अ‍ॅपशहर

आदिवासींच्या लढ्याची इतिहासात नोंद नाही

देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात आदिवासी बांधवांनी सहभाग घेतला होता. सुरुवातीपासून दुर्लक्षित राहिलेल्या आदिवासींनी देशाकरिता कामगिरी बजावली. मात्र त्याची इतिहासात कुठेही नोंद नसल्याची खंत ख्यातनाम कवी, आदिवासी अभ्यासक वाहारू सोनवणे यांनी व्यक्त केली.

Maharashtra Times 24 Jan 2017, 4:00 am
वाहारू सोनवणे : आदिवासी कला महोत्सवाचे उद्‍घाटन
महाराष्ट्र टाइम्स.कॉम adiwasi kala mahotsav inagurate in amrawati
आदिवासींच्या लढ्याची इतिहासात नोंद नाही


म. टा. वृत्तसेवा, अमरावती

देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात आदिवासी बांधवांनी सहभाग घेतला होता. सुरुवातीपासून दुर्लक्षित राहिलेल्या आदिवासींनी देशाकरिता कामगिरी बजावली. मात्र त्याची इतिहासात कुठेही नोंद नसल्याची खंत ख्यातनाम कवी, आदिवासी अभ्यासक वाहारू सोनवणे यांनी व्यक्त केली.

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातर्फे आयोजित तीन दिवसी आदिवासी कला महोत्सवाचे उद्‍घाटन सोमवारी झाले. यावेळे ते बोलत होते. व्यासपीठावर कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर, साहित्यिक डॉ. मधुकर वाकोडे, कुलसचिव डॉ.अजय देशमुख, मराठी विभाग प्रमुख डॉ. मनोज तायडे, डॉ. हेमंत खडके उपस्थित होते. सोनवणे म्हणाले, आदिवासींना सुरुवातीला चोर, दरोडेखोर व राक्षस संबोधल्या जात होते. परंतु देशाप्रती त्यांचे प्रेम व कार्य आपण लक्षात घेतले पाहिजे. आदिवासी संस्कृती, जीवन व कला सर्वश्रेष्ठ आहे. जेव्हापासून मानवी जीवनामध्ये संपत्तीची उत्पत्ती झाली, तेव्हापासून मानवी जीवनाचे विभाजन होवून उच्च-निच्च हा भेद सुरू झाला. आदिवासी संस्कृती समतेवर आधारित आहे. सामूहिक शिकार केल्यावर जो आनंद मिळतो तो व्यक्त करण्यासाठी त्यांनी कलेची निर्मिती केली. स्वातंत्र्य, समता, आदिवासींच्या जीवनाचे मूल्य आहेत. आदिवासींची संस्कृती समतेवर आधारित असून ही संस्कृती जपण्यासाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन व्हावे, असेही ते म्हणाले.

शेतातून चांगले उत्पन्न व्हावे, आरोग्य सुदृढ राहावे याकरिता आदिवासी बांधव दिवाळी सण एकत्रितपणे व आनंदाने साजरा करतात. होळीचा सणदेखील त्यांना प्रिय आहे. मुलींना विचारल्याशिवाय व पसंतीशिवाय लग्न केले जात नाही. निसर्गावर आधारित मूल्यसंपन्न आदिवासी संस्कृतीवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न शहरी संस्कृतीकडून होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. आदिवासी संस्कृती ही पूर्वापारपासून चालत असून तिचे संवर्धन विद्यापीठाच्या माध्यमातून व्हावे, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. त्यांनी स्टेज, कविता व पावरा बोलीमधील लोकगीते सादर केली.

प्रास्ताविक विद्यापीठाच्या मराठी विभाग प्रमुख डॉ. मनोज तायडे यांनी तर संचालन डॉ. हेमंत खडके यांनी केले. कार्यक्रमाला माजी कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, डॉ. जयकिरण तिडके, डॉ. दिनेशकुमार जोशी, डॉ. संतोष सदार, प्राचार्य डॉ. अरविंद देशमुख, डॉ. मोना चिमोटे, डॉ. माधव पुटवाड, डॉ. प्रणव कोलते, उपकुलसचिव डॉ. अशोक चव्हाण, मंगेश वरखेडे यांच्यासह विविध विभागांचे विभागप्रमुख, शिक्षक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज