अ‍ॅपशहर

१०० नागरिकांनी गाव सोडताच प्रशासनाला जाग, दाणापुरच्या घटनेची अनुसूचित जाती आयोगाकडून दखल

आज सकाळी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य सुभाष पारधी व जिल्हाधिकारी पवनीत कौर, जिल्हा पोलीस निरीक्षक अविनाश बारगळ यांनी दाणापूर गावात जाऊन पीडितांची भेट घेतली. जिल्हा प्रशासना सोबत बैठक घेऊन पत्रकार परिषद घेतली.

Maharashtra Times 27 Oct 2021, 12:17 pm
अमरावती : फुले, शाहू, आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्राला कलंक फासणारी घटना अमरावती जिल्ह्यातील चांदूररेल्वे तालुक्यातील दानापूर येथे घडली आहे. दाणापूर गावातील सवर्णांनी अनुसूचित जातीच्या लोकांच्या शेतीचा वहीवाटीचा रस्ता अडवून एका वृद्ध शेतकरी महिलेची सोयाबीन गंजी पेटवून दिली होती. सतत येथील सर्वांकडून अत्याचार होत असल्याने कंटाळून गावातील १०० दलितांनी गाव सोडून पाझर तलावाजवळ आश्रय घेतला होता.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम amravati news


या घटनेची चर्चा राज्यात पसरल्यामुळे याची दखल थेट राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने घेतली आहे. आज सकाळी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य सुभाष पारधी व जिल्हाधिकारी पवनीत कौर, जिल्हा पोलीस निरीक्षक अविनाश बारगळ यांनी दाणापूर गावात जाऊन पीडितांची भेट घेतली. जिल्हा प्रशासना सोबत बैठक घेऊन पत्रकार परिषद घेतली.
दिवाळीच्या मुहूर्तावर येणार अमृता फडणवीस यांचं नवीन गाणे
यात तातडीने घटनेची सर्व सखोल चौकशी करून अहवाल राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाला सादर करण्याचे निर्देश आयोगाचे सदस्य सुभाष पारधी यांनी दिले. दरम्यान, यातील २ आरोपींना अटक केली असून पीडित कुटुंबाना तातडीने नुकसान भरपाईसुद्धा देण्यात आल्याची माहिती अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य सुभाष पारधी यांनी दिली. इतकंच नाहीतर गावात सलोख्याचे वातावरण रहावे असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज