अ‍ॅपशहर

'राणा दाम्पत्याचा निवडणुकीत वेगळा बाप आणि आता वेगळा', बच्चू कडूंच्या टीकेने खळबळ

राणा दाम्पत्याच्या भूमिकेमुळे राज्यात सध्या शिवसेना पेटल्याचं पाहायला मिळत आहे. अशात आता नेते बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्यावर खळबळजनक टीका केली आहे. त्यांच्या या टीकेमुळे वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.

Edited byरेणुका धायबर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Apr 2022, 6:12 pm
अमरावती : राज्यात सध्या शिवसेना विरुद्ध राणा दाम्पत्य असा वाद पाहायला मिळत आहे. अशात राज्यमंत्री बच्चू कडू यांनी रवी राणा यांच्यावर सणसणीत टीका केली आहे. राज्यात इतर महत्त्वाचे मुद्दे असतानाही हनुमान चालीसा म्हणायला मुंबईला गेले आहेत. पण मातोश्रीवर जाण्याइतकी त्यांची उंची नाही. मातोश्रीसमोर पाय ठेवून पाहा, आम्ही शिवसेनेसोबत आहोत असं वक्तव्य राज्यमंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी केलं आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम navneet rana news
navneet rana news


मातोश्रीवर हनुमान चालीसा पठण करण्यासाठी राणा दाम्पत्य मुंबईत पोहोचलं आहे. अशातच अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी आपण शिवसेनेसोबत खंबीरपणे उभं असल्याची प्रतिक्रिया देत राणा यांच्यावर बोचरी टीका केली. इतकंच नाहीतर उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर हनुमान चालीसा म्हणावी हे ठरवणारे तुम्ही कोण? असाही सवाल यावेळी त्यांनी केला.

'शिवरायांना बदनाम करण्याच्या कटात राज ठाकरेंचाही सहभाग'
याविषयी प्रतिक्रिया देताना राज्यमंत्री बच्चू कडू म्हणाले की, 'आमदार रवी राणा आणि खासदार नवणीत राणा यांचा निवडणुकीचा एक बाप होता आता त्यांनी बाप बदलला आहे. मागील दोन वर्षांपासून सगळे भोंगे बंद होते. फक्त एकच भोंगा सुरू होता, तो अॅम्बुलन्सचा. भोंग्याच्या वादामुळे देशाचा विकास होणार नाही. शिवसेनेच्या वाटेला जायची तुमची लायकी नाही. असंच असेल तर या लढाईत आम्ही शिवसेनेसोबत खंबीरपणे उभं आहोत' अशी प्रतिक्रिया राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली आहे.
लेखकाबद्दल
रेणुका धायबर
रेणुका धायबर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. डिजिटल पत्रकारितेचा आठ वर्षांचा अनुभव आहे. २०१४ पासून पत्रकारीतेत आहेत. झी २४ तास , न्यूज १८ लोकमत, टीव्ही ९ अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. महाराष्ट्र, राजकारण, गुन्हेगारी, देश, विदेश, स्पेशल बातम्या यासोबत व्यवसाय विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख