म. टा. प्रतिनिधी, वाशीम
शेवटच्या माणसाचा विकास झाल्याशिवाय देशाच्या विकासाला काही अर्थ नसतो. दारिद्रय निर्मूलन आणि सामाजिक न्याय हेच ‘मेक इन इंडिया’चे खरे लक्ष्य असले पाहिजे. त्यादृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी व सहकाऱ्यांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. जग जिंकायच्या इच्छाशक्तीप्रमाणे काम केल्यास या देशात निश्चित परिवर्तन घडून ‘मेक इन इंडिया’ यशस्वी होईल, असा विश्वास विधानसभेचे माजी सभापती अरुण गुजराती यांनी व्यक्त केला.
राजस्थान कॉलेजमध्ये आयोजित ‘मेक इन इंडिया’ या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू मुरलीधर चांदेकर, हैदराबाद येथील डॉ. प्रसन्ना खडकीकर, डॉ. श्याम काळे, नांदेड विद्यापीठाचे डीन डॉ. आर. डी. देशमुख, एन. एम. विद्यापीठ जळगावचे डॉ. पी. आर. चौधरी, राजस्थान शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष श्यामबाबू मुंदडा, सचिव राजेंद्र सोमाणी, प्राचार्य मिलन संचेती, परिषदेचे मुख्य संयोजक डॉ. सुभाष जाधव, संयोजक डॉ. कमल अग्रवाल उपस्थित होते.
गुजराती म्हणाले, स्वातंत्र्यपूर्व काळात महात्मा गांधी यांनी ‘स्वराज लेंगे, चरखा चला के’ असा नारा दिला होता. त्यांना राजकीयसोबतच आर्थिक स्वातंत्र्यही अभिप्रेत होते. महात्मा गांधी यांच्या संकल्पनेचे आधुनिक रुप म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘मेक इन इंडिया’ पॉलिसी आहे. ही संकल्पना यशस्वी व्हायला हवी. यादृष्टीने प्रशासनाची मानसिकता काय आहे, त्यासाठी लागणारी दूरदृष्टी, अनुशासन, लोकसहभाग, इच्छाशक्ती, कौशल्य आहे काय? कारण या सर्व घटकांनी एकत्र येवून विचार केल्यासच ही संकल्पना यशस्वी होणे शक्य आहे. कृषी या देशाची संस्कृती आहे, एवढे बोलून चालणार नाही. तर ही संस्कृती इंडस्ट्रिजमध्ये रुपांतर करावे लागेल. त्याला भांडवल उपलब्ध करून द्यावे लागेल. स्किलफूल शिक्षण द्यावे लागेल. तरच शिक्षण आणि कृषी क्षेत्रात रोजगार आणि प्रगतीच्या संधी उपलब्ध होतील. एफडीआयमुळे देश आर्थिक गुलामगिरीत तर जाणार नाही ना याची काळजीही आपल्याला घ्यावी लागणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या परिषदेचा समारोप सायंकाळी झाला.
युवकांना घडवा
ग्रामीण विकासाच्या दृष्टीने शेतीचा सर्वांगीण विकासाला प्राधान्य देण्यात यावे, कौशल्याधिष्ठित रोजगार निर्मितीसाठी युवकांना घडविण्यासाठी शिक्षणप्रणाली विकसित करण्याकरिता पुढाकार घ्यावा, स्मार्ट सिटी आणि डिजिटल इंडियाच्या दृष्टीने तंत्र रोजगार निर्मितीसाठी तंत्रज्ञानाभिमुख शिक्षणप्रणाली विकसित करणे, समाजातील शेवटच्या घटकाचा विकास हाच ‘मेक इन इंडिया’चे लक्ष्य असावे, असे चार ठराव घेण्यात आले.
शेवटच्या माणसाचा विकास झाल्याशिवाय देशाच्या विकासाला काही अर्थ नसतो. दारिद्रय निर्मूलन आणि सामाजिक न्याय हेच ‘मेक इन इंडिया’चे खरे लक्ष्य असले पाहिजे. त्यादृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी व सहकाऱ्यांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. जग जिंकायच्या इच्छाशक्तीप्रमाणे काम केल्यास या देशात निश्चित परिवर्तन घडून ‘मेक इन इंडिया’ यशस्वी होईल, असा विश्वास विधानसभेचे माजी सभापती अरुण गुजराती यांनी व्यक्त केला.
राजस्थान कॉलेजमध्ये आयोजित ‘मेक इन इंडिया’ या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू मुरलीधर चांदेकर, हैदराबाद येथील डॉ. प्रसन्ना खडकीकर, डॉ. श्याम काळे, नांदेड विद्यापीठाचे डीन डॉ. आर. डी. देशमुख, एन. एम. विद्यापीठ जळगावचे डॉ. पी. आर. चौधरी, राजस्थान शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष श्यामबाबू मुंदडा, सचिव राजेंद्र सोमाणी, प्राचार्य मिलन संचेती, परिषदेचे मुख्य संयोजक डॉ. सुभाष जाधव, संयोजक डॉ. कमल अग्रवाल उपस्थित होते.
गुजराती म्हणाले, स्वातंत्र्यपूर्व काळात महात्मा गांधी यांनी ‘स्वराज लेंगे, चरखा चला के’ असा नारा दिला होता. त्यांना राजकीयसोबतच आर्थिक स्वातंत्र्यही अभिप्रेत होते. महात्मा गांधी यांच्या संकल्पनेचे आधुनिक रुप म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘मेक इन इंडिया’ पॉलिसी आहे. ही संकल्पना यशस्वी व्हायला हवी. यादृष्टीने प्रशासनाची मानसिकता काय आहे, त्यासाठी लागणारी दूरदृष्टी, अनुशासन, लोकसहभाग, इच्छाशक्ती, कौशल्य आहे काय? कारण या सर्व घटकांनी एकत्र येवून विचार केल्यासच ही संकल्पना यशस्वी होणे शक्य आहे. कृषी या देशाची संस्कृती आहे, एवढे बोलून चालणार नाही. तर ही संस्कृती इंडस्ट्रिजमध्ये रुपांतर करावे लागेल. त्याला भांडवल उपलब्ध करून द्यावे लागेल. स्किलफूल शिक्षण द्यावे लागेल. तरच शिक्षण आणि कृषी क्षेत्रात रोजगार आणि प्रगतीच्या संधी उपलब्ध होतील. एफडीआयमुळे देश आर्थिक गुलामगिरीत तर जाणार नाही ना याची काळजीही आपल्याला घ्यावी लागणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या परिषदेचा समारोप सायंकाळी झाला.
युवकांना घडवा
ग्रामीण विकासाच्या दृष्टीने शेतीचा सर्वांगीण विकासाला प्राधान्य देण्यात यावे, कौशल्याधिष्ठित रोजगार निर्मितीसाठी युवकांना घडविण्यासाठी शिक्षणप्रणाली विकसित करण्याकरिता पुढाकार घ्यावा, स्मार्ट सिटी आणि डिजिटल इंडियाच्या दृष्टीने तंत्र रोजगार निर्मितीसाठी तंत्रज्ञानाभिमुख शिक्षणप्रणाली विकसित करणे, समाजातील शेवटच्या घटकाचा विकास हाच ‘मेक इन इंडिया’चे लक्ष्य असावे, असे चार ठराव घेण्यात आले.