म. टा. प्रतिनिधी, बुलडाणा
‘एक मराठा लाख मराठा’ या एका हाकेवर सकल मराठा समाजबांधव कोपर्डी घटनेच्या पार्श्वभूमीवर विविध मागण्यांसाठी राज्यभर रस्त्यावर उतरत आहेत. बुलडाणा येथेही सोमवारी मराठा क्रांती मूक मोर्चा निघाला. लाखो समाजबांधवांनी एकतेचे दर्शन घडविले. मातृतीर्थ सिंदखेडराजाचा वारस सांगणारा बुलडाणा जिल्हा यानिमित्त मराठामय झाला होता. कोपर्डी घटनेच्या आरोपींना फाशी, मराठा आरक्षण, अॅट्रॉसिटी कायद्यात दुरुस्ती यासोबतच जिजाऊ जन्मस्थळाचा विकास आराखडा मंजूर करण्याची मागणीही करण्यात आली.
असह्य उकाडा बधवणारा नव्हता. शिस्तबद्धता आणि संयमाचे दर्शन घडले. महिला, तरुणी, अबालवृद्धांचा या मोर्चात सहभाग होता. नजर जाईल तिथपर्यंत मोर्चेकरीच, असे चित्र होते. भगव्या पताका, काळे झेंडे आणि हातात फलक घेऊन सारे सहभागी झाले होते. शहरात येणाऱ्या चारही बाजूंच्या रस्त्यांवर सोमवारी सकाळी ७ वाजतापासूनच जिल्हाभरातून येणाऱ्या मोर्चेकऱ्यांच्या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दहा किलोमीटरपर्यंत या रांगा होत्या. ‘आम्ही मराठा’ लिहिलेल्या भगव्या टोप्या घातलेला जनसागर दिसून येत होता.
शहराच्या जयस्तंभ चौकातील मुख्य मंचावर ११ मुलींची उपस्थिती होती. जयस्तंभ चौक, संगम चौक, स्टेट बँक चौक, मलकापूर रोडवरील चावडी चौक या परिसरात महिलांची मोठी गर्दी होती. मोर्चात सहभागी होण्यात तरुणाई सर्वांत पुढे होती. लाखो महिलांची उपस्थिती अन् शिस्तबद्धता हे या मोर्चाचे प्रमुख वैशिष्ट होते.
सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन झाले. माँ जिजाऊ वंदना म्हणण्यात आली. प्रशासनाला देण्यात येणाऱ्या निवेदनाचे वाचन यावेळी करण्यात आले. एकूण २२ मागण्या करण्यात आल्यात. शेतकरी व शेतमजूर परिवारातील ११ मुलींनी ते निवेदन जिल्हाधिकारी डॉ. विजय झाडे यांना दिले. त्यानंतर कोपर्डी घटनेतील पीडितेला, उरी येथील शहीद जवानांना तसेच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. राष्ट्रगीताने सांगता झाली.
उडते ड्रोन अन् सूचनांचा आवाज...
मोर्चाच्या छायाचित्रणासाठी पाच ड्रोन, शहरात विविध ठिकाणी एकूण ४० मोठ्या स्क्रीन, १७ किलोमीटरची प्रभावी साऊंड सिस्टीम तर १५ फूट उंच व १६ बाय ३२ आकाराचे स्टेज होते. प्रशिक्षित १० हजार शिस्तसेवकांनी मूक मोर्चा सुरळीत राखण्यासाठी प्रयत्न केल्याने पोलिस यंत्रणेवरील ताण कमी झाल्याचे दिसून येत होते. प्रत्येक रस्त्यावर दोनशे ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे स्टॉल, प्रत्येक मार्गावर दुचाकींसाठी व मोठ्या वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था केली गेली होती. दहा रुग्णवाहिकांही मदतीला होत्या.
शाळा, महाविद्यालयांना सुट्टी
या मोर्चामुळे शहरातील बहुतांश शाळा, महाविद्यालयांना सोमवारी सुटी देण्यात आली होती. बहुतांश कर्मचाऱ्यांनी सामूहिक सुट्टी घेतल्याने अनेक कार्यालयांत शुकशुकाट होता. मोर्चासाठी आदल्या दिवशी होणारा रविवारचा बाजारही मंगळवारी भरवण्याचे आदेश देण्यात आले होते. शहरातील वाहतूकही वळविण्यात आली होती.
व्यापारी प्रतिष्ठाने बंद
मराठा समाजबांधवांच्या मूक मोर्चामुळे शहरातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या संगम चौक, जयस्तंभ चौक, बाजार लाइन, सराफा लाइन, जनता चौक, कारंजा चौक, एडेड चौक, त्रिशरण चौक, महाराणा चौक, चिंचोले चौक, धाड नाका या भागातील व्यापारी प्रतिष्ठाने पूर्णत: बंद ठेवण्यात आली होती.
तरुणींनी व्यक्त केला असंतोष...
जयस्तंभ चौकातील मुख्य मंचावरून समाजातील ११ तरुणींनी समाजाच्या मागण्या मांडण्यासह असंतोषाला वाचा फोडली. पूजा शेळके, गायत्री भोसले, दीपाली सुसर, कल्याणी रहाटे, प्रतीक्षा राणे, संयुक्ता मापारी, प्रगती मिरगे, पूजा बिलारी यांचा यात समावेश होता.
रुग्णवाहिकेसाठी पाच मिनिटांत रस्ता मोकळा
लाखो मराठा समाजबांधव मोर्चात आलेले होते. रस्त्यावर पाय ठेवण्यासहही जागा नसल्याने तेथून कुठलेच वाहन जाणे अशक्य होते. मोर्चासाठी येणाऱ्या एका व्यक्तीला अपघात झाला. त्याला घेऊन येणाऱ्या रुग्णवाहिकेला दवाखान्यापर्यंत जाण्यासाठी शहरातील तीन किलोमीटरपर्यंतचा रस्ता मोर्चेकऱ्यांनी अवघ्या पाच मिनिटांत मोकळा करून दिला.
पुढाऱ्यांची हजेरी
सर्वसामान्य मराठा समाजबांधवाप्रमाणे लोकप्रतिनिधी आणि पुढाऱ्यांनीही या मोर्चात हजेरी लावली. यामध्ये प्रामुख्याने गृहराज्यमंत्री रणजीत पाटील, खासदार प्रतापराव जाधव, माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, आमदार हर्षवर्धन सपकाळ, आमदार अॅड. आकाश फुंडकर, भाजपा जिल्हाध्यक्ष माजी आमदार धृपदराव सावळे, आमदार डॉ. संजय रायमुलकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नरेंद्र खेडेकर, संजय चेके पाटील, नगराध्यक्ष टी. डी. अंभोरे, श्वेता महाले, यांच्यासह अनेक नेतेमंडळी मोर्चास्थळी सर्व सामान्यांसोबत जमिनीवर बसून सहभागी झाली होती. पुरुषोत्तम खेडेकर दिसले नाहीत. ते अमेरिकेत असल्याचे कळते.
फलकांनी वेधले लक्ष
कोपर्डी घटनेतील दोषींना फाशी द्यावी, अॅट्रॉसिटी कायद्यात बदला करावा, स्वामिनाथन आयोग लागू करावा, शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव देण्यात यावा, अशा मागण्या लिहिलेली फलके मोर्चात सहभागी बांधवांच्या हाती दिसून येत होती. हाताला बांधलेली काळी पट्टी व फलक लक्ष वेधून घेत होते.
खेडी पडली ओस
बुलडाण्यातील या मोर्चामुळे जिल्हाभरातील अनेक खेडी ओस पडल्याचे चित्र सोमवारी होते. नेतृत्वाशिवाय पहिल्यांदाच समाज एकवटला होता. मिळेल त्या वाहनाने समाजबांधव बुलडाण्यात जमले होते. अनेक ठिकाणी मोर्चेकरूंच्या वाहनांवर फुलांचा वर्षाव करण्यात आला.
‘एक मराठा लाख मराठा’ या एका हाकेवर सकल मराठा समाजबांधव कोपर्डी घटनेच्या पार्श्वभूमीवर विविध मागण्यांसाठी राज्यभर रस्त्यावर उतरत आहेत. बुलडाणा येथेही सोमवारी मराठा क्रांती मूक मोर्चा निघाला. लाखो समाजबांधवांनी एकतेचे दर्शन घडविले. मातृतीर्थ सिंदखेडराजाचा वारस सांगणारा बुलडाणा जिल्हा यानिमित्त मराठामय झाला होता. कोपर्डी घटनेच्या आरोपींना फाशी, मराठा आरक्षण, अॅट्रॉसिटी कायद्यात दुरुस्ती यासोबतच जिजाऊ जन्मस्थळाचा विकास आराखडा मंजूर करण्याची मागणीही करण्यात आली.
असह्य उकाडा बधवणारा नव्हता. शिस्तबद्धता आणि संयमाचे दर्शन घडले. महिला, तरुणी, अबालवृद्धांचा या मोर्चात सहभाग होता. नजर जाईल तिथपर्यंत मोर्चेकरीच, असे चित्र होते. भगव्या पताका, काळे झेंडे आणि हातात फलक घेऊन सारे सहभागी झाले होते. शहरात येणाऱ्या चारही बाजूंच्या रस्त्यांवर सोमवारी सकाळी ७ वाजतापासूनच जिल्हाभरातून येणाऱ्या मोर्चेकऱ्यांच्या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दहा किलोमीटरपर्यंत या रांगा होत्या. ‘आम्ही मराठा’ लिहिलेल्या भगव्या टोप्या घातलेला जनसागर दिसून येत होता.
शहराच्या जयस्तंभ चौकातील मुख्य मंचावर ११ मुलींची उपस्थिती होती. जयस्तंभ चौक, संगम चौक, स्टेट बँक चौक, मलकापूर रोडवरील चावडी चौक या परिसरात महिलांची मोठी गर्दी होती. मोर्चात सहभागी होण्यात तरुणाई सर्वांत पुढे होती. लाखो महिलांची उपस्थिती अन् शिस्तबद्धता हे या मोर्चाचे प्रमुख वैशिष्ट होते.
सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन झाले. माँ जिजाऊ वंदना म्हणण्यात आली. प्रशासनाला देण्यात येणाऱ्या निवेदनाचे वाचन यावेळी करण्यात आले. एकूण २२ मागण्या करण्यात आल्यात. शेतकरी व शेतमजूर परिवारातील ११ मुलींनी ते निवेदन जिल्हाधिकारी डॉ. विजय झाडे यांना दिले. त्यानंतर कोपर्डी घटनेतील पीडितेला, उरी येथील शहीद जवानांना तसेच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. राष्ट्रगीताने सांगता झाली.
उडते ड्रोन अन् सूचनांचा आवाज...
मोर्चाच्या छायाचित्रणासाठी पाच ड्रोन, शहरात विविध ठिकाणी एकूण ४० मोठ्या स्क्रीन, १७ किलोमीटरची प्रभावी साऊंड सिस्टीम तर १५ फूट उंच व १६ बाय ३२ आकाराचे स्टेज होते. प्रशिक्षित १० हजार शिस्तसेवकांनी मूक मोर्चा सुरळीत राखण्यासाठी प्रयत्न केल्याने पोलिस यंत्रणेवरील ताण कमी झाल्याचे दिसून येत होते. प्रत्येक रस्त्यावर दोनशे ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे स्टॉल, प्रत्येक मार्गावर दुचाकींसाठी व मोठ्या वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था केली गेली होती. दहा रुग्णवाहिकांही मदतीला होत्या.
शाळा, महाविद्यालयांना सुट्टी
या मोर्चामुळे शहरातील बहुतांश शाळा, महाविद्यालयांना सोमवारी सुटी देण्यात आली होती. बहुतांश कर्मचाऱ्यांनी सामूहिक सुट्टी घेतल्याने अनेक कार्यालयांत शुकशुकाट होता. मोर्चासाठी आदल्या दिवशी होणारा रविवारचा बाजारही मंगळवारी भरवण्याचे आदेश देण्यात आले होते. शहरातील वाहतूकही वळविण्यात आली होती.
व्यापारी प्रतिष्ठाने बंद
मराठा समाजबांधवांच्या मूक मोर्चामुळे शहरातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या संगम चौक, जयस्तंभ चौक, बाजार लाइन, सराफा लाइन, जनता चौक, कारंजा चौक, एडेड चौक, त्रिशरण चौक, महाराणा चौक, चिंचोले चौक, धाड नाका या भागातील व्यापारी प्रतिष्ठाने पूर्णत: बंद ठेवण्यात आली होती.
तरुणींनी व्यक्त केला असंतोष...
जयस्तंभ चौकातील मुख्य मंचावरून समाजातील ११ तरुणींनी समाजाच्या मागण्या मांडण्यासह असंतोषाला वाचा फोडली. पूजा शेळके, गायत्री भोसले, दीपाली सुसर, कल्याणी रहाटे, प्रतीक्षा राणे, संयुक्ता मापारी, प्रगती मिरगे, पूजा बिलारी यांचा यात समावेश होता.
रुग्णवाहिकेसाठी पाच मिनिटांत रस्ता मोकळा
लाखो मराठा समाजबांधव मोर्चात आलेले होते. रस्त्यावर पाय ठेवण्यासहही जागा नसल्याने तेथून कुठलेच वाहन जाणे अशक्य होते. मोर्चासाठी येणाऱ्या एका व्यक्तीला अपघात झाला. त्याला घेऊन येणाऱ्या रुग्णवाहिकेला दवाखान्यापर्यंत जाण्यासाठी शहरातील तीन किलोमीटरपर्यंतचा रस्ता मोर्चेकऱ्यांनी अवघ्या पाच मिनिटांत मोकळा करून दिला.
पुढाऱ्यांची हजेरी
सर्वसामान्य मराठा समाजबांधवाप्रमाणे लोकप्रतिनिधी आणि पुढाऱ्यांनीही या मोर्चात हजेरी लावली. यामध्ये प्रामुख्याने गृहराज्यमंत्री रणजीत पाटील, खासदार प्रतापराव जाधव, माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, आमदार हर्षवर्धन सपकाळ, आमदार अॅड. आकाश फुंडकर, भाजपा जिल्हाध्यक्ष माजी आमदार धृपदराव सावळे, आमदार डॉ. संजय रायमुलकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नरेंद्र खेडेकर, संजय चेके पाटील, नगराध्यक्ष टी. डी. अंभोरे, श्वेता महाले, यांच्यासह अनेक नेतेमंडळी मोर्चास्थळी सर्व सामान्यांसोबत जमिनीवर बसून सहभागी झाली होती. पुरुषोत्तम खेडेकर दिसले नाहीत. ते अमेरिकेत असल्याचे कळते.
फलकांनी वेधले लक्ष
कोपर्डी घटनेतील दोषींना फाशी द्यावी, अॅट्रॉसिटी कायद्यात बदला करावा, स्वामिनाथन आयोग लागू करावा, शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव देण्यात यावा, अशा मागण्या लिहिलेली फलके मोर्चात सहभागी बांधवांच्या हाती दिसून येत होती. हाताला बांधलेली काळी पट्टी व फलक लक्ष वेधून घेत होते.
खेडी पडली ओस
बुलडाण्यातील या मोर्चामुळे जिल्हाभरातील अनेक खेडी ओस पडल्याचे चित्र सोमवारी होते. नेतृत्वाशिवाय पहिल्यांदाच समाज एकवटला होता. मिळेल त्या वाहनाने समाजबांधव बुलडाण्यात जमले होते. अनेक ठिकाणी मोर्चेकरूंच्या वाहनांवर फुलांचा वर्षाव करण्यात आला.