अ‍ॅपशहर

'वंदे मातरम' म्हणायला त्रास का व्हावा?: नायडू

''वंदे मातरम' या राष्ट्रीय गीताचा अर्थ आईला अभिवादन करणे असा आहे. या गीताने देशाच्या स्वांतत्र्य चळवळीतील लाखो लोकांना प्रेरित केले आहे. तर मग वंदे मातरम म्हणण्याचा कोणाला त्रास का व्हावा?', असा सवाल उपस्थित करत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी पुन्हा एकदा 'वंदे मातरम'शी संबंधित चर्चेला तोंड फोडले आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 Dec 2017, 6:48 pm
शिर्डी: ''वंदे मातरम' या राष्ट्रीय गीताचा अर्थ आईला अभिवादन करणे असा आहे. या गीताने देशाच्या स्वांतत्र्य चळवळीतील लाखो लोकांना प्रेरित केले आहे. तर मग वंदे मातरम म्हणण्याचा कोणाला त्रास का व्हावा?', असा सवाल उपस्थित करत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी पुन्हा एकदा 'वंदे मातरम'शी संबंधित चर्चेला तोंड फोडले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम why people should have a problem with singing vande mataram says venkaiah naidu
'वंदे मातरम' म्हणायला त्रास का व्हावा?: नायडू


अहमदनगरमधील शिर्डी येथील साईबाबा संस्थानातर्फे आयोजित ग्लोबल साई मंदिर ट्रस्ट संमेलनाचे उद्घाटन उपराष्ट्रपती नायडू यांनी केले. त्यावेळी ते बोलत होते.

'आई हे छायाचित्र नाही, तर ती आमची मातृभूमी आहे. 'वंदे मातरम'द्वारे आईला सलाम केला जातो. यामुळे कुणाला काही आक्षेप का असावा! आमची जात, पंथ आणि धर्म वेगवेगळे असले तरी आम्ही एक राष्ट्र, एक व्यक्ती आणि एक देश आहोत, अशा शब्दांत उपराष्ट्रपतींनी पुन्हा एकदा 'वंदे मातरम' हे राष्ट्रीय गीत म्हणण्याबाबत आपली भूमिका मांडली.

'२०व्या शतकातील संत साईबाबा यांच्या हिंदू वा मुस्लिम होण्याचा मुद्दा अनावश्यक आहे. ते एक सार्वभौम शिक्षक होते. ते एक हिंदू धर्म आणि सूफीवादाच्या महत्त्वपूर्ण सिद्धांताचे मिश्रण होते', अशा शब्दांत उपराष्ट्रपतींनी साईबाबांचा गौरव केला. 'मानवतेची सेवा आणि अन्य धर्मियांसोबत शांती आणि सद्भावासह राहण्याची साईबाबांची शिकवण सर्वच लोकांनी आत्मसात केली पाहिजे. हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असा संदेश नायडू यांनी उपस्थितांना दिला

'मानवतेची सेवा हीच ईश्वराची सेवा आहे आणि साईबाबा हे याच संस्कृतीचे एक अवतार होते', असेही उपराष्ट्रपती पुढे म्हणाले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज