अ‍ॅपशहर

गणेश विसर्जनाच्या वादानंतर नवनीत राणा पुन्हा रिंगणात, उद्धव ठाकरेंवर निशाणा साधण्याची संधी सोडली नाही

navneet rana criticizes uddhav thackeray : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडताना खासदार राणा म्हणाल्या की, कालची उद्धव ठाकरे यांची जी सभा झाली ती सभा नव्हती. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे हे आव्हान देत होते ते आव्हान नव्हते, तर तो उद्धव ठाकरे यांचा अहंकार बाहेर पडत होता.

| Edited byसुनील तांबे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 Sep 2022, 1:49 pm
अमरावती: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची काल मुंबईतील नेस्को संकुल येथे शिवसेनेच्या गटप्रमुखांची मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Govt) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) आणि भारतीय जनता पक्षावर हल्लाबोल केला. त्यानंतर भाजप नेत्यांकडून प्रतिक्रिया उमटू लागल्या. आता अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनीही उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. (amravati mp navneet rana criticizes former cm uddhav thackeray)
महाराष्ट्र टाइम्स.कॉम amravati mp navneet rana criticizes former cm uddhav thackeray
गणेश विसर्जनाच्या वादानंतर नवनीत राणा पुन्हा रिंगणात, थेट उद्धव ठाकरेंवर साधला निशाणा


माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडताना खासदार राणा म्हणाल्या की, कालची उद्धव ठाकरे यांची जी सभा झाली ती सभा नव्हती. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे हे आव्हान देत होते ते आव्हान नव्हते, तर तो उद्धव ठाकरे यांचा अहंकार बाहेर पडत होता.

राज ठाकरेंचे जुने ते सोने; पक्षवाढीसाठी कार्यकर्त्यांना सांगितला प्रचाराचा तो खास फॉर्म्यूला
या बरोबरच कालच्या सभेत त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही उद्धव ठाकरे यांनी आव्हान दिले आहे. ते म्हणाले की देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी ही निवडणूक शेवटची निवडणूक असेल. मला वाटतं की एक हिंदीमध्ये म्हण आहे. ती अशी की जो दुसऱ्यांसाठी खड्डा खणतो, तो त्याच खड्ड्यात स्वत: पडतो. हीच स्थिती उद्धव ठाकरे यांची होणार आहे.

मैत्रीच्या नात्याला काळिमा! फक्त २२ हजारांसाठी मित्राने केला घात, पुढे जे केले ते संतापजनकच
आम्हाला असं वाटलं होतं की कालच्या सभेत ते एक कबुली देतील. ती अशी की मी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे विचार मी विसरलेलो आहे, त्यामुळे बाळासाहेबांनी मला माफ करावे, असे ते म्हणतील असे आम्हाला वाटत होते. पण त्यांनी माफी मागितली नाही. माफी न मागता उलट त्यांचा अहंकार लोकांसमोर बाहेर पडला आहे. इतके नक्की आहे आहे की हा अहंकार पाहून मुंबईची जनता येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांची जागा त्यांना दाखवून देईल.

ती रोज मंदिरात जायची, तो सतत तिचा पाठलाग करायचा, एके दिवशी केले धक्कादायक कृत्य
ते इतरांवर टीका करतात की हे दिल्लीमध्ये जाऊन झुकतात. मात्र, उद्धव ठाकरे हे दिल्लीत १० जनपथ येथे जाऊन त्यांनी तेथे किती लोटांगण घातले हे महाराष्ट्राची जनता जाणते. बाळासाहेबांचे विचार बाजूला सारून त्यांच्याकडून १० जनपथाची जीहुजुरी सुरू होती. फक्त अहंकार आणि अहंकारच त्यांच्याकालच्या भाषणात दिसत होता आणि हे संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेने पाहिले आहे, असेही राणा पुढे म्हणाल्या.

महत्वाचे लेख