अ‍ॅपशहर

सत्तासामन्यात काँग्रेसची सरशी

जिल्हा परिषदेच्या ५९ गटासाठी आणि पंचायत समितीच्या ८८ गणाची बुधवारी मतमोजणी झाली. यात काँग्रेसने पुन्हा सरशी केली. जिल्हा परिषदेच्या २८ जागा काँग्रेसने जिंकल्या असून भाजपला केवळ १२ जागांवर समाधान मानावे लागले. शिवसेनेला तीन जागा मिळाल्या असून पाच जागा राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकल्या आहेत. बसप आणि रिपाइंने प्रत्येकी एक जागा मिळविली आहे. युवा स्वाभिमान पार्टीने दोन जागा मिळविल्या. दरम्यान, काँग्रेसची सत्ता स्थापनेची वाट सुकर झाली आहे.

Maharashtra Times 25 Feb 2017, 4:00 am
. टा. वृत्तसेवा, अमरावती
महाराष्ट्र टाइम्स.कॉम amarawati zp win congress
सत्तासामन्यात काँग्रेसची सरशी


जिल्हा परिषदेच्या ५९ गटासाठी आणि पंचायत समितीच्या ८८ गणाची बुधवारी मतमोजणी झाली. यात काँग्रेसने पुन्हा सरशी केली. जिल्हा परिषदेच्या २८ जागा काँग्रेसने जिंकल्या असून भाजपला केवळ १२ जागांवर समाधान मानावे लागले. शिवसेनेला तीन जागा मिळाल्या असून पाच जागा राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकल्या आहेत. बसप आणि रिपाइंने प्रत्येकी एक जागा मिळविली आहे. युवा स्वाभिमान पार्टीने दोन जागा मिळविल्या. दरम्यान, काँग्रेसची सत्ता स्थापनेची वाट सुकर झाली आहे.

जिल्हा परिषदेच्या चौदा तालुक्यांत काँग्रेस-राष्ट्रवादीने सरशी मिळविली आहे. या निवडणुकीत मनपाच्या तुलनेत जिल्हा परिषद निवडणुकीचे चित्र वेगळे राहिले. चांदूर रेल्वेचे आमदार वीरेंद्र जगताप यांची जादू धामणगाव व चांदूर रेल्वे तालुक्यात दिसून आली. कारण या दोन्ही तालुक्यात सर्व जागांवर काँग्रेसने विजय प्राप्त केला. अचलपूर तालुक्यातील पाच सर्कलमध्ये भाजपला चार जागांवर विजय मिळाला. एक जागा प्रहारच्या वाट्याला आली. मोर्शीत आमदार अनिल बोंडे यांनी आपला करिष्मा दाखविला. येथे चार जागा भाजपाच्या वाट्याला आल्या असून एक जागा शिवसेनेने जिंकली. मेळघाटात राष्ट्रवादी काँग्रेसने तीन जागांवर विजय प्राप्त केला.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची जबाबदारी पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्यासोबतच भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रा. दिनेश सूर्यवंशी यांच्याकडे होती. काँग्रेसने निवडणुकीची सूत्रे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख व आमदार वीरेंद्र जगताप यांच्याकडे सोपविली होती. सारेच दिग्गज यात प्रतिष्ठा आजमावत होते. महापालिकेप्रमाणे ग्रामीण भागात भाजपचा प्रभाव दिसला नाही. सत्ता मिळविण्यात अपयश आले. भाजपचे आमदार डॉ. अनिल बोंडे, रमेशचंद्र बुंदीले, प्रभुदास भिलावेकर यांनाही त्यांची जादू दाखविता आली नाही. मेळघाटात राष्ट्रवादीचे राजकुमार पटेल यांनी एकतर्फी किल्ला लढविला. अचलपूर तालुक्यात आमदार बच्चू कडू यांना धक्का बसला. या ठिकाणी भाजपला चार तर केवळ एक जागा प्रहारच्या वाट्याला आली. मात्र चांदूर बाजार येथे प्रहारला यश मिळाले. जिल्ह्यात ५९ जागांसाठी तब्बल ४१७ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. तर पंचायत समितीच्या ८८ गणांसाठी ५३३ उमेदवार रिंगणात होते. मतमोजणीला सुरुवात होताच प्रत्येक तहसील कार्यालयासमोर उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी गर्दी केली होती.


आघाडीवरून चर्चा

अमरावती जिल्हा परिषदेत काँग्रेसने सर्वाधिक जागा मिळवित सरशी मिळविली असली तरी बहुमत मिळालेले नाही. या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि काँग्रेस स्वतंत्र लढल्याने अडचण झाली आहे. आता सत्ता स्थापनेसाठी या दोन्ही पक्षांना आघाडी करावी लागणार आहे. पण, नेते काय निर्णय घेणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.

जगताप यांचा वरचष्मा

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत आमदार वीरेंद्र जगताप यांनी आपला वरचष्मा कायम ठेवला. चांदूर रेल्वे व धामणगाव रेल्वे तालुक्यात सर्व जागांवर काँग्रेसचेच उमेदवार विजयी झाले. ही बाब भाजपासाठी चिंतेची ठरली आहे.

पक्षीय संख्या
अमरावती जिल्हा परिषदेच्या ५९ गटासाठी काँग्रेसचे २८, भाजप १२, शिवसेना ३, राष्ट्रवादी ५, अपक्ष ९ आणि युवा स्वाभिमान पक्षाचे २ उमेदवार विजयी झाले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज