अ‍ॅपशहर

संत्रा गळतीने उत्पादक हैराण, शेतकऱ्याने थेट ५०० झाडांवर चालवला बुलडोझर

गेल्या काही वर्षापासून संत्रा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. दोन वर्षापूर्वी पावसाच्या दुष्काळामुळे शेतकर्‍यांनी संत्र्याची वाळलेली झाडी तोडली होती. परंतु आता लागवड खर्चही निघत नसल्याने या शेतकऱ्याने आपली हिरवीगार बाग नष्ट केली आहे.

Maharashtra Times 27 Oct 2021, 10:44 am
अमरावती : विदर्भातील संत्रा जगप्रसिद्ध आहे. विदर्भात मोठ्या प्रमाणावर संत्रा फळांचे उत्पादन घेतले जाते. परंतु, मागील तीन ते चार वर्षापासून संत्रा उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहे. संत्रा झाडावर असलेल्या विविध रोगांमुळे संत्रा गळती सुरू झाली आहे. यामुळे शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान होत आहे. लाखो रुपये खर्च करूनदेखील काहीच उत्पादन होत नसल्याने अमरावती जिल्ह्यातील चांदुर बाजार तालुक्यातील संजय आवारे या शेतकऱ्याने आपल्या चार एकर संत्रा बागेतील ५०० हिरव्यागार संत्रा झाडांवर बुलडोजर जेसीबी चालून संत्रा बाग नष्ट करून टाकली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम amravati orange farm


गेल्या काही वर्षापासून संत्रा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. दोन वर्षापूर्वी पावसाच्या दुष्काळामुळे शेतकर्‍यांनी संत्र्याची वाळलेली झाडी तोडली होती. परंतु आता लागवड खर्चही निघत नसल्याने या शेतकऱ्याने आपली हिरवीगार बाग नष्ट केली आहे. लहान मुलांप्रमाणे काळजी घेत लहानाची मोठी केली झाडे संजय आवारे या संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी तोडून टाकली आहे.

१४ वर्षांपूर्वी संत्राच्या झाडाची त्यांनी लागवड केली होती. चांगले पैसे मिळतील अशी आशा होती. मात्र, चार ते पाच वर्षापासून लावलेलं खर्च देखील निघणे कठीण झाले होते. याच चिंतेतून या शेतकऱ्यांनी आपले झाडे बुलडोझर जेसीबी टाकून नष्ट करून टाकले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज