अ‍ॅपशहर

अनावश्यक खाण्याने वजन वाढीचा धोका : डाॅ. दीक्षित

‘आवश्यकतेपेक्षा जास्त खाणे व शारीरिक श्रमाची कमतरता यामुळे शरीराचे वजन वाढते. अशा स्थितीत कमी आहार, वजन नियंत्रण औषधे वा चरबी काढण्याच्या शस्त्रक्रिया करूनही वजन कमी होत नाही.

Maharashtra Times 11 Jul 2017, 3:00 am
नगर : ‘आवश्यकतेपेक्षा जास्त खाणे व शारीरिक श्रमाची कमतरता यामुळे शरीराचे वजन वाढते. अशा स्थितीत कमी आहार, वजन नियंत्रण औषधे वा चरबी काढण्याच्या शस्त्रक्रिया करूनही वजन कमी होत नाही. मात्र, दिवसभरात दोनदाच जेवणाचा नियम करून कमीतकमी ३ महिने यात सातत्य ठेवणे तसेच गोड कमी खाणे किंवा पूर्ण टाळणे, आहारातील प्रथिने वाढवणे तसेच हवे ते पदार्थ खाऊन वजन नियंत्रित ठेवता येते’, असे प्रतिपादन लातूर येथील डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी येथे केले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम weight gain risk due to unnecessary eating
अनावश्यक खाण्याने वजन वाढीचा धोका : डाॅ. दीक्षित

येथील पी. एम. मुनोत फाउंडेशन व पुण्याच्या पी. एम. शहा फाउंडेशनच्या वतीने धार्मिक परीक्षा बोर्ड येथे झालेल्या ‘डॉक्टर तुमच्या भेटीला’ या उपक्रमात ‘विनासायास वेटलॉस’ या विषयावर डॉ. दीक्षित यांचे व्याख्यान झाले. यावेळी डॉ. खांदवे, अभय देवधर, शरद मुनोत, रमण मेहेर, आदेश चंगेडीया, गिरीश अग्रवाल आदी उपस्थित होते. ‘९९ टक्के लोकांनी लठ्ठपणा स्वतः कमवलेला असतो. चहा, नाष्टा, जेवण, सतत खाणे यामुळे आपल्या शरीरात आवश्यकतेपेक्षा जास्त इंश्युलीन तयार होते. ज्या वेळेस आपण काही खातो, त्यावेळी इन्शुलीन तयार होते. गरजेपेक्षा जास्त इन्शुलीनमुळे मेद अर्थात चरबी वाढते. कमी इन्शुलीन तयार झाले तर शरीरातील फॅट (चरबी) कमी होईल’, असे सांगून डॉ. दीक्षित म्हणाले, ‘दिवसातून दोन वेळा जेवणे फायद्याचे आहे. मधल्या वेळात काहीही खाऊ नका. गरज वाटल्यास घरातील ताक प्या. त्याचबरोबर आठवड्यातले पाच दिवस ४५ मिनिटे भराभर चालले तरी अधिक चांगले ठरते’, असा सल्ला त्यांनी दिला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज