म. टा. प्रतिनिधी, अमरावती
विदर्भाच्या अनुशेषासाठी गठीत दोन समित्यांपैकी दांडेकर समितीने बाराशे कोटी तर अन्य एका समितीने दोन हजार कोटी रुपये हे पश्चिम महाराष्ट्राने पळविल्याचे अहवालात म्हटले होते. हा पैसा पश्चिम महाराष्ट्राने चोरला असून ते चोर आहेत. म्हणून विदर्भ वेगळा झाल्यास काय खाणार याची काळजी पश्चिम महाराष्ट्राने करू नये. तुम्ही काय खाणार याचा विचार करावा. कारण विदर्भाच्या पैशावर पश्चिम महाराष्ट्र जगतोय, असा घणाघात राज्याचे माजी महाअधिवक्ता अॅड. श्रीहरी अणे यांनी केला.
नवराज्य निर्माण महासंघाद्वारे शनिवारी सायंकाळी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर जाबुवंतराव धोटे, माजी मंत्री अनिल देशमुख, डॉ. गोविंद वर्मा, राजकुमार तिरपुडे, अॅड. संदेश सिंगलवार, गणेश खारकर, श्रीकांत तराळ उपस्थित होते. अॅड. अणे म्हणाले, महाराष्ट्रावर सध्या ३५.५ लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे. राज्य कर्जात बुडाले असताना त्यांनी विदर्भाच्या जगण्याची चिंता करण्यात अर्थ नाही. आम्ही तुम्हास खाऊ घालतो म्हणून खाता. विदर्भातील नोकऱ्या, सिंचनाचा अनुशेष, शेतकरी आत्महत्या, कुपोषण व नक्षलवाद हे गंभीर प्रश्न महाराष्ट्राच्या सापत्न वागणुकीतून निर्माण झाले आहेत. म्हणूनच महाराष्ट्र हे पूर्णत: नापास राज्य आहे. विदर्भाचा कुठल्याही भाग विकसित नाही. तुलनेने पश्चिम महाराष्ट्र विकसित आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नांदगाव पेठ येथे वस्त्रोद्योग प्रकल्पाच्या कोनशीलेचे अनावरण केल्याचे उदाहरण देत अणे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेक इन इंडिया या संकल्पनेत महाराष्ट्राकरिता दिलेल्या पैशापैकी मराठवाडा आणि विदर्भ मिळून केवळ १८ टक्के निधी आला आहे. उर्वरित पश्चिम महाराष्ट्रात गेला. त्यामुळे सरकार काँग्रेस व भाजपचे असले तरी विदर्भावर अन्याय होत राहणार आहे. भाजप सरकारने महाराष्ट्राचे पाणी तेलंगणला देण्याचा करार केला आहे. त्यामुळे या भागातील ५० गावे पाण्याखाली जाणार आहेत. त्यांच्या पुर्नवसनाचा प्रश्न तसाच राहणार आहे. सरकारला त्यांची चिंता नाही. चंद्रपूर आणि गडचिरोली येथील आदिवासी महिलांच्या प्रसूतीची सोय नाही. ७० टक्के प्रसूती उघड्यावर होतात ही २०१६मधील विदर्भातील अवस्था भयंकर असल्याचे अणे यांनी सांगितले. उद्धव ठाकरे, राज ठाकरे व नीलेश राणे यांच्यावरही अॅड. अणेंनी हल्ला चढविला.
सभेला विजया धोटे, क्रांती राऊत, रंजना मामर्डे यांच्यासह चंद्रकांत वानखडे, रामेश्वर अभ्यंकर, चरणदास इंगोले, नितीन मोहोड, अनिल गोंडाणे आदी उपस्थित होते.
जांबुवंतरावांचा मौन संकल्प
जांबुवंतराव धोटे यांनी यापुढे आपण वेगळ्या विदर्भाच्या आंदोलनात बोलणार नसल्याचा संकल्प घेतला. ही आपली शेवटची सभा असून यापुढे कुठेही भाषण करणार नाही असे म्हटले. तत्पूर्वी धोटे यांनी इतिहास सांगत विदर्भ वेगळा होणे का गरजेचे हे पटवून दिले.
विदर्भाच्या अनुशेषासाठी गठीत दोन समित्यांपैकी दांडेकर समितीने बाराशे कोटी तर अन्य एका समितीने दोन हजार कोटी रुपये हे पश्चिम महाराष्ट्राने पळविल्याचे अहवालात म्हटले होते. हा पैसा पश्चिम महाराष्ट्राने चोरला असून ते चोर आहेत. म्हणून विदर्भ वेगळा झाल्यास काय खाणार याची काळजी पश्चिम महाराष्ट्राने करू नये. तुम्ही काय खाणार याचा विचार करावा. कारण विदर्भाच्या पैशावर पश्चिम महाराष्ट्र जगतोय, असा घणाघात राज्याचे माजी महाअधिवक्ता अॅड. श्रीहरी अणे यांनी केला.
नवराज्य निर्माण महासंघाद्वारे शनिवारी सायंकाळी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर जाबुवंतराव धोटे, माजी मंत्री अनिल देशमुख, डॉ. गोविंद वर्मा, राजकुमार तिरपुडे, अॅड. संदेश सिंगलवार, गणेश खारकर, श्रीकांत तराळ उपस्थित होते. अॅड. अणे म्हणाले, महाराष्ट्रावर सध्या ३५.५ लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे. राज्य कर्जात बुडाले असताना त्यांनी विदर्भाच्या जगण्याची चिंता करण्यात अर्थ नाही. आम्ही तुम्हास खाऊ घालतो म्हणून खाता. विदर्भातील नोकऱ्या, सिंचनाचा अनुशेष, शेतकरी आत्महत्या, कुपोषण व नक्षलवाद हे गंभीर प्रश्न महाराष्ट्राच्या सापत्न वागणुकीतून निर्माण झाले आहेत. म्हणूनच महाराष्ट्र हे पूर्णत: नापास राज्य आहे. विदर्भाचा कुठल्याही भाग विकसित नाही. तुलनेने पश्चिम महाराष्ट्र विकसित आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नांदगाव पेठ येथे वस्त्रोद्योग प्रकल्पाच्या कोनशीलेचे अनावरण केल्याचे उदाहरण देत अणे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेक इन इंडिया या संकल्पनेत महाराष्ट्राकरिता दिलेल्या पैशापैकी मराठवाडा आणि विदर्भ मिळून केवळ १८ टक्के निधी आला आहे. उर्वरित पश्चिम महाराष्ट्रात गेला. त्यामुळे सरकार काँग्रेस व भाजपचे असले तरी विदर्भावर अन्याय होत राहणार आहे. भाजप सरकारने महाराष्ट्राचे पाणी तेलंगणला देण्याचा करार केला आहे. त्यामुळे या भागातील ५० गावे पाण्याखाली जाणार आहेत. त्यांच्या पुर्नवसनाचा प्रश्न तसाच राहणार आहे. सरकारला त्यांची चिंता नाही. चंद्रपूर आणि गडचिरोली येथील आदिवासी महिलांच्या प्रसूतीची सोय नाही. ७० टक्के प्रसूती उघड्यावर होतात ही २०१६मधील विदर्भातील अवस्था भयंकर असल्याचे अणे यांनी सांगितले. उद्धव ठाकरे, राज ठाकरे व नीलेश राणे यांच्यावरही अॅड. अणेंनी हल्ला चढविला.
सभेला विजया धोटे, क्रांती राऊत, रंजना मामर्डे यांच्यासह चंद्रकांत वानखडे, रामेश्वर अभ्यंकर, चरणदास इंगोले, नितीन मोहोड, अनिल गोंडाणे आदी उपस्थित होते.
जांबुवंतरावांचा मौन संकल्प
जांबुवंतराव धोटे यांनी यापुढे आपण वेगळ्या विदर्भाच्या आंदोलनात बोलणार नसल्याचा संकल्प घेतला. ही आपली शेवटची सभा असून यापुढे कुठेही भाषण करणार नाही असे म्हटले. तत्पूर्वी धोटे यांनी इतिहास सांगत विदर्भ वेगळा होणे का गरजेचे हे पटवून दिले.