म. टा. प्रतिनिधी, नगर
लोकसभा निवडणुकीपूर्वीच्या घडामोडी आणि निकालानंतर समोर आलेला दारूण पराभव यामुळे जिल्ह्यात राष्ट्रवादीपेक्षाही काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. ना जिल्हाध्यक्ष ना संपूर्ण जिल्ह्यात संपर्क असलेला नेता, अशा परिस्थितीत पक्षाच्या कार्यकर्त्यांना धीर कोण देणार, हा प्रश्न असतानाच विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्यासमवेत भारतीय जनता पक्षात कोण कोण जाणार, याची चर्चा आता सुरू झाली आहे.
विखेंनी भाजपशी जवळीक केल्यानंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर काँग्रेसची जबाबदारी येऊन पडली. लोकसभा निवडणुकीनंतर त्यांनी जोमाने कामाला सुरुवात केली. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांचा दौरा घडवून आणत त्यांनी काँग्रेसला बळ देण्याचा प्रयत्न केला. मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसशीही चांगले संबंध ठेवले. अर्थात याला यश आले नाही. सध्या पक्षाला जिल्हाध्यक्ष नाही. जिल्हा आणि तालुकास्तरावरील बहुतांश कार्यकर्ते विखेंसोबत आहेत. विखे यांच्या अधिकृत भाजप प्रवेशासोबत तेही भाजपमध्ये जातील. थोरात यांना पुन्हा पक्षबांधणीसाठी काम करावे लागणार आहे. मात्र, त्याचवेळी त्यांना स्वत:च्या संगमनेर मतदारसंघातही लक्ष द्यावे लागणार आहे. लोकसभा निवडणुकीत तेथेही पक्षाची पिछेहाट झाली आहे. त्यामुळे विधानसभेपूर्वी त्यांना तेथील वातावरण पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. अशा परिस्थितीत त्यांना जिल्ह्यात फिरून पक्षसंघटना बांधणी करणे जिकरीचे ठरणार आहे. शिवाय विखेंसोबत जाऊन उरलेल्यांना सोबत घेऊन काम करावे लागणार आहे. बदलत्या परिस्थितीत पक्षात नवीन आवक होण्याची फारशी शक्यता नाही.
राज्यातील काँग्रेस नेत्यांमध्ये जी मुख्यमंत्रिपदाची स्पर्धा होती, त्यातून पक्षाचे नुकसान झाल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. विखे यांनी निकालानंतरच्या प्रतिक्रियेत ती बोलून दाखविली आहे. एकमेकांना मोठे होऊ न देता आपला मार्ग सुकर करण्यावरच बहुतांश नेत्यांचा भर होता. लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना पुढील विचार करून तशी खेळी खेळली जात होती. पक्षाच्या वरिष्ठ वर्तुळात संपर्क वाढविण्यासोबत मित्रपक्षाशी दोस्ती करून त्यांच्याकडूनही अनुकूलता मिळविण्याचे प्रयत्न सुरू होते. नगर जिल्ह्यातही यातील काही खेळ्या खेळल्या गेल्या. मित्रपक्षाच्या नेत्यांनी यात आपली सोय पाहता काँग्रेसमध्ये होता होईल तेवढा सत्तासंघर्ष निर्माण करून देण्यास प्राधान्य दिल्याचे दिसून येते.
आता यातून सावरण्यासाठी प्रयत्न सुरू होणे अपेक्षित असताना केंद्रीय पातळीपासूनच राजीनाम्याची भाषा बोलली जाऊ लागली आहे. त्यामुळे सामान्य कार्यकर्ते संभ्रमात पडले आहेत. पक्ष संघटनेची बांधणी करणे, कार्यकर्त्यांना बळ देणे, विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार शोधून त्यांच्यासाठी वातावरण निर्माण करणे, मित्रपक्षांसोबतचे जागावाटप आणि मुख्य म्हणजे काँग्रेसचा बेस असलेल्या घटकांना दुरावू न देता पक्षासोबत बांधून ठेवण्याचे काम आता करावे लागणार आहे. मात्र, अशा परिस्थितीत पक्षाकडे सर्वसमावेशक नेतृत्व, पदाधिकारी आणि काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा अभाव असल्याचे चित्र जिल्ह्यात दिसत आहे.
विखेंच्या मुहूर्ताची प्रतीक्षा
आता कार्यकर्त्यांचा आग्रह मोडता येणार नाही, असे म्हणत भाजप प्रवेशाची तयारी केलेले राधाकृष्ण विखे पाटील यांचा पक्षप्रवेशाचा निर्णय केंद्रातील मोदी सरकारच्या शपथविधीनंतर होतो की त्यापूर्वी याची आता उत्सुकता आहे. आतापर्यंत कार्यकर्ते त्यांना प्रवेशासाठी गळ घालत होते, आता खासदार झालेल्या पुत्रानेही त्यांना पक्षात येण्यासाठी गळ घातली आहे.
लोकसभा निवडणुकीपूर्वीच्या घडामोडी आणि निकालानंतर समोर आलेला दारूण पराभव यामुळे जिल्ह्यात राष्ट्रवादीपेक्षाही काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. ना जिल्हाध्यक्ष ना संपूर्ण जिल्ह्यात संपर्क असलेला नेता, अशा परिस्थितीत पक्षाच्या कार्यकर्त्यांना धीर कोण देणार, हा प्रश्न असतानाच विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्यासमवेत भारतीय जनता पक्षात कोण कोण जाणार, याची चर्चा आता सुरू झाली आहे.
विखेंनी भाजपशी जवळीक केल्यानंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर काँग्रेसची जबाबदारी येऊन पडली. लोकसभा निवडणुकीनंतर त्यांनी जोमाने कामाला सुरुवात केली. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांचा दौरा घडवून आणत त्यांनी काँग्रेसला बळ देण्याचा प्रयत्न केला. मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसशीही चांगले संबंध ठेवले. अर्थात याला यश आले नाही. सध्या पक्षाला जिल्हाध्यक्ष नाही. जिल्हा आणि तालुकास्तरावरील बहुतांश कार्यकर्ते विखेंसोबत आहेत. विखे यांच्या अधिकृत भाजप प्रवेशासोबत तेही भाजपमध्ये जातील. थोरात यांना पुन्हा पक्षबांधणीसाठी काम करावे लागणार आहे. मात्र, त्याचवेळी त्यांना स्वत:च्या संगमनेर मतदारसंघातही लक्ष द्यावे लागणार आहे. लोकसभा निवडणुकीत तेथेही पक्षाची पिछेहाट झाली आहे. त्यामुळे विधानसभेपूर्वी त्यांना तेथील वातावरण पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. अशा परिस्थितीत त्यांना जिल्ह्यात फिरून पक्षसंघटना बांधणी करणे जिकरीचे ठरणार आहे. शिवाय विखेंसोबत जाऊन उरलेल्यांना सोबत घेऊन काम करावे लागणार आहे. बदलत्या परिस्थितीत पक्षात नवीन आवक होण्याची फारशी शक्यता नाही.
राज्यातील काँग्रेस नेत्यांमध्ये जी मुख्यमंत्रिपदाची स्पर्धा होती, त्यातून पक्षाचे नुकसान झाल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. विखे यांनी निकालानंतरच्या प्रतिक्रियेत ती बोलून दाखविली आहे. एकमेकांना मोठे होऊ न देता आपला मार्ग सुकर करण्यावरच बहुतांश नेत्यांचा भर होता. लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना पुढील विचार करून तशी खेळी खेळली जात होती. पक्षाच्या वरिष्ठ वर्तुळात संपर्क वाढविण्यासोबत मित्रपक्षाशी दोस्ती करून त्यांच्याकडूनही अनुकूलता मिळविण्याचे प्रयत्न सुरू होते. नगर जिल्ह्यातही यातील काही खेळ्या खेळल्या गेल्या. मित्रपक्षाच्या नेत्यांनी यात आपली सोय पाहता काँग्रेसमध्ये होता होईल तेवढा सत्तासंघर्ष निर्माण करून देण्यास प्राधान्य दिल्याचे दिसून येते.
आता यातून सावरण्यासाठी प्रयत्न सुरू होणे अपेक्षित असताना केंद्रीय पातळीपासूनच राजीनाम्याची भाषा बोलली जाऊ लागली आहे. त्यामुळे सामान्य कार्यकर्ते संभ्रमात पडले आहेत. पक्ष संघटनेची बांधणी करणे, कार्यकर्त्यांना बळ देणे, विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार शोधून त्यांच्यासाठी वातावरण निर्माण करणे, मित्रपक्षांसोबतचे जागावाटप आणि मुख्य म्हणजे काँग्रेसचा बेस असलेल्या घटकांना दुरावू न देता पक्षासोबत बांधून ठेवण्याचे काम आता करावे लागणार आहे. मात्र, अशा परिस्थितीत पक्षाकडे सर्वसमावेशक नेतृत्व, पदाधिकारी आणि काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा अभाव असल्याचे चित्र जिल्ह्यात दिसत आहे.
विखेंच्या मुहूर्ताची प्रतीक्षा
आता कार्यकर्त्यांचा आग्रह मोडता येणार नाही, असे म्हणत भाजप प्रवेशाची तयारी केलेले राधाकृष्ण विखे पाटील यांचा पक्षप्रवेशाचा निर्णय केंद्रातील मोदी सरकारच्या शपथविधीनंतर होतो की त्यापूर्वी याची आता उत्सुकता आहे. आतापर्यंत कार्यकर्ते त्यांना प्रवेशासाठी गळ घालत होते, आता खासदार झालेल्या पुत्रानेही त्यांना पक्षात येण्यासाठी गळ घातली आहे.