म. टा. प्रतिनिधी, अमरावती
महागाई वाढत असून सर्वसामान्यांचे जगणे कठीण होऊन बसले आहे. त्यामुळे विद्यमान भाजपपेक्षा काँग्रेसचे सरकार बरे होते, अशी तोफ शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपावर डागली.
अमरावती येथील संगीतसूर्य केशवराव भोसले सभागृहात शिवसेना महानगर कार्यकर्त्यांचा मेळावा शनिवारी आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला खासदार आनंदराव अडसूळ, महानगर प्रमुख सुनील खराटे, जिल्हा प्रमुख प्रशांत वानखडे, प्रशांत जाधव, राजेश वानखडे, नरेंद्र केवले, वर्षा भोयर, मनीषा टेंभरे, रेखा खराटे, प्रभाकर पवार उपस्थित होते. खा. राऊत म्हणाले, देशात खरोखरच ‘अच्छे दिन’ आले आहेत काय? काश्मीरमध्ये गेल्या ४५ दिवसांपासून संचारबंदी सुरू आहे. जवानांवर हल्ले होत आहेत. त्यावर सत्तेत असूनही आम्हीच बोलतो. ही राष्ट्रभक्तीची हिंमत कोणत्या उद्योगपतींच्या पैशाने विकत घेता येत नाही. गेल्या विधानसभा निवडणुकीत विदर्भाने साथ दिली असती तर महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेला आपली ताकद दाखविता आली असती. शिवसेना हा राखेतून भरारी घेणाऱ्या फिनिक्स पक्षासारखा पक्ष आहे. आताही वेळ गेलेली नाही. आगामी महापालिका, जिल्हा परिषद व नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी शिवसैनिकांनी कामाला लागले पाहिजे. शिवसेना देशभक्तीची भाषा बोलत असते. ही हिंमत उद्योगपतींच्या पैशाने विकत घेता येत नाही, असे सांगत त्यांनी भाजपला टोला लगावला.
गेली ५० वर्षे शिवसेनेची वाटचाल केवळ आस्थेवर सुरू आहे. येणारा भविष्यकाळ हा शिवसेनेचा राहणार आहे. लाटेच्या भरवशावर बाबासाहेब कुपेकर मुख्यमंत्री तर देवेगौडा पंतप्रधान होऊ शकतात. लाट येते आणि जात राहते, असेही खा. राऊत यांनी सांगितले.
जुन्यांचे चुकीचे राजकारण : खासदार अडसूळ
सेनेतील जुनी मंडळी अफवा पसरवित आहेत. मेळाव्याचा निरोप नसल्याचे कारणे दिली जात आहेत. शिवसेनेच्या मेळाव्याकरिता मानापमानाची अपेक्षा कशाला, असा सवाल खासदार आनंदराव अडसूळ यांनी करीत पक्षांतर्गत विरोधकांवर तोफ डागली. शिवसेनेच्या भरवशावरआतापर्यंत पदे भोगलीत तेच लोक असे वागत असल्याचेही ते म्हणाले.
अघोषित बहिष्कार
खासदार आनंदराव अडसूळ यांचे भाषण संपत नाही तोच सभागृहात बसलेल्या काही शिवसैनिकांनी सभागृह सोडून खासदार संजय राऊत यांच्या भाषणावर अघोषित बहिष्कार टाकला. सभागृह सोडून जाणाऱ्या शिवसैनिकांना थांबविण्यासाठी खासदार अडसूळ पुन्हा उभे राहिले. शिवसैनिकांनी सभागृह सोडून जाऊ नये. ज्यांना जायचे असेल त्यांनी परत येऊ नये, अशा शब्दात आपली नाराजी बोलून दाखविली.
संजय बंडसह अनेक कार्यकर्ते अनुपस्थित
शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्याला माजी खासदार अनंत गुढे, माजी आमदार संजय बंड, दिनेश वानखडे, बाळासाहेब भागवत, बाळासाहेब हिंगणीकर यापैकी कोणत्याही नेत्याची व्यासपिठावर उपस्थिती नव्हती. मेळावा महानगराच्या कार्यकर्त्यांसाठी असूनदेखील ग्रामीण भागातील शिवसैनिक मेळाव्याला बहुसंख्येने उपस्थित होते.
महागाई वाढत असून सर्वसामान्यांचे जगणे कठीण होऊन बसले आहे. त्यामुळे विद्यमान भाजपपेक्षा काँग्रेसचे सरकार बरे होते, अशी तोफ शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपावर डागली.
अमरावती येथील संगीतसूर्य केशवराव भोसले सभागृहात शिवसेना महानगर कार्यकर्त्यांचा मेळावा शनिवारी आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला खासदार आनंदराव अडसूळ, महानगर प्रमुख सुनील खराटे, जिल्हा प्रमुख प्रशांत वानखडे, प्रशांत जाधव, राजेश वानखडे, नरेंद्र केवले, वर्षा भोयर, मनीषा टेंभरे, रेखा खराटे, प्रभाकर पवार उपस्थित होते. खा. राऊत म्हणाले, देशात खरोखरच ‘अच्छे दिन’ आले आहेत काय? काश्मीरमध्ये गेल्या ४५ दिवसांपासून संचारबंदी सुरू आहे. जवानांवर हल्ले होत आहेत. त्यावर सत्तेत असूनही आम्हीच बोलतो. ही राष्ट्रभक्तीची हिंमत कोणत्या उद्योगपतींच्या पैशाने विकत घेता येत नाही. गेल्या विधानसभा निवडणुकीत विदर्भाने साथ दिली असती तर महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेला आपली ताकद दाखविता आली असती. शिवसेना हा राखेतून भरारी घेणाऱ्या फिनिक्स पक्षासारखा पक्ष आहे. आताही वेळ गेलेली नाही. आगामी महापालिका, जिल्हा परिषद व नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी शिवसैनिकांनी कामाला लागले पाहिजे. शिवसेना देशभक्तीची भाषा बोलत असते. ही हिंमत उद्योगपतींच्या पैशाने विकत घेता येत नाही, असे सांगत त्यांनी भाजपला टोला लगावला.
गेली ५० वर्षे शिवसेनेची वाटचाल केवळ आस्थेवर सुरू आहे. येणारा भविष्यकाळ हा शिवसेनेचा राहणार आहे. लाटेच्या भरवशावर बाबासाहेब कुपेकर मुख्यमंत्री तर देवेगौडा पंतप्रधान होऊ शकतात. लाट येते आणि जात राहते, असेही खा. राऊत यांनी सांगितले.
जुन्यांचे चुकीचे राजकारण : खासदार अडसूळ
सेनेतील जुनी मंडळी अफवा पसरवित आहेत. मेळाव्याचा निरोप नसल्याचे कारणे दिली जात आहेत. शिवसेनेच्या मेळाव्याकरिता मानापमानाची अपेक्षा कशाला, असा सवाल खासदार आनंदराव अडसूळ यांनी करीत पक्षांतर्गत विरोधकांवर तोफ डागली. शिवसेनेच्या भरवशावरआतापर्यंत पदे भोगलीत तेच लोक असे वागत असल्याचेही ते म्हणाले.
अघोषित बहिष्कार
खासदार आनंदराव अडसूळ यांचे भाषण संपत नाही तोच सभागृहात बसलेल्या काही शिवसैनिकांनी सभागृह सोडून खासदार संजय राऊत यांच्या भाषणावर अघोषित बहिष्कार टाकला. सभागृह सोडून जाणाऱ्या शिवसैनिकांना थांबविण्यासाठी खासदार अडसूळ पुन्हा उभे राहिले. शिवसैनिकांनी सभागृह सोडून जाऊ नये. ज्यांना जायचे असेल त्यांनी परत येऊ नये, अशा शब्दात आपली नाराजी बोलून दाखविली.
संजय बंडसह अनेक कार्यकर्ते अनुपस्थित
शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्याला माजी खासदार अनंत गुढे, माजी आमदार संजय बंड, दिनेश वानखडे, बाळासाहेब भागवत, बाळासाहेब हिंगणीकर यापैकी कोणत्याही नेत्याची व्यासपिठावर उपस्थिती नव्हती. मेळावा महानगराच्या कार्यकर्त्यांसाठी असूनदेखील ग्रामीण भागातील शिवसैनिक मेळाव्याला बहुसंख्येने उपस्थित होते.