म.टा.वृत्तसेवा, अमरावती :
अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपाने युती धर्माचे पालन केले असून भाजपाच्या सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी काम केल्यानेच एवढ्या मोठ्या प्रमाणात युतीला मतदान मिळाले. अन्यथा हा पराभव फार मोठ्या फरकाने झाला असता, असे भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी स्पष्ट केले आहे.
अमरावती येथे शनिवारी माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचे पुत्र व दर्यापूरचे माजी आमदार अभिजित अडसूळ यांनी पराभवाचे खापर भाजपावर फोडले. कुळकर्णी यांनी अभिजित अडसूळ यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी भरपूर परिश्रम केले. अडसूळांच्या पराभवानंतर भाजपाचे कार्यकर्ते त्या दुःखातून अजुनही सावरलेले नाहीत. अशा परिस्थितीत उमेदवार व त्यांच्या निकटवर्तीयांनी कार्यकर्त्यांविषयी सांत्वनाचा शब्दही न काढता त्यांच्यावरच पराभवाचे खापर फोडणे हे दुःखदायक असल्याचे कुळकर्णी म्हणाले. आनंदराव अडसूळांविषयी मतदारसंघात कमालीची नाराजी होती. भाजपा कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. कार्यकर्ते कामाला लागले नसते तर अडसूळांना दारुण पराभव पत्करावा लागला असता. भाजपा-शिवसेना युती असल्यामुळे दोन्ही बाजुंनी युती धर्माचे पालन होणे अपेक्षित आहे. याचे भान अभिजित अडसूळ यांनी ठेवावे व युतीतील वातावरण गढूळ करू नये, असे आवाहन शिवराय कुळकर्णी यांनी केले आहे.
अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपाने युती धर्माचे पालन केले असून भाजपाच्या सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी काम केल्यानेच एवढ्या मोठ्या प्रमाणात युतीला मतदान मिळाले. अन्यथा हा पराभव फार मोठ्या फरकाने झाला असता, असे भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी स्पष्ट केले आहे.
अमरावती येथे शनिवारी माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचे पुत्र व दर्यापूरचे माजी आमदार अभिजित अडसूळ यांनी पराभवाचे खापर भाजपावर फोडले. कुळकर्णी यांनी अभिजित अडसूळ यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी भरपूर परिश्रम केले. अडसूळांच्या पराभवानंतर भाजपाचे कार्यकर्ते त्या दुःखातून अजुनही सावरलेले नाहीत. अशा परिस्थितीत उमेदवार व त्यांच्या निकटवर्तीयांनी कार्यकर्त्यांविषयी सांत्वनाचा शब्दही न काढता त्यांच्यावरच पराभवाचे खापर फोडणे हे दुःखदायक असल्याचे कुळकर्णी म्हणाले. आनंदराव अडसूळांविषयी मतदारसंघात कमालीची नाराजी होती. भाजपा कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. कार्यकर्ते कामाला लागले नसते तर अडसूळांना दारुण पराभव पत्करावा लागला असता. भाजपा-शिवसेना युती असल्यामुळे दोन्ही बाजुंनी युती धर्माचे पालन होणे अपेक्षित आहे. याचे भान अभिजित अडसूळ यांनी ठेवावे व युतीतील वातावरण गढूळ करू नये, असे आवाहन शिवराय कुळकर्णी यांनी केले आहे.