अकोला: अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू (Bachchu Kadu) यांना दिलासा देत अकोला जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. त्यांना ९ मेपर्यंत अटक करू नये असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. कडू यांच्यावर रस्त्यांच्या कामांत १ कोटी ९५ लाखांचा अपहार केल्याच्या आरोप आहे. या प्रकरणी त्यांच्याविरोधात विविध कलमान्वये अकोल्यातील सिटी कोतवाली पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बच्चू कडू यांनी आज अकोला जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे. त्यावर सुनावणी होऊन त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला. (Bachchu Kadu granted pre arrest bail) अकोल्यातील जिल्हा परिषदेकडून जिल्हा नियोजन समितीकडे पाठविलेल्या रस्त्यांच्या प्रस्तावामध्ये परस्पर बदल करून बच्चू कडूंनी १ कोटी ९५ लाखांचा निधीचा अपहार केला, असा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे. या संदर्भात वंचितने राज्यपालांकडे बच्चू कडू यांच्यावर कारवाईसाठी परवानगी मागितली होती. आता न्यायालयाने या प्रकरणात अपहार झाल्याचे प्राथमिक मत नोंदवत गुन्हे दाखल करण्याचे आदेश सिटी कोतवाली पोलिसांना दिले. या प्रकरणी पोलिसांनी ४०४, ४०९, ४६८, ४७१, ४२० या विविध कलमान्वये नुसार गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीने या'संदर्भात अकोला न्यायालयात अर्ज केला होता. हा अर्ज न्यायालयाने मंजूर करून तो निकाली काढत थेट सिटी कोतवाली पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात होते.
क्लिक करा आणि वाचा- अकोल्यात आईने स्वतःच्याच मुलीला लग्नासाठी विकलं केवळ ८० हजार रुपयांत
बच्चू कडूंविरुद्ध पुरावेच नसल्याचा पोलीस अधीक्षकांनी दिला होता अहवाल
ग्रामीण भागातील रस्ते, पुलाच्या कामात अनियमिता झाल्याप्रकरणी पालकमंत्री बच्चू कडू यांच्यावर गुन्हा दाखल करणे आणि चौकशीसाठी परवानगी मिळावी, याकरीता वंचित बहूजन आघाडीचे एड. प्रकाश आंबेडकर यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. त्यांना सविस्तर निवेदन आणि काही दस्तावेजही सादर केले, याची दखल घेत राज्यपालांनी, 'या'प्रकरणी योग्य कारवाई करा, असे निर्देश अकोल्याच्या पोलिस अधीक्षकांना दिले होते. दरम्यान, या संदर्भात चौकशी अकोल्याच्या आर्थिक गुन्हे शाखेने केली होती. मात्र, 'या प्रकरणात प्रथमदर्शनी गुन्हा नोंदवण्याएवढे पुरावे नाहीत,' असा अहवाल पोलिस अधीक्षकांनी राजभवनाला सादर केला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. एकूणच या प्रकरणात कडू यांना राज्यपालांसमोर 'क्लिनचीट' देण्याचा प्रयत्न झाला होता, हे सदर अहवालातून स्पष्ट होत आहे.
क्लिक करा आणि वाचा- माणूसकीचे दर्शन! 'या' निराधार कुटुंबाला मिळणार हक्काचं 'आपलं घर'
'या' तीन रस्त्यांच्या कामात अपहाराचा आरोप...
मंत्री बच्चू कडू यांच्यावर गायगाव ते रिधोरा या रस्त्याला जोडणारा लहान पूल आणि पोचमार्गाच्या कामात ५० लाखांच्या अपहाराचा आरोप करण्यात आला आहे. इतर जिल्हा मार्गाला (इजिमा) जोडणाऱ्या धामना ते नवीन धामना जोड रस्ता सुधारणेच्या कामात २० लाखांच्या अपहाराचा आरोप, कुटासा ते पिंपळोद मार्गाला जिल्हा मार्ग मार्ग दाखवत यासाठी निधी वळता करीत १ कोटी २५ लाखांच्या अपहाराचा आरोप वंचितने केला आहे. पालकमंत्री कडू यांनी मात्र सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
क्लिक करा आणि वाचा- अत्यंत धक्कादायक! एकाच कुटुंबातील तिघांचा आत्महत्येचा प्रयत्न; पत्नीची अवस्था पाहून पतीने...
क्लिक करा आणि वाचा- अकोल्यात आईने स्वतःच्याच मुलीला लग्नासाठी विकलं केवळ ८० हजार रुपयांत
बच्चू कडूंविरुद्ध पुरावेच नसल्याचा पोलीस अधीक्षकांनी दिला होता अहवाल
ग्रामीण भागातील रस्ते, पुलाच्या कामात अनियमिता झाल्याप्रकरणी पालकमंत्री बच्चू कडू यांच्यावर गुन्हा दाखल करणे आणि चौकशीसाठी परवानगी मिळावी, याकरीता वंचित बहूजन आघाडीचे एड. प्रकाश आंबेडकर यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. त्यांना सविस्तर निवेदन आणि काही दस्तावेजही सादर केले, याची दखल घेत राज्यपालांनी, 'या'प्रकरणी योग्य कारवाई करा, असे निर्देश अकोल्याच्या पोलिस अधीक्षकांना दिले होते. दरम्यान, या संदर्भात चौकशी अकोल्याच्या आर्थिक गुन्हे शाखेने केली होती. मात्र, 'या प्रकरणात प्रथमदर्शनी गुन्हा नोंदवण्याएवढे पुरावे नाहीत,' असा अहवाल पोलिस अधीक्षकांनी राजभवनाला सादर केला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. एकूणच या प्रकरणात कडू यांना राज्यपालांसमोर 'क्लिनचीट' देण्याचा प्रयत्न झाला होता, हे सदर अहवालातून स्पष्ट होत आहे.
क्लिक करा आणि वाचा- माणूसकीचे दर्शन! 'या' निराधार कुटुंबाला मिळणार हक्काचं 'आपलं घर'
'या' तीन रस्त्यांच्या कामात अपहाराचा आरोप...
मंत्री बच्चू कडू यांच्यावर गायगाव ते रिधोरा या रस्त्याला जोडणारा लहान पूल आणि पोचमार्गाच्या कामात ५० लाखांच्या अपहाराचा आरोप करण्यात आला आहे. इतर जिल्हा मार्गाला (इजिमा) जोडणाऱ्या धामना ते नवीन धामना जोड रस्ता सुधारणेच्या कामात २० लाखांच्या अपहाराचा आरोप, कुटासा ते पिंपळोद मार्गाला जिल्हा मार्ग मार्ग दाखवत यासाठी निधी वळता करीत १ कोटी २५ लाखांच्या अपहाराचा आरोप वंचितने केला आहे. पालकमंत्री कडू यांनी मात्र सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
क्लिक करा आणि वाचा- अत्यंत धक्कादायक! एकाच कुटुंबातील तिघांचा आत्महत्येचा प्रयत्न; पत्नीची अवस्था पाहून पतीने...