अमरावती : देवाचा आशीर्वाद जरुर पाहिजे, पण आशीर्वाद आहे म्हणून लग्न झाल्यावर तुम्ही काहीच नाही केलंत, तर पोरं कशी होणार? तुम्हालाही काही इनिशिएटिव्ह घ्यावा लागेल की नाही, असं म्हणत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हशा पिकवला. आधुनिक शेतीविषयी समजवताना गडकरींनी हे उदाहरण दिलं. शेतकऱ्यांना वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रयोगांची मदत घेण्याचं आवाहनही गडकरींनी केलं. अमरावतीत एका कार्यक्रमात ते बोलत होते. मात्र भूमिपुत्र शेतकरी संघटनेने गडकरींच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. नितीन गडकरी नेमकं काय म्हणाले?
देवाचा आशीर्वाद जरुर पाहिजे, पण आशीर्वाद आहे म्हणून लग्न झाल्यावर तुम्ही काहीच नाही केलंत, तर पोरं कशी होणार? तुम्हालाही काही इनिशिएटिव्ह घ्यावा लागेल की नाही. हे उदाहरण जास्त चांगलं समजतं, त्यामुळे तुम्ही प्रयत्नातून यशस्वी व्हा, माझ्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ काढू नका, तुम्ही स्वतः प्रयत्न केलात तर नक्की यश मिळेल, माझ्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, असं गडकरी म्हणाले.
हेही वाचा : मुख्यमंत्र्यांची पुन्हा दिल्लीवारी, एकनाथ शिंदेंच्या दौऱ्याचे दोन अजेंडा कोणते?
शेती आपल्याला अशी करायची आहे की प्रथम क्रमांकावर शेती, द्वितीय क्रमांकावर व्यवसाय आणि तिसऱ्या क्रमांकावर नोकरी असं असलं पाहिजे. तुम्ही मनात आणलं तर वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रयोगाच्या आधारे प्रॉडक्टिव्हिटी वाढवून आणि खर्च कमी करून जागतिक बाजारपेठेत तुम्ही पोहोचू शकता. विलास शिंदे लंडनच्या बाजारात द्राक्षे पाठवत आहेत, तर आपली संत्री का जात नाही? आपण कशामुळे मागे का आहोत? याला पश्चिम महाराष्ट्र जबाबदार नाही, तुम्ही जबाबदार आहात, असं नितीन गडकरी म्हणाले.
पाहा व्हिडिओ :
भूमिपुत्र शेतकरी संघटनेची नाराजी
'विदर्भातल्या शेतकऱ्यांनी मेहनत केली पाहिजे, एखाद्या तरूणाचे लग्न करून देणं समाजाचे काम असतं, लेकरं पैदा करण्यासाठी मेहनत घ्यावी लागते ती त्याने करावी ' अशा आशयाचे वक्तव्य नितीन गडकरी यांनी केले होते. या वक्तव्याविषयी गडकरींनी शेतकऱ्यांची माफी मागावी अशी मागणी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर यांनी एका पत्राद्वारे केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार नितीन गडकरी यांनी केलेल्या वक्तव्याचा अर्थ असा होता, की शेतकऱ्यांनी व्यवस्थेला दोष न देता मेहनत करून उत्पादन वाढवावे.
हेही वाचा : बाळासाहेबांच्या कट्टर सैनिकाने उद्धव ठाकरेंची साथ सोडली, रामदास कदमांचा सेनेला 'जय महाराष्ट्र'
देवाचा आशीर्वाद जरुर पाहिजे, पण आशीर्वाद आहे म्हणून लग्न झाल्यावर तुम्ही काहीच नाही केलंत, तर पोरं कशी होणार? तुम्हालाही काही इनिशिएटिव्ह घ्यावा लागेल की नाही. हे उदाहरण जास्त चांगलं समजतं, त्यामुळे तुम्ही प्रयत्नातून यशस्वी व्हा, माझ्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ काढू नका, तुम्ही स्वतः प्रयत्न केलात तर नक्की यश मिळेल, माझ्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, असं गडकरी म्हणाले.
हेही वाचा : मुख्यमंत्र्यांची पुन्हा दिल्लीवारी, एकनाथ शिंदेंच्या दौऱ्याचे दोन अजेंडा कोणते?
शेती आपल्याला अशी करायची आहे की प्रथम क्रमांकावर शेती, द्वितीय क्रमांकावर व्यवसाय आणि तिसऱ्या क्रमांकावर नोकरी असं असलं पाहिजे. तुम्ही मनात आणलं तर वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रयोगाच्या आधारे प्रॉडक्टिव्हिटी वाढवून आणि खर्च कमी करून जागतिक बाजारपेठेत तुम्ही पोहोचू शकता. विलास शिंदे लंडनच्या बाजारात द्राक्षे पाठवत आहेत, तर आपली संत्री का जात नाही? आपण कशामुळे मागे का आहोत? याला पश्चिम महाराष्ट्र जबाबदार नाही, तुम्ही जबाबदार आहात, असं नितीन गडकरी म्हणाले.
पाहा व्हिडिओ :
भूमिपुत्र शेतकरी संघटनेची नाराजी
'विदर्भातल्या शेतकऱ्यांनी मेहनत केली पाहिजे, एखाद्या तरूणाचे लग्न करून देणं समाजाचे काम असतं, लेकरं पैदा करण्यासाठी मेहनत घ्यावी लागते ती त्याने करावी ' अशा आशयाचे वक्तव्य नितीन गडकरी यांनी केले होते. या वक्तव्याविषयी गडकरींनी शेतकऱ्यांची माफी मागावी अशी मागणी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर यांनी एका पत्राद्वारे केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार नितीन गडकरी यांनी केलेल्या वक्तव्याचा अर्थ असा होता, की शेतकऱ्यांनी व्यवस्थेला दोष न देता मेहनत करून उत्पादन वाढवावे.
हेही वाचा : बाळासाहेबांच्या कट्टर सैनिकाने उद्धव ठाकरेंची साथ सोडली, रामदास कदमांचा सेनेला 'जय महाराष्ट्र'