म. टा. वृत्तसेवा, नेवासे
'आर्थिक सुबत्ता असणारी माणसं आनंदाचा क्षण साजरा करण्यासाठी पंचतारांकित हॉटेलमध्ये जातात आणि पिठलं भाकरीच्या एका थाळीला सातशे रुपये देतात. जो शेतकरी कष्ट करून घाम गाळतो त्यांच्या पिठलं भाकरीला मात्र किंमत नसल्याने शेतकऱ्यांच्या पिठलं-भाकरीला कधी किंमत येईल,' असा सवाल आदर्शगाव योजनेचे अध्यक्ष पोपटराव पवार यांनी उपस्थित केला.
नेवासे तालुक्यातील हंडीनिमगाव येथे अक्षय युवा क्रीडा व सामाजिक विकास संस्थेच्या शरणपूर वृद्धाश्रमाचे उद्घाटन व विविध पुरस्कार वितरण पोपटराव पवार यांचे हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. चोपडा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सुरेश पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
या वेळी आमदार बाळासाहेब मुरकुटे, माजी आमदार पांडुरंग अभंग, कॉ. बाबा आरगडे, शोभाताई पोपटराव पवार, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष काशीनाथ नवले, तुकाराम मिसाळ, पंचायत सदस्य किशोर जोजार, पंचायत समिती सदस्य रावसाहेब कांगुणे, सरपंच अण्णासाहेब जावळे, सरपंच दादा निपुंगे, गणेश गव्हाणे, अमोल अभंग, कॉ. बन्सी सातपुते, अशोक कोळेकर, डॉ. हरिदास चिमणे, सुनील गोसावी, भाऊसाहेब सावंत, सुनील गायकवाड, राजेंद्र पवार, संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब मगर, सुरेखा मगर आदी उपस्थित होते.
पोपटराव पवार पुढे म्हणाले, 'कुठल्याही क्षेत्रात काम करीत असताना एकटा माणूस काहीच करू शकत नाही. गाव, प्रसाशान, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील सर्वांचेच सहकार्य लागते. केवळ शिक्षण,वाचन आणि भाषणातून नाही, तर काम करताना आलेल्या अनुभवांतून खालेल्या ठेचा, संघर्ष यातून जे चिंतन होते त्यातूनच खरे जीवनाचे साहित्य निर्माण होते. सामाजिक भान ठेवून काम करताना अर्थार्जन हे दुय्यम असते. त्यामुळेच सामाजिक काम करणारी माणसं आर्थिक दृष्ट्या खूपच मागासलेली असतात. त्याच्या कार्याला समाजातील दानशूर माणसांनी सहकार्य करण्याची आवश्यकता आहे.
पूर्वीच्या काळात पावसावर आधारित पीक पद्धती होती. दगड मातीच्या घरात माणस राहत होती. त्यांच्याकडे आर्थिक श्रीमंती नसेलही पण मनाची आणि माणुसकीची श्रीमंती खूप मोठी होती. गावातील एखाद्या घरात दुःखद घटना घडली तर, अख्ख गाव चूल बंद ठेऊन त्याचे दुःख वाटून घेत होते. आज आर्थिक सुबत्ता वाढली. श्रीमंती वाढली, तशी वृद्धाश्रमांची संख्याही वाढली. सुबत्ता असलेल्या घरातील वृद्धांची अवस्था वाईट आहे. आजचे वृद्ध मानसिक आणि शारीरिक आजाराने हतबल आहेत. ज्या घरात आर्थिक सुबत्ता आहे. त्याच घरातील वृद्धांची अवस्था वाईट असल्याचे पहावयास मिळते, ही बाब मनाला न पटणारी असून वृद्धाश्रमांची वाढती संख्या ही चिंतेची बाब आहे. राजकीय व्यवस्था ही सर्वोच्च व्यवस्था आहे. तिला गटतटाची झालर नको. गावागावात गटतट निर्माण झाले तर विकासकामांना बाधा येते. आता गरज आहे, ती गावे जिवंत ठेवण्याची. त्यामुळे सर्वांनी एकोप्याने राहण्याची गरज आहे.'
आमदार बाळासाहेब मुरकुटे म्हणाले, 'आई-वडिल, देश आणि समाज सेवेतूनच परमेश्वर भेटत असतो. प्रत्येकाने आपली ही तीन कर्तव्ये जबाबदारीने पार पाडली पाहिजेत. या संस्थेच्या माध्यमातून वृद्ध, समाजातील उपेक्षित वंचित व्यक्ती, शेतकरी, युवकांसाठी काम करावे. लोकप्रतिनिधी म्हणून या संस्थेला सर्वोपरी सहकार्य करू. माजी आमदार पांडुरंग अभंग म्हणाले, 'पोटाला चिमटा घेऊन मोठे केले. घडविले. तीच मुलं मोठी झाल्यावर त्या आई-वडिलांना विसरून जातात. ज्या काळात त्यांना आधाराची गरज असते, त्या काळात त्यांना सोडून जातात. ही समाजातील मोठी शोकांतिका आहे. अशा वृद्धांना या संस्थेने मायेचा हात द्यावा. त्यांच्या पाल्यांची भूमिका पार पाडवी,' अशी अपेक्षा मुरकुटे यांनी व्यक्त केली.
कोट
राजकीय व्यवस्था ही सर्वोच्च व्यवस्था आहे. तिला गटतटाची झालर नको. गावागावात गटतट निर्माण झाले तर विकासकामांना बाधा येते. आता गरज आहे, ती गावे जिवंत ठेवण्याची. त्यामुळे सर्वांनी एकोप्याने राहण्याची गरज आहे.
पोपटराव पवार
अध्यक्ष, आदर्शगाव योजना
'आर्थिक सुबत्ता असणारी माणसं आनंदाचा क्षण साजरा करण्यासाठी पंचतारांकित हॉटेलमध्ये जातात आणि पिठलं भाकरीच्या एका थाळीला सातशे रुपये देतात. जो शेतकरी कष्ट करून घाम गाळतो त्यांच्या पिठलं भाकरीला मात्र किंमत नसल्याने शेतकऱ्यांच्या पिठलं-भाकरीला कधी किंमत येईल,' असा सवाल आदर्शगाव योजनेचे अध्यक्ष पोपटराव पवार यांनी उपस्थित केला.
नेवासे तालुक्यातील हंडीनिमगाव येथे अक्षय युवा क्रीडा व सामाजिक विकास संस्थेच्या शरणपूर वृद्धाश्रमाचे उद्घाटन व विविध पुरस्कार वितरण पोपटराव पवार यांचे हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. चोपडा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सुरेश पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
या वेळी आमदार बाळासाहेब मुरकुटे, माजी आमदार पांडुरंग अभंग, कॉ. बाबा आरगडे, शोभाताई पोपटराव पवार, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष काशीनाथ नवले, तुकाराम मिसाळ, पंचायत सदस्य किशोर जोजार, पंचायत समिती सदस्य रावसाहेब कांगुणे, सरपंच अण्णासाहेब जावळे, सरपंच दादा निपुंगे, गणेश गव्हाणे, अमोल अभंग, कॉ. बन्सी सातपुते, अशोक कोळेकर, डॉ. हरिदास चिमणे, सुनील गोसावी, भाऊसाहेब सावंत, सुनील गायकवाड, राजेंद्र पवार, संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब मगर, सुरेखा मगर आदी उपस्थित होते.
पोपटराव पवार पुढे म्हणाले, 'कुठल्याही क्षेत्रात काम करीत असताना एकटा माणूस काहीच करू शकत नाही. गाव, प्रसाशान, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील सर्वांचेच सहकार्य लागते. केवळ शिक्षण,वाचन आणि भाषणातून नाही, तर काम करताना आलेल्या अनुभवांतून खालेल्या ठेचा, संघर्ष यातून जे चिंतन होते त्यातूनच खरे जीवनाचे साहित्य निर्माण होते. सामाजिक भान ठेवून काम करताना अर्थार्जन हे दुय्यम असते. त्यामुळेच सामाजिक काम करणारी माणसं आर्थिक दृष्ट्या खूपच मागासलेली असतात. त्याच्या कार्याला समाजातील दानशूर माणसांनी सहकार्य करण्याची आवश्यकता आहे.
पूर्वीच्या काळात पावसावर आधारित पीक पद्धती होती. दगड मातीच्या घरात माणस राहत होती. त्यांच्याकडे आर्थिक श्रीमंती नसेलही पण मनाची आणि माणुसकीची श्रीमंती खूप मोठी होती. गावातील एखाद्या घरात दुःखद घटना घडली तर, अख्ख गाव चूल बंद ठेऊन त्याचे दुःख वाटून घेत होते. आज आर्थिक सुबत्ता वाढली. श्रीमंती वाढली, तशी वृद्धाश्रमांची संख्याही वाढली. सुबत्ता असलेल्या घरातील वृद्धांची अवस्था वाईट आहे. आजचे वृद्ध मानसिक आणि शारीरिक आजाराने हतबल आहेत. ज्या घरात आर्थिक सुबत्ता आहे. त्याच घरातील वृद्धांची अवस्था वाईट असल्याचे पहावयास मिळते, ही बाब मनाला न पटणारी असून वृद्धाश्रमांची वाढती संख्या ही चिंतेची बाब आहे. राजकीय व्यवस्था ही सर्वोच्च व्यवस्था आहे. तिला गटतटाची झालर नको. गावागावात गटतट निर्माण झाले तर विकासकामांना बाधा येते. आता गरज आहे, ती गावे जिवंत ठेवण्याची. त्यामुळे सर्वांनी एकोप्याने राहण्याची गरज आहे.'
आमदार बाळासाहेब मुरकुटे म्हणाले, 'आई-वडिल, देश आणि समाज सेवेतूनच परमेश्वर भेटत असतो. प्रत्येकाने आपली ही तीन कर्तव्ये जबाबदारीने पार पाडली पाहिजेत. या संस्थेच्या माध्यमातून वृद्ध, समाजातील उपेक्षित वंचित व्यक्ती, शेतकरी, युवकांसाठी काम करावे. लोकप्रतिनिधी म्हणून या संस्थेला सर्वोपरी सहकार्य करू. माजी आमदार पांडुरंग अभंग म्हणाले, 'पोटाला चिमटा घेऊन मोठे केले. घडविले. तीच मुलं मोठी झाल्यावर त्या आई-वडिलांना विसरून जातात. ज्या काळात त्यांना आधाराची गरज असते, त्या काळात त्यांना सोडून जातात. ही समाजातील मोठी शोकांतिका आहे. अशा वृद्धांना या संस्थेने मायेचा हात द्यावा. त्यांच्या पाल्यांची भूमिका पार पाडवी,' अशी अपेक्षा मुरकुटे यांनी व्यक्त केली.
कोट
राजकीय व्यवस्था ही सर्वोच्च व्यवस्था आहे. तिला गटतटाची झालर नको. गावागावात गटतट निर्माण झाले तर विकासकामांना बाधा येते. आता गरज आहे, ती गावे जिवंत ठेवण्याची. त्यामुळे सर्वांनी एकोप्याने राहण्याची गरज आहे.
पोपटराव पवार
अध्यक्ष, आदर्शगाव योजना