म. टा. वृत्तसेवा, यवतमाळ
सरकारने शेतीकडे विशेष लक्ष केंद्रित केले आहे. पहिला ‘इंटिग्रेटेड टेक्सटाइल पार्क’ अमरावती येथे तर यवतमाळ, अकोला, बुलडाणा, वर्धा, खामगावला लवकरच पार्क सुरू होणार आहे. जागतिक बँकेच्या सहाय्याने पाच हजार कोटी रुपयांचा नानाजी देशमुख कृषी समृद्धी प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. सामान्य माणसांसाठी काम करीत असून पाच वर्षात महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करू, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
दिग्रस येथे माजी मंत्री संजय देशमुख यांनी शनिवारी भाजपमध्ये प्रवेश केला. यानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर पालकमंत्री मदन येरावार, केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर, खासदार विकास महात्मे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे, जिल्हा प्रभारी शोभा फडणवीस, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, आमदार अशोक उईके, आमदार राजू तोडसाम, आमदार राजेंद्र नजरधने, आमदार राजेंद्र पाटणी, संजय देशमुख, विजय पाटील चोंढीकर, अमर दिनकर आदी मान्यवरांची उपस्थिती होती. मुख्यमंत्री म्हणाले, सरकारची दोन वर्षे दुष्काळाचा सामना करण्यात गेली. मात्र सरकारने जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून राज्यातील साडेसहा लाख हेक्टर शेती सिंचनाखाली आणली असून चार हजार गावे दुष्काळमुक्त झाली आहेत. या वर्षाच्या शेवटी ११ हजार गावे दुष्काळमुक्त होणार आहे. शिक्षणाच्या बाबतीत राज्य १६व्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकावर आले आहे. तर महात्मा फुले जनआरोग्य योजनेत अकरा हजार आजारांचा समावेश करण्यात आला असून त्याद्वारे मोफत उपचार मिळणार आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
पालकमंत्री मदन येरावार म्हणाले, संजय देशमुख परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून दोनदा अपक्ष आमदार म्हणून निवडून आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तळागळातील जनतेच्या विकासाच्या ध्यासामुळे संजय देशमुख हे भाजपात आले, असेही येरावार म्हणाले.
प्रास्ताविक भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे, संचालन कपील बोरूंदिया तर आभार जिल्हा सरचिटणीस अमर दिनकर यांनी मानले.
सरकारने शेतीकडे विशेष लक्ष केंद्रित केले आहे. पहिला ‘इंटिग्रेटेड टेक्सटाइल पार्क’ अमरावती येथे तर यवतमाळ, अकोला, बुलडाणा, वर्धा, खामगावला लवकरच पार्क सुरू होणार आहे. जागतिक बँकेच्या सहाय्याने पाच हजार कोटी रुपयांचा नानाजी देशमुख कृषी समृद्धी प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. सामान्य माणसांसाठी काम करीत असून पाच वर्षात महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करू, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
दिग्रस येथे माजी मंत्री संजय देशमुख यांनी शनिवारी भाजपमध्ये प्रवेश केला. यानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर पालकमंत्री मदन येरावार, केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर, खासदार विकास महात्मे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे, जिल्हा प्रभारी शोभा फडणवीस, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, आमदार अशोक उईके, आमदार राजू तोडसाम, आमदार राजेंद्र नजरधने, आमदार राजेंद्र पाटणी, संजय देशमुख, विजय पाटील चोंढीकर, अमर दिनकर आदी मान्यवरांची उपस्थिती होती. मुख्यमंत्री म्हणाले, सरकारची दोन वर्षे दुष्काळाचा सामना करण्यात गेली. मात्र सरकारने जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून राज्यातील साडेसहा लाख हेक्टर शेती सिंचनाखाली आणली असून चार हजार गावे दुष्काळमुक्त झाली आहेत. या वर्षाच्या शेवटी ११ हजार गावे दुष्काळमुक्त होणार आहे. शिक्षणाच्या बाबतीत राज्य १६व्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकावर आले आहे. तर महात्मा फुले जनआरोग्य योजनेत अकरा हजार आजारांचा समावेश करण्यात आला असून त्याद्वारे मोफत उपचार मिळणार आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
पालकमंत्री मदन येरावार म्हणाले, संजय देशमुख परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून दोनदा अपक्ष आमदार म्हणून निवडून आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तळागळातील जनतेच्या विकासाच्या ध्यासामुळे संजय देशमुख हे भाजपात आले, असेही येरावार म्हणाले.
प्रास्ताविक भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे, संचालन कपील बोरूंदिया तर आभार जिल्हा सरचिटणीस अमर दिनकर यांनी मानले.