शैलेश धुंदी/ अमरावती:
निकालाबाबत असलेल्या आक्षेपावरून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आणि यवतमाळ येथील जाजू महाविद्यालयातील एमबीएच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात अनोखं आंदोलन केलं. कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांच्यासोबत चर्चेसाठी आलेल्या आंदोलकांनी सायकल आणल्यानं खळबळ उडाली. तसंच कुलगुरूसोबत आंदोलकांची शाब्दिक चकमकही झाली.
अमरावती विद्यापीठाच्या यवतमाळ येथील जाजू महाविद्यालयातील एमबीएचे ५० पैकी ४९ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. परीक्षांचे मूल्यांकन करणाऱ्यांमुळे विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्याचा विद्यार्थ्यांचा आक्षेप आहे. यासह अन्य मुद्यावर चर्चेसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते व विद्यार्थी आज मोठ्या संख्येने कुलगुरूंच्या कार्यालयावर धडकले. यावेळी आंदोलकांनी सभागृहात चर्चेसाठी चक्क सायकल आणली. संतप्त कार्यकर्त्यांनी विद्यापीठात जोरदार घोषणा दिल्या. आंदोलकांनी विद्यापीठाचे प्रवेशद्वार उघडण्याचे प्रयत्न केले. कुलगुरुंसोबत चर्चा करताना विद्यार्थ्यांनी मूल्यांकनावर आक्षेप नोंदविला. त्यांनी कुलगुरुंपुढे अनेक मागण्या केल्या. त्यावर आपण कायद्याबाहेर जाऊन काहीच करू शकत नाही. विद्यापीठ विद्यार्थ्यांच्या विरोधात नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. चर्चेदरम्यान, आंदोलक चांगलेच आक्रमक झाले होते. आंदोलक व कुलगुरु यांच्यातील शाब्दिक वादामुळे विद्यापीठात तणाव निर्माण झाला होता.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठात पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. विद्यापीठात जवळपास २ तास गोंधळ सुरू होता. दरम्यान, विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या एमबीए महाविद्यालयाच्या निकालावरून गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे. निकालाची टक्केवारी घसरत असल्याने विद्यार्थी चिंतातूर आहेत. याच परीक्षेत चुकीचे प्रश्न विचारल्याने विद्यापीठाने युवा स्वाभिमानच्या आंदोलनानंतर १४ गुणदान दिले होते.
निकालाबाबत असलेल्या आक्षेपावरून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आणि यवतमाळ येथील जाजू महाविद्यालयातील एमबीएच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात अनोखं आंदोलन केलं. कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांच्यासोबत चर्चेसाठी आलेल्या आंदोलकांनी सायकल आणल्यानं खळबळ उडाली. तसंच कुलगुरूसोबत आंदोलकांची शाब्दिक चकमकही झाली.
अमरावती विद्यापीठाच्या यवतमाळ येथील जाजू महाविद्यालयातील एमबीएचे ५० पैकी ४९ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. परीक्षांचे मूल्यांकन करणाऱ्यांमुळे विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्याचा विद्यार्थ्यांचा आक्षेप आहे. यासह अन्य मुद्यावर चर्चेसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते व विद्यार्थी आज मोठ्या संख्येने कुलगुरूंच्या कार्यालयावर धडकले. यावेळी आंदोलकांनी सभागृहात चर्चेसाठी चक्क सायकल आणली. संतप्त कार्यकर्त्यांनी विद्यापीठात जोरदार घोषणा दिल्या. आंदोलकांनी विद्यापीठाचे प्रवेशद्वार उघडण्याचे प्रयत्न केले. कुलगुरुंसोबत चर्चा करताना विद्यार्थ्यांनी मूल्यांकनावर आक्षेप नोंदविला. त्यांनी कुलगुरुंपुढे अनेक मागण्या केल्या. त्यावर आपण कायद्याबाहेर जाऊन काहीच करू शकत नाही. विद्यापीठ विद्यार्थ्यांच्या विरोधात नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. चर्चेदरम्यान, आंदोलक चांगलेच आक्रमक झाले होते. आंदोलक व कुलगुरु यांच्यातील शाब्दिक वादामुळे विद्यापीठात तणाव निर्माण झाला होता.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठात पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. विद्यापीठात जवळपास २ तास गोंधळ सुरू होता. दरम्यान, विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या एमबीए महाविद्यालयाच्या निकालावरून गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे. निकालाची टक्केवारी घसरत असल्याने विद्यार्थी चिंतातूर आहेत. याच परीक्षेत चुकीचे प्रश्न विचारल्याने विद्यापीठाने युवा स्वाभिमानच्या आंदोलनानंतर १४ गुणदान दिले होते.