म. टा. प्रतिनिधी, अमरावती
राज्यात सर्वत्र गुन्हेगारी वाढली आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. महिलांवर अत्याचार व बलात्काराच्या घटना वाढत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नागपूर यात आघाडीवर आहे. मुन्ना यादव याची टोळी नागपुरात दहशत घालत आहे. परंतु त्याला राजाश्रय मिळत आहे. सरकारचा यंत्रणेवर व यंत्रणेचा पोलिसांना धाक नाही. गृहमंत्री म्हणून मुख्यमंत्री अपयशी ठरल्याने त्यांनी पद त्यागावे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे.
आगामी महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीनिमित्त शहर व जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यासासाठी अशोक चव्हाण दोन दिवसीय अमरावती दौऱ्यावर आहेत. महापालिका पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर आयोजित पत्रपरिषदेत त्यांनी राज्य शासनावर चौफेर टीका केली. चव्हाण म्हणाले,
आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस युतीसाठी स्थानिक पातळीवरील काँग्रेस नेत्यांच्या मतानुसार निर्णय घेतला जाईल. जातीयवादी शक्ती रोखण्यासाठी राकाँची सोबत यापूर्वी घेतली होती. सेनेच्या मदतीने भाजप सत्तेवर असले तरी त्यांच्यात मोठे मतभेद आहेत. शिवसेना लाचार झाली आहे. पंकजा मुंडे, विनोद तावडे यांच्यावर सरकार कारवाई करीत नाहीत. तर एकनाथ खडसे यांच्यावर कारवाई होत आहे. सरकार मंत्र्यावर कारवाईबाबत दुजाभाव करीत आहेत. गोविंद पानसरे, नरेंद्र दाभोळकर यांच्या मारेकऱ्यांना अद्याप अटक झाली नाही. संशयास्पद असणाऱ्या संघटनावर कारवाई केली जात नाही. या प्रकरणात सरकार दबाव टाकत असल्याचे सरकारी वकीलाने म्हटल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले.
१५ दिवसांत पदवीधरसाठी उमेदवार
अमरावती पदवीधर मतदारसंघाकरिता येत्या १५ दिवसांत उमेदवार घोषित करण्यात येईल. अमरावती येथून संजय खोडके, डॉ. अविनाश चौधरी तर बुलडाणा येथून संतोष आंबेकर यांनी उमेदवारी मागितली असल्याचे अशोक चव्हाण यावेळी म्हणाले.
राज्यात सर्वत्र गुन्हेगारी वाढली आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. महिलांवर अत्याचार व बलात्काराच्या घटना वाढत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नागपूर यात आघाडीवर आहे. मुन्ना यादव याची टोळी नागपुरात दहशत घालत आहे. परंतु त्याला राजाश्रय मिळत आहे. सरकारचा यंत्रणेवर व यंत्रणेचा पोलिसांना धाक नाही. गृहमंत्री म्हणून मुख्यमंत्री अपयशी ठरल्याने त्यांनी पद त्यागावे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे.
आगामी महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीनिमित्त शहर व जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यासासाठी अशोक चव्हाण दोन दिवसीय अमरावती दौऱ्यावर आहेत. महापालिका पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर आयोजित पत्रपरिषदेत त्यांनी राज्य शासनावर चौफेर टीका केली. चव्हाण म्हणाले,
आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस युतीसाठी स्थानिक पातळीवरील काँग्रेस नेत्यांच्या मतानुसार निर्णय घेतला जाईल. जातीयवादी शक्ती रोखण्यासाठी राकाँची सोबत यापूर्वी घेतली होती. सेनेच्या मदतीने भाजप सत्तेवर असले तरी त्यांच्यात मोठे मतभेद आहेत. शिवसेना लाचार झाली आहे. पंकजा मुंडे, विनोद तावडे यांच्यावर सरकार कारवाई करीत नाहीत. तर एकनाथ खडसे यांच्यावर कारवाई होत आहे. सरकार मंत्र्यावर कारवाईबाबत दुजाभाव करीत आहेत. गोविंद पानसरे, नरेंद्र दाभोळकर यांच्या मारेकऱ्यांना अद्याप अटक झाली नाही. संशयास्पद असणाऱ्या संघटनावर कारवाई केली जात नाही. या प्रकरणात सरकार दबाव टाकत असल्याचे सरकारी वकीलाने म्हटल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले.
१५ दिवसांत पदवीधरसाठी उमेदवार
अमरावती पदवीधर मतदारसंघाकरिता येत्या १५ दिवसांत उमेदवार घोषित करण्यात येईल. अमरावती येथून संजय खोडके, डॉ. अविनाश चौधरी तर बुलडाणा येथून संतोष आंबेकर यांनी उमेदवारी मागितली असल्याचे अशोक चव्हाण यावेळी म्हणाले.