म.टा. प्रतिनिधी, अमरावती
शहरातील रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ९ कोटी ३० लक्ष रुपयांचा निधी असतानाही पदाधिकाऱ्यांकडून हा निधी खर्च करण्यात येत नाही. त्यामुळे नागरिकांना खड्ड्यांतून मार्ग काढत जावे लागत आहे. या मुद्यावरून शहरवासियांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी महापालिकेत हल्लाबोल आंदोलन केले. संतप्त कार्यकर्त्यांनी महापौरांची खुर्ची बाहेर काढण्याचा प्रयत्न करून स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर यांच्या फलकावरील छायाचित्रास चपलेने बदडले.
शहरातील रस्त्याची पूर्णत: चाळणी झाल्याने अमरावतीकरांना चांगलाच त्रास सहन करावा लागत आहे. नगरविकास विभागातर्फे रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी ९ कोटी ३० लक्ष रुपयांचा निधी मिळाला आहे. मात्र, आमदारांनी सुचविलेली कामे करण्याची अट शासनाने घातली. परंतु, निधीमधील आमदारांची कामे मान्य नसल्याने महापालिका पदाधिकाऱ्यांनी याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर यांनी ही याचिका दाखल केली असून हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. परंतु, कोट्यवधी रुपये असतानाही रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे असल्याने सर्वसामान्यांचा रोष आहे.
शहरातील खड्ड्यांना महापौर चरणजीत कौर नंदा व स्थायी समिती सभापती मार्डीकर हेच जबाबदार असल्याचा आरोप करीत युवा स्वाभिमानी संघटेच्यावतीने मंगळवारी महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला. संतप्त मोर्चेकऱ्यांनी थेट महापौरांच्या दालनात धडक देत त्यांची खुर्ची बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांनी त्याचा हा प्रयत्न हाणून पाडला. यानंतर मार्डीकर यांच्याविरोधात घोषणा देत त्यांचे छायाचित्र असलेल्या फलकास चपलेने बदडण्यात आले.
महापौरांच्या दालनात गोंधळ घातल्यानंतर आंदोलक स्थायी समिती सभापती मार्डीकर यांच्या दालनात पोहोचले. त्याच्या नावाची पाटी काढण्यात आली. युवा स्वाभिमानीच्या या आंदोलनाने महापालिकेत चांगलीच खळबळ उडाली होती.
महिला कार्यकर्त्या संतापल्या
राज्यशासनाने रस्त्याच्या दुरुस्तीसाठी अमरावती महापालिकेला सुमारे ९ कोटी ३० लक्ष रुपयांचा निधी दिला. परंतु, गेल्या सात महिन्यांपासून हा निधी तसाच पडून आहे. शासनाने या निधीतून आमदारांनी सुचविलेली कामे करण्यास मनपा पदाधिकाऱ्यांचा विरोध असल्याने पेच निर्माण झाला आहे. प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. गणपती, गौरी या सणानंतर आता नवरात्र, दसरा व दिवाळी येत आहे. परंतु, हक्काचे पैसे खर्च करून रस्ते दुरुस्त करण्याऐवजी राजकारण सुरू असल्याने सर्वसामान्यांमधून रोष व्यक्त होत आहे. लोकप्रतिनिधी व नगरसेवकांच्या राजकीय संघर्षात सर्वसामान्य भरडला जात असल्याने समन्वयातून तोडगा काढण्यात यावा, असा सूरदेखील उमटू लागला आहे.
राजकीय संघर्षाचा नागरिकांना त्रास
कोट्यावधी रुपये पडून असतांना केवळ महापौर व स्थायी समिती सभापती यांच्या उदासिन धोरणामुळे अमरावतीकरांना खड्ड्यांतून जावे लागते, असा आरोप महिला कार्यकर्त्यांनी केला. संतापलेल्या महिला आंदोलकांनी सोबत आणलेल्या फलकावरील मार्डीकर यांच्या छायाचित्रास चपलांनी बदडून काढत रोष व्यक्त केला. यामुळे काहीकाळ तणाव निर्माण झाला होता.
शहरातील रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ९ कोटी ३० लक्ष रुपयांचा निधी असतानाही पदाधिकाऱ्यांकडून हा निधी खर्च करण्यात येत नाही. त्यामुळे नागरिकांना खड्ड्यांतून मार्ग काढत जावे लागत आहे. या मुद्यावरून शहरवासियांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी महापालिकेत हल्लाबोल आंदोलन केले. संतप्त कार्यकर्त्यांनी महापौरांची खुर्ची बाहेर काढण्याचा प्रयत्न करून स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर यांच्या फलकावरील छायाचित्रास चपलेने बदडले.
शहरातील रस्त्याची पूर्णत: चाळणी झाल्याने अमरावतीकरांना चांगलाच त्रास सहन करावा लागत आहे. नगरविकास विभागातर्फे रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी ९ कोटी ३० लक्ष रुपयांचा निधी मिळाला आहे. मात्र, आमदारांनी सुचविलेली कामे करण्याची अट शासनाने घातली. परंतु, निधीमधील आमदारांची कामे मान्य नसल्याने महापालिका पदाधिकाऱ्यांनी याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर यांनी ही याचिका दाखल केली असून हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. परंतु, कोट्यवधी रुपये असतानाही रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे असल्याने सर्वसामान्यांचा रोष आहे.
शहरातील खड्ड्यांना महापौर चरणजीत कौर नंदा व स्थायी समिती सभापती मार्डीकर हेच जबाबदार असल्याचा आरोप करीत युवा स्वाभिमानी संघटेच्यावतीने मंगळवारी महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला. संतप्त मोर्चेकऱ्यांनी थेट महापौरांच्या दालनात धडक देत त्यांची खुर्ची बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांनी त्याचा हा प्रयत्न हाणून पाडला. यानंतर मार्डीकर यांच्याविरोधात घोषणा देत त्यांचे छायाचित्र असलेल्या फलकास चपलेने बदडण्यात आले.
महापौरांच्या दालनात गोंधळ घातल्यानंतर आंदोलक स्थायी समिती सभापती मार्डीकर यांच्या दालनात पोहोचले. त्याच्या नावाची पाटी काढण्यात आली. युवा स्वाभिमानीच्या या आंदोलनाने महापालिकेत चांगलीच खळबळ उडाली होती.
महिला कार्यकर्त्या संतापल्या
राज्यशासनाने रस्त्याच्या दुरुस्तीसाठी अमरावती महापालिकेला सुमारे ९ कोटी ३० लक्ष रुपयांचा निधी दिला. परंतु, गेल्या सात महिन्यांपासून हा निधी तसाच पडून आहे. शासनाने या निधीतून आमदारांनी सुचविलेली कामे करण्यास मनपा पदाधिकाऱ्यांचा विरोध असल्याने पेच निर्माण झाला आहे. प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. गणपती, गौरी या सणानंतर आता नवरात्र, दसरा व दिवाळी येत आहे. परंतु, हक्काचे पैसे खर्च करून रस्ते दुरुस्त करण्याऐवजी राजकारण सुरू असल्याने सर्वसामान्यांमधून रोष व्यक्त होत आहे. लोकप्रतिनिधी व नगरसेवकांच्या राजकीय संघर्षात सर्वसामान्य भरडला जात असल्याने समन्वयातून तोडगा काढण्यात यावा, असा सूरदेखील उमटू लागला आहे.
राजकीय संघर्षाचा नागरिकांना त्रास
कोट्यावधी रुपये पडून असतांना केवळ महापौर व स्थायी समिती सभापती यांच्या उदासिन धोरणामुळे अमरावतीकरांना खड्ड्यांतून जावे लागते, असा आरोप महिला कार्यकर्त्यांनी केला. संतापलेल्या महिला आंदोलकांनी सोबत आणलेल्या फलकावरील मार्डीकर यांच्या छायाचित्रास चपलांनी बदडून काढत रोष व्यक्त केला. यामुळे काहीकाळ तणाव निर्माण झाला होता.