अ‍ॅपशहर

गिरणीत अडकून महिलेचा मृत्यू

राजूर शहरातील चोथवे राइस मिलमध्ये दळण टाकत असताना साडीचा पदर गिरणीच्या पट्ट्यावर पडल्याने पट्ट्यात ओढल्या गेल्याने सुनीता किरण चोथवे (वय ४०) यांचा उजवा हात व डोके शरीरापासून वेगळे होऊन जागीच मृत्यू झाला.

Maharashtra Times 14 Sep 2016, 11:29 am
अकोले : राजूर शहरातील चोथवे राइस मिलमध्ये दळण टाकत असताना साडीचा पदर गिरणीच्या पट्ट्यावर पडल्याने पट्ट्यात ओढल्या गेल्याने सुनीता किरण चोथवे (वय ४०) यांचा उजवा हात व डोके शरीरापासून वेगळे होऊन जागीच मृत्यू झाला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम woman to death
गिरणीत अडकून महिलेचा मृत्यू


सकाळी नऊ वाजता चोथवे राइस मिलचे मालक किरण चोथवे हे खरेदीसाठी नाशिकला गेले होते. त्यामुळे त्यांच्या पत्नी सुनीता काम पाहत होत्या. त्यांच्यासोबत गिरणीचा कर्मचारीही उपस्थित होता.

दुपारी दीड वाजता दळण टाकण्याचा प्रयत्न करीत असतांना त्यांच्या साडीचा पदर पट्ट्यावर पडला. काही क्षणात त्या पट्ट्यावर आडव्या झाल्याने त्यांचे डोके व उजवा हात शरीरापासून वेगळा झाला. कर्मचाऱ्याने ताबडतोब गिरणी बंद केली. जोरात आवाज आल्याने त्यांचे दीर राजेश चोथवे व शेजारी धावत आले. मात्र, उपयोग झाला नाही. सहायक पोलिस निरीक्षक भरत जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पती व मुलगा राजेश यांच्या आक्रोशामुळे उपस्थितांनाही अश्रू आवरता आले नाहीत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज