म. टा. प्रतिनिधी, बुलडाणा
राज्यभर पाणीटंचाईचे चटके जाणवत आहेत. मानवी वस्त्यांमध्ये पाण्यासाठी हाहाकार उडाला आहे. वन्यप्राण्यांची स्थितीही याला अपवाद नाही. ही परिस्थिती लक्षात घेता बुलडाणा विभागाने वन्यप्राण्यांची तहान भागविण्यासाठी जंगलांमध्ये ४४ कृत्रिम पाणवठे निर्माण केले आहेत. एवढेच नव्हे तर ७७ नैसर्गिकरित्या निर्माण झालेल्या पानवठ्यांचे संवर्धनही केले आहे. जिल्ह्यात १२१ पानवठे वन्यप्राण्यांची तहान भागविण्यासाठी सज्ज आहेत.
वनविभागाने वन्यप्राण्यांची पाण्यासाठी होणारी ससेहोलपट हेरली. पाण्यासाठी वन्यप्राण्यांचे गावाकडे होणारे स्थलांतरणही अनुभवले. त्यामुळे वन्यप्राण्यांच्या निवासाजवळच पानवठ्यांची संकल्पना प्रत्यक्षात आणली. पानवठे बशीच्या आकारासारखे असून जास्तीत जास्त पाणी साठवण्याची क्षमता असलेले आहेत. जमिनीला बशीसारखे करून त्यामध्ये सुरुवातीला पाणी टाकले. पाणी झिरपून त्या आकारात दगड, गवत टाकून पाणी अडविण्यासाठी आच्छादन तयार केले. परिणामी पाणी जास्त काळ टिकून वन्यप्राण्यांसाठी तहान भागविणारे ठरत आहे. हे पानवठे वन्य प्राण्यांच्या ये-जा करण्यात येणाऱ्या रस्त्यांजवळ निर्माण करण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांच्या लगेच दृष्टीक्षेपात पडत आहेत. या पानवठ्यांमध्ये वनविभाग दर दोन दिवसांनी टँकरद्वारे पाणी टाकत आहे. यासोबतच नैसर्गिकरित्या निर्माण झालेले पानवठ्यांचेही संवर्धन करून त्यामध्ये पाणीसाठा निर्माण करण्यात आला आहे.
देऊळगाव राजा वन परिक्षेत्रामध्ये दहा, मोताळा नऊ, जळगाव जामोद आठ, बुलडाणा आठ, खामगाव तीन व मेहकरमध्ये तीन पानवठे निर्माण करण्यात आले आहेत. तसेच घाटबोरी वन परिक्षेत्रामध्ये तीन पानवठे बनविण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे देऊळगाव राजा तीन, खामगाव तीन, बुलडाणा १५, मेहकर १२, घाटबोरी १३, मोताळा ११ व जळगाव जामोद वन परिक्षेत्रामध्ये २० नैसर्गिक पानवठ्यांचे संवर्धन करण्यात आले आहे. त्यामध्ये पाणीसाठा उपलब्ध आहे. या उपक्रमामुळे वन्यप्राण्यांना जंगलातच पाणी मिळाल्यामुळे गावाकडे येण्याचे प्रमाण निश्चितच कमी झाले आहे.
राज्यभर पाणीटंचाईचे चटके जाणवत आहेत. मानवी वस्त्यांमध्ये पाण्यासाठी हाहाकार उडाला आहे. वन्यप्राण्यांची स्थितीही याला अपवाद नाही. ही परिस्थिती लक्षात घेता बुलडाणा विभागाने वन्यप्राण्यांची तहान भागविण्यासाठी जंगलांमध्ये ४४ कृत्रिम पाणवठे निर्माण केले आहेत. एवढेच नव्हे तर ७७ नैसर्गिकरित्या निर्माण झालेल्या पानवठ्यांचे संवर्धनही केले आहे. जिल्ह्यात १२१ पानवठे वन्यप्राण्यांची तहान भागविण्यासाठी सज्ज आहेत.
वनविभागाने वन्यप्राण्यांची पाण्यासाठी होणारी ससेहोलपट हेरली. पाण्यासाठी वन्यप्राण्यांचे गावाकडे होणारे स्थलांतरणही अनुभवले. त्यामुळे वन्यप्राण्यांच्या निवासाजवळच पानवठ्यांची संकल्पना प्रत्यक्षात आणली. पानवठे बशीच्या आकारासारखे असून जास्तीत जास्त पाणी साठवण्याची क्षमता असलेले आहेत. जमिनीला बशीसारखे करून त्यामध्ये सुरुवातीला पाणी टाकले. पाणी झिरपून त्या आकारात दगड, गवत टाकून पाणी अडविण्यासाठी आच्छादन तयार केले. परिणामी पाणी जास्त काळ टिकून वन्यप्राण्यांसाठी तहान भागविणारे ठरत आहे. हे पानवठे वन्य प्राण्यांच्या ये-जा करण्यात येणाऱ्या रस्त्यांजवळ निर्माण करण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांच्या लगेच दृष्टीक्षेपात पडत आहेत. या पानवठ्यांमध्ये वनविभाग दर दोन दिवसांनी टँकरद्वारे पाणी टाकत आहे. यासोबतच नैसर्गिकरित्या निर्माण झालेले पानवठ्यांचेही संवर्धन करून त्यामध्ये पाणीसाठा निर्माण करण्यात आला आहे.
देऊळगाव राजा वन परिक्षेत्रामध्ये दहा, मोताळा नऊ, जळगाव जामोद आठ, बुलडाणा आठ, खामगाव तीन व मेहकरमध्ये तीन पानवठे निर्माण करण्यात आले आहेत. तसेच घाटबोरी वन परिक्षेत्रामध्ये तीन पानवठे बनविण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे देऊळगाव राजा तीन, खामगाव तीन, बुलडाणा १५, मेहकर १२, घाटबोरी १३, मोताळा ११ व जळगाव जामोद वन परिक्षेत्रामध्ये २० नैसर्गिक पानवठ्यांचे संवर्धन करण्यात आले आहे. त्यामध्ये पाणीसाठा उपलब्ध आहे. या उपक्रमामुळे वन्यप्राण्यांना जंगलातच पाणी मिळाल्यामुळे गावाकडे येण्याचे प्रमाण निश्चितच कमी झाले आहे.