अ‍ॅपशहर

स्वार्थी मित्रापेक्षा दिलदार विरोधक चांगला: मुख्यमंत्र्यांचा टोला

'भारतीय राजकारणात पक्षाच्या पलिकडे जाऊन मैत्री करणारे नेते फार कमी आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांपैकी एक आहेत. राज्याच्या हिताचा विषय असेल तर पवार स्वत: फोन करून उपाय सूचवतात. असा दिलदारपणा असावा', अशा शब्दांत शरद पवार यांचे कौतुक करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'स्वार्थी मित्रापेक्षा दिलदार विरोधक अत्यंत चांगला असतो', असे सूचक उद्गार काढले. मुख्यमंत्र्यांनी अप्रत्यक्षपणे हा शिवसेनेला लगावलेला टोला असल्याची चर्चा उपस्थितांमध्ये चांगलीच रंगली.

Maharashtra Times 23 Oct 2017, 8:20 pm
मटा ऑनलाइन वृत्त। अमरावती
महाराष्ट्र टाइम्स.कॉम a good opponent is better than a selfish friend says cm devendra fadnavis praising sharad pawar of ncp in amaravati
स्वार्थी मित्रापेक्षा दिलदार विरोधक चांगला: मुख्यमंत्र्यांचा टोला


'भारतीय राजकारणात पक्षाच्या पलिकडे जाऊन मैत्री करणारे नेते फार कमी आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांपैकी एक आहेत. राज्याच्या हिताचा विषय असेल तर पवार स्वत: फोन करून उपाय सूचवतात. असा दिलदारपणा असावा', अशा शब्दांत शरद पवार यांचे कौतुक करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'स्वार्थी मित्रापेक्षा दिलदार विरोधक अत्यंत चांगला असतो', असे सूचक उद्गार काढले. मुख्यमंत्र्यांनी अप्रत्यक्षपणे हा शिवसेनेला लगावलेला टोला असल्याची चर्चा उपस्थितांमध्ये चांगलीच रंगली.

अमरावतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा सर्वपक्षीय जाहीर सत्कार करण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्वार्थी मित्र आणि दिलदार विरोधकांमधील फरक स्पष्ट करताना 'स्वार्थी मित्राला' चिमटा काढला.

जेव्हा महाराष्ट्राच्या हिताची बाब असते तेव्हा शरद पवार यांनी कधीही मतांची चिंता केली नाही. पवार नेहमीच मार्गदर्शन करतात. शिवाय ते आपल्या चुकाही दुरुस्त करतात अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं तोंडभरुन स्तुती केली.

मुख्यमंत्री आपल्या भाषणात पुढे म्हणाले, की आमचा डीएनए हा विरोधी पक्षाचाच आहे. विरोधक कसे काम करतात हे आम्हाला चांगलेच माहिती आहे. मात्र सत्ताधारी पक्ष काय असतो हे आता कळलंय. विरोधात असताना अवास्तव मागण्या केल्या की लोक खूश होतात. मात्र शरद पवार हे नेहमीच राजकारण आणि पक्षाच्या पलिकडे पाहणारे नेते आहेत. प्रत्येक राज्याच पवारांसारखी एकतरी व्यक्ती असली पाहिजे.

शरद पवार कृषी मंत्री होते त्याच काळात कृषी क्षेत्रात सर्वोत्कृष्ट काम झालं. सरकारने जेव्हा कर्जमाफीचा निर्णय घेतला तेव्हा पवारांना फोन केला. चर्चेसाठी त्यांनी दिल्लीला बोलावलं. राज्याचा विचार करत कर्जमाफीबद्दल शरद पवारांनी मार्गदर्शन केलं, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांचा गौरव केला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज