अमरावती: अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथील सारसी सातरगाव रोडवरील असलेल्या वनविभागाच्या जंगलात गेल्या तीन दिवसांपासून आगीचे तांडव सुरू आहे. आजही ही आग मोठ्या प्रमाणावर भडकल्याने आग नियंत्रणात आणण्यासाठी गेलेली तिवसा नगरपंचायतीच्या अग्निशमन दलाची नवीन गाडी जळून खाक झाली आहे. या दुर्घटनेत नगरपंचायतीचे तीन कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत. ( Amravati Tivsa Forest Fire Latest Update ) वाचा: दीपाली चव्हाण आत्महत्या: तेलंगण सरकारने घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
अग्निशमन दलाच्या गाडीलाच आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर चांदूररेल्वे येथील अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली आहे. सध्या आग नियंत्रणात आणण्यात यश आले असून मदतकार्य युद्धपातळीवर करण्यात येत आहे.
वाचा: बाजारपेठेत जाण्यासाठी पैसे मोजा!; नाशिकमध्ये उचलली 'ही' कठोर पावलं
तिवसा येथे जंगलाला आग लागण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. आता वनविभागानेच ही आग लावली होती व ती नियंत्रणाबाहेर गेल्यानंतर तिवसा अग्निशमन दलाच्या वाहनाला आग नियंत्रणात आणण्यासाठी पाचारण करण्यात आले होते, असेही सांगण्यात आले आहे. घटनास्थळी मुख्याधिकारी पल्लवी सोटे व माजी नगराध्यक्ष वैभव वानखडे दाखल झाले व त्यांनी स्थितीचा आढावा घेतला. वनविभागाच्या बेजबाबदारपणामुळे या भागात आगीच्या घटना वाढल्या असून आनंदवाडी, अशोकनगर येथील लोकवस्तीला त्यामुळे धोका निर्माण झाला आहे, असा दावा यावेळी वानखडे यांनी केला. तिवसासाठी स्वतंत्र अग्निशमन व्यवस्थेची मागणीही त्यांनी केली.
वाचा: येईल त्याला टचाटच लस टोचा; हसन मुश्रीफ यांनी सुचवला भन्नाट उपाय
अग्निशमन दलाच्या गाडीलाच आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर चांदूररेल्वे येथील अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली आहे. सध्या आग नियंत्रणात आणण्यात यश आले असून मदतकार्य युद्धपातळीवर करण्यात येत आहे.
वाचा: बाजारपेठेत जाण्यासाठी पैसे मोजा!; नाशिकमध्ये उचलली 'ही' कठोर पावलं
तिवसा येथे जंगलाला आग लागण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. आता वनविभागानेच ही आग लावली होती व ती नियंत्रणाबाहेर गेल्यानंतर तिवसा अग्निशमन दलाच्या वाहनाला आग नियंत्रणात आणण्यासाठी पाचारण करण्यात आले होते, असेही सांगण्यात आले आहे. घटनास्थळी मुख्याधिकारी पल्लवी सोटे व माजी नगराध्यक्ष वैभव वानखडे दाखल झाले व त्यांनी स्थितीचा आढावा घेतला. वनविभागाच्या बेजबाबदारपणामुळे या भागात आगीच्या घटना वाढल्या असून आनंदवाडी, अशोकनगर येथील लोकवस्तीला त्यामुळे धोका निर्माण झाला आहे, असा दावा यावेळी वानखडे यांनी केला. तिवसासाठी स्वतंत्र अग्निशमन व्यवस्थेची मागणीही त्यांनी केली.
वाचा: येईल त्याला टचाटच लस टोचा; हसन मुश्रीफ यांनी सुचवला भन्नाट उपाय