अ‍ॅपशहर

शिंदे साहेब म्हणायचे, आमचे पन्नास जण पडू देणार नाही, इथं उभं राहण्याचा प्रश्न, बच्चू कडूंचा निर्वाणीचा इशारा

Bacchu Kadu News : प्रहार जनशक्ती पार्टीचे नेते आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनी रवी राणा यांच्याकडून होत असलेल्या आरोपांवरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना इशारा दिला आहे. विरोधकांचं ठीक आहे पण आपल्या माणसांकडून आरोप होतात हे योग्य नाही, असं कडू म्हणाले.

Authored byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 Oct 2022, 11:06 pm

हायलाइट्स:

  • बच्चू कडूंचा निर्वाणीचा इशारा
  • १ नोव्हेंबरला निर्णय जाहीर करणार
  • आपलाच माणूस आरोप करताे हे थांबलं पाहिजे
बातमी थोडक्यात वाचण्यासाठी अॅप डाउनलोड करा
अमरावती : प्रहारचे आमदार माजी मंत्री बच्चू कडू यांनी आज बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा यांच्याकडून होत असलेल्या आरोपांविषयी निर्वाणीचा इशारा दिला आहे. मला आठ आमदारांचा फोन आला होता, आमच्या अस्तित्त्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे, असं त्यांनी सांगितल्याचं बच्चू कडू म्हणाले. शिंदे साहेब म्हणायचे, आमचे पन्नास आमदार पडू देणार नाही, पडण्याचा विषयचं नाही, कधी उभं राहणार, असा प्रश्न निर्माण झालाय म्हणून हा प्रश्न कायमचा मिटला पाहिजे, असं बच्चू कडू म्हणाले. सत्तांतर होत राहतं. सत्तांतरानंतर चुकीचे आरोप लावले जातात. त्याच्यात कुठलाही तथ्य नसतं. विरोधक लावतो इथपर्यंत ठीक आहे. पण, जेव्हा आपला घरातला माणूस लावतोय हे फार चुकीचं आहे, असं बच्चू कडू म्हणाले.
आमच्या प्रश्नावर मार्ग निघाला नाही तर वेगळा निर्णय घेतल्याशिवाय राहणार नाही. आमच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. गावातल्या लोकांच्या डोक्यात वेगळीच गोष्ट बसलीय, साधं वर्गणी मागायला गेलं की लोकं असं म्हणणार बरं तुम्ही तर पन्नास खोके घेतले. आपल्या घरातील माणूस आरोप लावत असेल तर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे , असं बच्चू कडू म्हणाले.

फुले आणि प्रसाद विकणाऱ्या दुकानासाठी १.७२ कोटींची बोली; जाणून घ्या कुठे आहे हे दुकान

पैसे दिले की नाही दिले हे सांगितलं पाहिजे कारण हा आमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. शिंदे साहेब आमचे पन्नास जे आमदार आहेत त्यांना पडू देणार नाही म्हणायचे. इथे पडण्याचा विषयच नाही. इथं उभं राहणार, कधी राहणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर कुठेतरी लक्ष द्यायला पाहिजे, असं आवाहन बच्चू कडूंनी केलं.

महाराष्ट्र देशाचं ग्रोथ इंजिन, देशाच्या विकासाची पताका जगात फडकवत ठेवेल : एकनाथ शिंदे

खरंतर प्रहारचा कार्यकर्ता आणि संघटना सगळ्या महाराष्ट्रात आहे. त्या सगळ्यांना विचारून आता आम्ही बैठक घेणार त्याच्यामध्ये काय कसं समोर जायचं हे ठरवणार आहोत. एकंदरीत जेव्हा पक्षातला माणूस बोलतोय तेव्हा अंतःकरणातून दुःखी वाटतं आणि हा आपला गेम तर होत नाही ना असंही वाटतं, असं बच्चू कडू म्हणाले. उद्धव साहेबांच्या घरासमोर जाऊन हनुमान चालिसा म्हणनं चूक होतं, असं म्हणत बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्याच्या त्या कृतीवर भूमिका स्पष्ट केली.

उद्धव ठाकरेंनी शिंदे फडणवीसांअगोदरच डाव टाकला, आदित्य ठाकरे अंबादास दानवे उद्याच शेताच्या बांधावर

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज