अ‍ॅपशहर

Weather Alert : मुसळधार पावसाने नदीला पूर, 'या' गावांचा संपर्क तुटला; १ जूलैपर्यंत अतिवृष्टीचा इशारा

राज्यात अनेक भागांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. अशात मुसळधार पावसाचं रौद्ररूप अकोल्यातल्या पहायला मिळालं आहे. इथे नदीला पूर आला असून शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा पेरणीचं संकट ओढावलं आहे. अनेक शेतांमध्ये पाणी शिरल्याने शेतकरी हैराण झाले आहेत.

Edited byरेणुका धायबर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 Jun 2022, 5:31 pm
अकोला : अकोला जिल्ह्यात काल रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतजमीन खरडून गेली आहे. जिल्ह्यातील अनेक भागात शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढवलं आहे. जिल्ह्यात बाळापूर व अकोला तालुक्यातील गावांना मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. जिल्ह्यातील हातरूण परिसरातील मोर्णा नदीला पूर आला असून, हातरूण ते बोरगाव वैराळे या गावाचा संपर्क तुटला होता. मांजरी ते बादलापूरकडे जाणाऱ्या पुलाच्या बाजूची जमीन क्षतीग्रस्त झाली, येथून दुचाकीही जाणे शक्य नसल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम weather today at maharashtra


यंदा खरीप हंगामात जून महिन्याच्या प्रारंभीच्या पावसावर अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या आटोपून घेतल्या होत्या. मात्र, अनेक भागात जमिनीची पेरणीलायक ओल नसल्याने पावसाची प्रतीक्षाच आहे. मात्र, काल सोमवारी रात्री जिल्ह्यातील काहा भागात जोरदार पाऊस झाला. आजही पावसाचा जोर पाहायला मिळाला. परिणामी अनेक गावांमधील पेरणीवर पाणी फेरलं गेल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.

Sangli Suicide Case: चहाचा घोट घेताच पडले ९ जणांचे मृतदेह, म्हैसाळ हत्याकांडात खळबळजनक खुलासा
अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील हातरूण, शिंगोली, मालवाडा परिसरात जोरदार पाऊस झाला. नदी काठच्या शेतात पाणी घुसल्याने शेत जमीन खरडून गेली आहे. तर मांजरी ते बादलापूरकडे जाणाऱ्या पुलाचे काम पूर्ण झालेले नाही. गतवर्षीही पावसामुळे पूल क्षतीग्रस्त झाला होता. त्यामुळे त्यावर मुरुम टाकण्यात आला होता. मात्र सोमवारी रात्री झालेल्या पावसामुळे पूलाजवळची जमीन वाहून गेली. त्यामुळे आता या ठिकाणावरून दुचाकीही जाणे शक्य नसल्याचे गावकरी म्हणत आहे. तर गायगाव परिसरातील काही ठिकाणी घरात पाणी शिरले आहे. अनेक शेतात पाणी साचले असून, जमीन खरडून गेली. ऐन पेरणीवर पाणी फेरल्या गेल्याचेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. बाळापूर तालुक्यात सोमवारी रात्री ते मंगळवारी सकाळी ८ पर्यंत ६६.३० मि.मी. पाऊस झाला. सुमारे जिल्ह्यात सरासरी १५.०८ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली.

येत्या १ जुलैपर्यंत पावसाचा अंदाज...

भारतीय हवामान विभाग, मुंबई यांच्याकडून प्राप्त अंदाजानुसार आज २७ जून ते १ जुलै या दरम्यान अकोला जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. अनेक ठिकाणि ५० ते ७५ मीमी पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. वीज पडणे या अनुषंगाने नागरिकांनी अधिक दक्षता घ्यावी. दामिनी या ऍपचा वापर करुन माहिती घ्यावी. तसेच या इशाऱ्याच्या पार्श्वभुमिवर सर्व यंत्रणांनी योग्य ती दक्षता व खबरदारी घ्यावी असे कळविण्यात आले आहे.
लेखकाबद्दल
रेणुका धायबर
रेणुका धायबर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. डिजिटल पत्रकारितेचा आठ वर्षांचा अनुभव आहे. २०१४ पासून पत्रकारीतेत आहेत. झी २४ तास , न्यूज १८ लोकमत, टीव्ही ९ अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. महाराष्ट्र, राजकारण, गुन्हेगारी, देश, विदेश, स्पेशल बातम्या यासोबत व्यवसाय विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज