मटा ऑनलाइन वृत्त । अमरावती
अमरावतीच्या पंजाबराव देशमुख रुग्णालयात एकाच वेळी चार नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. डॉक्टरांच्या चुकीमुळंच हे घडल्याचा मृत बालकांच्या कुटुंबीयांचा आरोप आहे. अमरावती व आसपासच्या ग्रामीण भागातील जनतेचा आधार असलेल्या या रुग्णालयात ही घटना घडल्यामुळं लोकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.
पंजाबराव देशमुख रुग्णालयात या चार नवजात बालकांवर उपचार सुरू असताना रविवारी रात्री ही घटना घडली. एकाचवेळी चार नवजात बालके दगावल्याने रुग्णांच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त करत रुग्णालयात धिंगाणा घातला. डॉक्टरांच्या उपचारात चूक झाली असून या बालमृत्यूला डॉक्टरच जबाबदार असल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे. या चारही मुलांच्या अंगावर लाल रंगाचे चट्टे होते. त्यांना औषधांची रिअॅक्शन झाली असावी आणि त्यांचा मृत्यू झाला असावा, असं नातेवाईकांचं म्हणणं आहे. या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस व रुग्णालयातील एक टीम चौकशी करणार आहे. चौकशीनंतरच बालकांच्या मृत्यूचं नेमकं कारण समजू शकेल. मात्र, डॉक्टरांवर गुन्हे दाखल करण्याची मागणीही रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे.
गेल्याच आठवड्यात गोंदियाच्या गंगाबाई शासकीय रुग्णालयात प्रसुती दरम्यान १८ नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. गोंदियात मागच्या दीड महिन्यात एकूण ४३ बालके दगावली आहेत. या पार्श्वभूमीवर अमरावतीतील या घटनेमुळे खळबळ माजली आहे.
अमरावतीच्या पंजाबराव देशमुख रुग्णालयात एकाच वेळी चार नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. डॉक्टरांच्या चुकीमुळंच हे घडल्याचा मृत बालकांच्या कुटुंबीयांचा आरोप आहे. अमरावती व आसपासच्या ग्रामीण भागातील जनतेचा आधार असलेल्या या रुग्णालयात ही घटना घडल्यामुळं लोकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.
पंजाबराव देशमुख रुग्णालयात या चार नवजात बालकांवर उपचार सुरू असताना रविवारी रात्री ही घटना घडली. एकाचवेळी चार नवजात बालके दगावल्याने रुग्णांच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त करत रुग्णालयात धिंगाणा घातला. डॉक्टरांच्या उपचारात चूक झाली असून या बालमृत्यूला डॉक्टरच जबाबदार असल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे. या चारही मुलांच्या अंगावर लाल रंगाचे चट्टे होते. त्यांना औषधांची रिअॅक्शन झाली असावी आणि त्यांचा मृत्यू झाला असावा, असं नातेवाईकांचं म्हणणं आहे. या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस व रुग्णालयातील एक टीम चौकशी करणार आहे. चौकशीनंतरच बालकांच्या मृत्यूचं नेमकं कारण समजू शकेल. मात्र, डॉक्टरांवर गुन्हे दाखल करण्याची मागणीही रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे.
गेल्याच आठवड्यात गोंदियाच्या गंगाबाई शासकीय रुग्णालयात प्रसुती दरम्यान १८ नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. गोंदियात मागच्या दीड महिन्यात एकूण ४३ बालके दगावली आहेत. या पार्श्वभूमीवर अमरावतीतील या घटनेमुळे खळबळ माजली आहे.