अमरावती: राज्यात करोनाचा (Coronavirus in Maharashtra) जोर पुन्हा वाढल्याचं चित्र असल्यानं सध्या चिंतेचं वातावरण आहे. राज्यात पुन्हा लॉकडाउन (Lockdown) लागू होणार की काय अशी चर्चा सुरू असताना अमरावती जिल्ह्यात लॉकडाउन (Lockdown in Amravati) जाहीर करण्यात आला आहे. येत्या रविवारी एक दिवसासाठी संपूर्ण जिल्हा बंद ठेवण्यात येणार आहे. यातून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. ही माहिती अमरावतीचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली आहे. (a lockdown has been declared in amravati district) 'अमरावतीत एक दिवसाचा लॉकडाउन'
अमरावती जिल्ह्यात एक दिवसाचा लॉकडाउन घोषित करण्यात आला आहे. हा लॉकडाउन शनिवारी रात्री ८ वाजता सुरू होऊन तो सोमवारी सकाळी ७ वाजता संपेल, अशी माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली. लोकांनी नियमांचे नीट पालन करावे अन्यथा आणखी कडक निर्बंध घालावे लागतील, असे आवाहनही नवाल यांनी केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून अमरावतीमध्ये करोना बाधित रुग्णांची वाढ होत आहे. गेल्या चार दिवसांपासून तर ती झपाट्याने होत आहे. अमरावतीत १४ फेब्रुवारी रोजी ४३५ रुग्ण सापडले आहेत. यात २ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच १५ फेब्रुवारीला ४३९ रुग्ण आढळून आले. तर एकूण ४ रुग्णांचा मृत्यू झाला. १६ फेब्रुवारीला ४९५ रुग्ण सापडले तर १७ फेब्रुवारी या दिवशी ४९८ रुग्ण आढळले. १७ फेब्रुवारीला एकूण ६ रुग्णांचा मृत्यू झाला.
क्लिक करा आणि वाचा- Coronavirus In Mumbai: मुंबईत पुन्हा एकदा कडक निर्बंध!; पालिका आयुक्तांनी उचलले 'हे' मोठे पाऊल
उपमुख्यमंत्र्यांनी दिले होते संकेत
दरम्यान अमरावती, यवतमाळ, अकोला या तीन जिल्ह्यांत पुन्हा लॉकडाऊन लागू शकतो, अशी शक्यता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच व्यक्त केली होती. करोना बाधित रुग्णांची संख्या सतत वाढत असून अकोला, अमरावती, यवतमाळ या शहरांमध्ये लॉकडाऊन लावायचा विचार आहे असे पवार म्हणाले होते.
क्लिक करा आणि वाचा- सुधीर मुनगंटीवार यांनी साधला नाना पटोलेंवर निशाणा, म्हणाले...
मुंबईपेक्षा जास्त रुग्णसंख्या अमरावतीत दिसत असून अमरावती विभागात जास्त रुग्णसंखेत वाढ होत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळं या तीन जिल्ह्यांत पुन्हा लॉकडाऊन लावण्याचा विचार करत आहोत, असे अजित पवार म्हणाले होते. अकोला, यवतमाळ आणि अमरावतीत सध्या काय परिस्थिती आहे याबाबत आज अढावा बैठक होणार आहे. या बैठकीनंतर या तीन जिल्ह्यांत काय निर्णय घेणार हे समोर येईल,' असंही त्यांनी सांगितलं. लॉकडाऊनबाबत अकोला, अमरावती आणि यवतमाळच्या पालकमंत्र्यांशी चर्चा झाल्याचंही ते म्हटले होते.
क्लिक करा आणि वाचा- 'करोनावर नियंत्रण आणण्यासाठी एकटे सरकार काही करू शकणार नाही'
अमरावती जिल्ह्यात एक दिवसाचा लॉकडाउन घोषित करण्यात आला आहे. हा लॉकडाउन शनिवारी रात्री ८ वाजता सुरू होऊन तो सोमवारी सकाळी ७ वाजता संपेल, अशी माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली. लोकांनी नियमांचे नीट पालन करावे अन्यथा आणखी कडक निर्बंध घालावे लागतील, असे आवाहनही नवाल यांनी केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून अमरावतीमध्ये करोना बाधित रुग्णांची वाढ होत आहे. गेल्या चार दिवसांपासून तर ती झपाट्याने होत आहे. अमरावतीत १४ फेब्रुवारी रोजी ४३५ रुग्ण सापडले आहेत. यात २ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच १५ फेब्रुवारीला ४३९ रुग्ण आढळून आले. तर एकूण ४ रुग्णांचा मृत्यू झाला. १६ फेब्रुवारीला ४९५ रुग्ण सापडले तर १७ फेब्रुवारी या दिवशी ४९८ रुग्ण आढळले. १७ फेब्रुवारीला एकूण ६ रुग्णांचा मृत्यू झाला.
क्लिक करा आणि वाचा- Coronavirus In Mumbai: मुंबईत पुन्हा एकदा कडक निर्बंध!; पालिका आयुक्तांनी उचलले 'हे' मोठे पाऊल
उपमुख्यमंत्र्यांनी दिले होते संकेत
दरम्यान अमरावती, यवतमाळ, अकोला या तीन जिल्ह्यांत पुन्हा लॉकडाऊन लागू शकतो, अशी शक्यता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच व्यक्त केली होती. करोना बाधित रुग्णांची संख्या सतत वाढत असून अकोला, अमरावती, यवतमाळ या शहरांमध्ये लॉकडाऊन लावायचा विचार आहे असे पवार म्हणाले होते.
क्लिक करा आणि वाचा- सुधीर मुनगंटीवार यांनी साधला नाना पटोलेंवर निशाणा, म्हणाले...
मुंबईपेक्षा जास्त रुग्णसंख्या अमरावतीत दिसत असून अमरावती विभागात जास्त रुग्णसंखेत वाढ होत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळं या तीन जिल्ह्यांत पुन्हा लॉकडाऊन लावण्याचा विचार करत आहोत, असे अजित पवार म्हणाले होते. अकोला, यवतमाळ आणि अमरावतीत सध्या काय परिस्थिती आहे याबाबत आज अढावा बैठक होणार आहे. या बैठकीनंतर या तीन जिल्ह्यांत काय निर्णय घेणार हे समोर येईल,' असंही त्यांनी सांगितलं. लॉकडाऊनबाबत अकोला, अमरावती आणि यवतमाळच्या पालकमंत्र्यांशी चर्चा झाल्याचंही ते म्हटले होते.
क्लिक करा आणि वाचा- 'करोनावर नियंत्रण आणण्यासाठी एकटे सरकार काही करू शकणार नाही'