच्या माणसांना ते दिले जाते, अशी स्थिती निर्माण होईल. पिण्यासाठी पाणी दिले पाहिजे, मात्र पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आता जायकवाडीत नाही. अशा स्थितीत पाणी जायकवाडीला जात असल्याने याचा विचार व्हायला हवा.'